शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पूररेषा केव्हा होणार निश्चित ? साईनाथनगरच्या चारशे कुटुंबांना चार वेळा बसला पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 12:57 IST

साईनाथनगरची अद्यापही पूररेषा प्रशासनाने निश्चित न केल्यामुळे वर्षानुवर्षे साईनाथनगरमध्ये बांधकामे होत आहेत.

ठळक मुद्देसाईनाथनगरच्या ४०० कुटुंबांचे अपरिमित नुकसान

चंदननगर : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुळा-मुठा नदीला पूर आला. त्यात वडगावशेरी-खराडी नदीकाठी असणाºया साईनाथनगरच्या चारशे कुटुंबांना याचा फटका बसला व कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. मूळ मुद्दा असा आहे, साईनाथनगरची अद्यापही पूररेषा प्रशासनाने निश्चित न केल्यामुळे वर्षानुवर्षे साईनाथनगरमध्ये बांधकामे होत आहेत. जर प्रशासनाने वेळीच साईनाथनगरची पूररेषा निश्चित केली असती तर बांधकामे झाली नसती व पर्यायाने सर्वसामान्य गरिबांना पुराचा फटका बसला नसता. प्रत्येक वेळी येणाऱ्या पुरातून होणाऱ्या नुकसानाचे प्रशासनाकडून पुराचे पंचनामे केले जातात. मात्र, महत्वाचा मुद्दा  म्हणजे या परिसराला नेहमी पुराचा मोठा फटका बसत आला आहे. सातत्याने पुराचा फटका बसत असल्यामुळे येथील सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र यासाठी महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. यापूर्वी चार वेळा साईनाथनगरला पुराचा फटका प्रचंड बसला आहे. सर्वात जास्त फटका या वर्षी म्हणजे (गेल्या पंधरा) दिवसांपूर्वी आलेल्या पुराने बसला आहे.  या पुरात घरातील सर्व साहित्य, वापराचे साहित्य धान्य कचऱ्यात टाकण्याची वेळ साईनाथनगरच्या पूरग्रस्तांवर आली. याबाबत ‘लोकमत’ने साईनाथनगरची  प्रत्यक्ष पाहणी केली असता नदीपात्रात प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. यास महापालिका प्रशासन जबाबदार आहे. वेळीच जर साईनाथनगरची पूररेषा निश्चित केली असती तर निश्चितच बांधकामे  झाली नसती व त्याचा फटका गोरगरिबांना बसला नसता, असे पाहणीत समोर आले.  यापूर्वी साईनाथनगरला १९९४ मध्ये पूर आला होता. मात्र त्यावेळी नदीपात्रालगत बांधकामे झाली नव्हती. त्यानंतर मुळा-मुठा नदी वहन क्षमता एक लाख  क्युसेक असणे धरले आहे. यानंतर १९९७ मध्ये खडकवासला धरणातून  ९0 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यात साईनाथनगरच्या वीस घरांत पुराचे पाणी घुसले होते. यानंतर २00५ मध्येही पूर आला होता. या वेळी १२५ घरांत पुराचे पाणी घुसले होते. त्यानंतर २0१४ मध्ये पूर आला होता . त्यावेळी १00 घरात पाणी घुसले होते. यावर्षी नदीपात्रालगत बांधकामे प्रचंड वाढल्यामुळे यावर्षी पंधरा दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून ४७  ते ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला व  चारशे घरांत पुराचे पाणी घुसले.

टॅग्स :Chandan NagarचंदननगरfloodपूरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका