शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

१0९0 क्युसेक्स पाणी मुरले कोठे?

By admin | Updated: June 4, 2015 05:25 IST

खडकवासला धरणातून १४०० क्युसेक्सने नुकतेच आवर्तन सोडले होते. यातील ३00 क्युसेक्स पाणी पुणे शहराला देण्यात आले.

इंदापूर : खडकवासला धरणातून १४०० क्युसेक्सने नुकतेच आवर्तन सोडले होते. यातील ३00 क्युसेक्स पाणी पुणे शहराला देण्यात आले. हडपसरपासून खाली ११०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडले, मात्र इंदापूरच्या तरंगवाडी तलावापर्यंत २० क्युसेक्स एवढेच पाणी पोहचले. मग, १०९० क्युसेक्स पाणी मुरले कोठे, असा प्रश्न विचारला जात आहे. माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे, उपविभागीय अभियंता के. के. देवकाते यांच्यासह पत्रकारांना घेऊन तरंगवाडीत तलाव व परिसराची पाहणी केली. त्यावेळी ही वस्तुस्थिती उघड झाली. दि. ५ मे रोजी हे पाण्याचे चौथे आवर्तन मिळणे आवश्यक होते. मात्र ते दहा दिवस उशिरा १५ मे ला सोडण्यात आले. १४०० क्युसेक्स क्षमतेने खडकवासला कालव्यातून हे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ३०० क्युसेक्स पाणी पुणे शहरात देण्यात आले. हडपसरपासून खाली ११०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले. तरंगवाडीच्या अलिकडे दीड किलोमीटर अंतरावर ते २० क्युसेक्स एवढे रोडावले. काल ते तेथेच संपले. या संदर्भात माहिती घेतली असता, हडपसरपासून पुढे पाटस, यवत, दौंडपर्यंतच्या भागात हजारो शेतीपंप आहेत. सायफनची जाळे पसरलेले आहे. पिण्यासाठी सोडलेले पाणी शेती पंप व सायफनद्वारे उचलले जाते. पिण्यासाठी पाणी साठवताच येत नाही. या खेरीज इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या मार्गावर अनधिकृत अशी १२०० वीजजोड असल्याचा आरोप मखरे यांनी केला आहे. ती सुद्धा या काळात बंद ठेवण्यात आली नाही. याचाही फटका या आवर्तनाला बसला आहे. पाणी येणाऱ्या मार्गावर पिण्याच्या पाण्याच्या योजना असणाऱ्या गावांमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना ही पाणी नाही. तरंगवाडी तलावात पाणी पोहोचले नाही. त्यामुळे इंदापूर शहराला देखील पिण्यासाठी पाणी नाही.(वार्ताहर)