शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

भोरमधील वाहतूकसमस्या सुटणार कधी?

By admin | Updated: January 11, 2016 01:36 IST

रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व माल वाहतुकीच्या गाड्या, फळांच्या गाड्या, दुकानांचे फलक, रस्त्यावर बसलेले भाजीपाला, खेळणी, चप्पल व इतर विक्रते यामुळे खोळंबलेल्या

रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व माल वाहतुकीच्या गाड्या, फळांच्या गाड्या, दुकानांचे फलक, रस्त्यावर बसलेले भाजीपाला, खेळणी, चप्पल व इतर विक्रते यामुळे खोळंबलेल्या वाहतुकीतून धुराचा वास घेत जीव मुठीत धरून जावे लागते. पोलीस व भोर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे भोरवासीयांचा श्वास नेहमीच गुदमरतो. तो वाहतुकीच्या व प्रदूषणाच्या कोंडीतून सुटणार कधी? असा प्रश्न भोर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. भोर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नगरपालिका चौक ते एसटी स्टँडपर्यंतच्या रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने, बँका व कार्यालये आहेत. मात्र कोणत्याच इमारतीला पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्यांच्या गाड्या, दुकानांचा माल घेऊन आलेले ट्रक व बँकांत, कार्यालयांत येणारे याशिवाय दुकानदारांच्या गाड्या व दुकानांचे फलक यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. राजवाडा चौक, पंचायत समिती, नवी आळी, सम्राट चौक चौपाटी या परिसरातही वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याचाही त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागतो, तर मंगळवारी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे विक्रेते व ग्राहक येत असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर सतत वाहतुकीची कोंडी झालेली असते.नगरपालिकेकडून तीन वर्षांपूर्वी सम-विषम तारखेला पार्किंग करून वाहतुकीवर उपाय काढण्यात आला होता. फलकही लावण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे ते बारगळले. नवीन अधिकारी आल्यावर चार-पाच महिन्यांपूर्वी पोलीस अधिकारी नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन वाहतुकीवर उपाययोजना करण्यात आली होती. त्या वेळी शहरातील बाजारपेठेतील बाहेर आलेली अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला. काही नियमही ठरविण्यात आले. मात्र पोलीस व नगरपालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पुढे काहीच झाले नाही. ठरलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम त्यांनी केल्याने वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ राहिली आहे. भोर पोलीस ठाण्याकडून दोन पोलिसांची शहरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे पोलीस शहरातील वाहतुकीची कोंडी सुधारण्याऐवजी एसटी स्टँडवरील अवैध वाहतूक कशी सुरळीत चालेल, याकडे अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्याऐवजी अधिकच वाढत गेली आहे. याला पोलीस आणि नगरपालिकाच जबाबदार असल्याचे नागरिक सांगतात.