शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसाराचा निधी गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 18:18 IST

महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देशातून राज्य सरकारने १२ आॅगस्ट २०१४ रोजी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीची स्थापना केली.

ठळक मुद्देनिधीच्या माहितीपासून समिती अनभिज्ञमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समितीला दरवर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्याची ग्वाही

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांपासून केलेली निधीची तरतूदच केवळ कागदावरच उरली आहे. प्रत्यक्षात या निधीचा विनियोग केल्या नसल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. तत्कालीन सरकारने कार्यालयीन कामकाजामधून एक कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर कायद्याची प्रक्रिया सुरू असताना दरवर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, या निधीचे पुढे काय झाले, याबद्दल सरकारने जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीला कोणतीही माहिती दिलेली नाही. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देशातून राज्य सरकारने १२ आॅगस्ट २०१४ रोजी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीची स्थापना केली. सामाजिक न्याय विभागामार्फत या कायद्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी २०१४-१५ या वर्षात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक याप्रमाणे ३५ जाहीर सभा, तीन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे, पोलीस अधिका-यांच्या ४० कार्यशाळा आणि चारशेहून अधिक शाळा-महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आले. त्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती.  राज्यातील सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समितीला दरवर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार गृह खात्याकडून करण्यात आलेली तरतूद सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाले असले तरी त्याच्या खर्चाबाबत विभागाने समितीला माहिती दिलेली नाही. कायद्याची प्रक्रिया सुरू असताना दरवर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्याचे ठरले होते. मात्र, हा निधी मिळाला की नाही आणि मिळाला असेल तर त्यातील किती खर्च झाला याबद्दल सहअध्यक्ष असूनही मी अनभिज्ञ आहे, असे श्याम मानव यांनी सांगितले. या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत प्रयत्न करतो. पण, त्या कामाला काही प्रमाणात मर्यादा पडतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.------------समितीचे कार्यालय पुण्यात सुरु झाले आणि यंत्रणाही उभारण्यात आली. नव्या सरकारच्या काळात हे काम ठप्प झाले. २०१५ पासून ३५ जिल्ह्यात ४० पोलीस प्रशिक्षण, जाहीर सभा, वक्तयांचे प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी प्रवास खर्चापासून सर्व खर्चासाठी मी पदरमोड केली होती. तो खर्च मला अद्याप शासनाकडून मिळालेला नाही. तीन कोटी रुपये नियमाप्रमाणे गृह खात्याकडून सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाले असावेत. मात्र, या रकमेचे काय केले, किती खर्च झाला याबद्दल सहअध्यक्ष असूनही मी अनभिज्ञ आहे.  - प्रा. श्याम मानव,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-संघटक  

टॅग्स :Puneपुणेshyam manavश्याम मानवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार