शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुटुंबासह जायचे कुठे?; कारवाईविरोधात स्थानिकांमध्ये रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 03:35 IST

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या जागेतील घरे व दुकानांवर कारवाई करण्याच्या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या जागेतील घरे व दुकानांवर कारवाई करण्याच्या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. या कारवाईविरोधात तेथील नागरिकांमध्ये रोष वाढू लागला आहे. अन्यत्र कमी भाडे देऊन घर मिळत नाही. मुलांच्या शाळा, छोटे-छोटे व्यवसाय, मुजरीची कामे सोडून कुटुंबासह जायचे कुठे? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.शिवाजीनगर रेल्वेस्थानक परिसरातील १५९ घरे व २७ दुकाने रिकामी करून सोडण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत केले जाणार आहे. याबाबतच्या नोटिसा सर्व रहिवाशांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी हतबल झाले आहेत. अनेक जण वर्षानुवर्षे या जागेवर राहत आहेत. अनेकांचे छोटे व्यवसाय, दुकानेही याच परिसरात आहेत. मजुरी, घरकाम करणारे अनेक जण आहे. त्यावरच संसाराचा गाडा हाकला जातो. मुलांच्या शाळाही याच परिसरात आहेत. त्यामुळे अचानक सर्व सोडून इतरत्र राहायची व्यवस्था कशी होणार? व्यवसाय, मुलांच्या शाळा बंद पडतील. त्यामुळे इथेच राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.नागरिकांनी मांडली आमदारांसमोर व्यथाआमदार अनिल भोसले यांनी दुपारी परिसरातील नागरिकांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. नवीन नियमाप्रमाणे झोपडट्टीवासीयांना आहे तिथेच, त्याच जागी घर देणे आवश्यक आहे. यापूर्वी आम्ही झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी औंधमध्ये घर देण्याची मागणी केली होती. पण ती मागणी त्यावेळेस फेटाळली गेली. आता या रहिवाशांना आहे त्या ठिकाणीच घर पाहिजे, असे भोसले यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून येथेच राहतोय. आता अचानक घर खाली करावे लागले तर कोठे जायचे, हा प्रश्न पडलाय. दुसरीकडे गेल्यावर परत कामाचा प्रश्न. स्थानकाबाहेरच माझा व्यवसाय आहे.- अनिल मोरे, रहिवासीआठ दिवसांपासून घर शोधतोय, पण घर मिळत नाही. दुसरीकडे गेलो तर आताच काम पण जाईल मग पुन्हा नवीन काम शोधावे लागेल. शासनाने आम्हाला पाच महिन्यांची मुदत द्यावी. मे महिन्यात मुलांच्या परीक्षा होईपर्यंत तरी आम्हाला येथे राहू द्यावे.- अर्चना कोळी, रहिवासीमाझी एक मुलगी बारावीला आणि दुसरी पदवीचे शिक्षण घेतेय. इथून गेलो तर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. हडपसरला यांनी घरे दिली पण काही कारणांमुळे ती विकावी लागली. पोलीस बंदोबस्तात घर पडणार आहेत. आधी आमच्यावरूनच बुलडोझर घाला म्हणजे आमचे प्रश्न तरी संपतील.- मंगल बकरे, रहिवासी

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण