शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

पांढरी काठी आजही अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2015 00:24 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल होत असली, तरीही अंध बांधवांची पांढरी काठी मात्र आजही अंधारातच वाट शोधत आहे.

पराग कुंकूलोळ, चिंचवडआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल होत असली, तरीही अंध बांधवांची पांढरी काठी मात्र आजही अंधारातच वाट शोधत आहे. पारंपरिक शिक्षणपद्धती, रोजगार व विवाह समस्यांमुळे हे बांधव आजही दारोदार भटकंती करत असल्याचे वास्तव राज्यात दिसत आहे. यांच्या काठीला सहकार्याची नितांत गरज असल्याचे मत अंध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.राज्यात अनुदानित ५६ आणि विनाअनुदानित १४ अशा ७० शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना १ली ते ७वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. १७ अनुदानित व ९ विनाअनुदानित व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांतून रोजगारासंदर्भात शिक्षण देणे सुरू आहे. मात्र, या शिक्षणपद्धतीतून पारंपरिक धडे देण्याचे काम सुरू आहे. झाड़ू, मेणबत्ती, अगरबत्ती, खुर्च्यांचे विणकाम अशा प्रशिक्षणातून शिक्षण दिले जाते. यातून हे अंध बांधव सक्षम होतात का, हा महत्त्वाचा विषय आहे. काही संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्या, तरीही शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांचे पुनर्वसन होत नसल्याची खंत अंध शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.दुसऱ्या महायुद्धात अनेक जवानांना व नागरिकांना अंधत्व आले. त्यावर मात करण्यासाठी अमेरिकेतील आर्मीच्या ‘व्हॉली फोर्स’मध्ये अंध जवानांना काठीच्या साहाय्याने चालण्याचे शिक्षण देणे सुरू झाले. परंतु, वापरण्यात येणारी काठी लांब व वजनाने जड होती. १९४४मध्ये रिचर्ड हूवर यांनी पांढऱ्या काठीचा शोध लावला. हलकी व घडी घालून ठेवता येणारी काठी तयार करून त्यांनी अंधांना दिलासा दिला. ही काठी भारतातील अंधांच्या हातात यायला कित्येक वर्षे लागली. डेहराडून येथे १९७१मध्ये या काठी वापरण्याचे धडे देणारे पहिले प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले. शाळांमध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले. उपयुक्त ठरत असल्याने ही काठी भारतात बनविण्यास सुरुवात केली. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बंगलोरमध्ये ही काठी बनिवणाऱ्या कंपन्या आहेत.राज्यातील अंध विद्यार्थ्यांना शिक्षण साचेबंद पद्धतीने दिले जात आहे. या घटकाचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन करायचे असल्यास शासनाच्या धोरणात्मक निर्णयात बदल होणे अपेक्षित आहे. शिक्षणप्रणाली व व्यावसायिक प्रशिक्षण आधुनिक पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे. पुनर्वसनाकरिता शासकीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींची समिती स्थापन करावी. अंध-अपंगांच्या विकासासाठी घटनात्मक बदल करण्यास लढाई करावी लागेल. योजना तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणारी यंत्रणा सक्षम झाल्यास अंध बांधव स्वावलंबी होतील. - विकास पोतदार, महाराष्ट्र राज्य अपंग शाळाचालक समितीचे उपाध्यक्ष