शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भोरमधील वाहतूकसमस्या सुटणार कधी?

By admin | Updated: January 11, 2016 01:36 IST

रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व माल वाहतुकीच्या गाड्या, फळांच्या गाड्या, दुकानांचे फलक, रस्त्यावर बसलेले भाजीपाला, खेळणी, चप्पल व इतर विक्रते यामुळे खोळंबलेल्या

रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व माल वाहतुकीच्या गाड्या, फळांच्या गाड्या, दुकानांचे फलक, रस्त्यावर बसलेले भाजीपाला, खेळणी, चप्पल व इतर विक्रते यामुळे खोळंबलेल्या वाहतुकीतून धुराचा वास घेत जीव मुठीत धरून जावे लागते. पोलीस व भोर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे भोरवासीयांचा श्वास नेहमीच गुदमरतो. तो वाहतुकीच्या व प्रदूषणाच्या कोंडीतून सुटणार कधी? असा प्रश्न भोर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. भोर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नगरपालिका चौक ते एसटी स्टँडपर्यंतच्या रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने, बँका व कार्यालये आहेत. मात्र कोणत्याच इमारतीला पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्यांच्या गाड्या, दुकानांचा माल घेऊन आलेले ट्रक व बँकांत, कार्यालयांत येणारे याशिवाय दुकानदारांच्या गाड्या व दुकानांचे फलक यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. राजवाडा चौक, पंचायत समिती, नवी आळी, सम्राट चौक चौपाटी या परिसरातही वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याचाही त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागतो, तर मंगळवारी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे विक्रेते व ग्राहक येत असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर सतत वाहतुकीची कोंडी झालेली असते.नगरपालिकेकडून तीन वर्षांपूर्वी सम-विषम तारखेला पार्किंग करून वाहतुकीवर उपाय काढण्यात आला होता. फलकही लावण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे ते बारगळले. नवीन अधिकारी आल्यावर चार-पाच महिन्यांपूर्वी पोलीस अधिकारी नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन वाहतुकीवर उपाययोजना करण्यात आली होती. त्या वेळी शहरातील बाजारपेठेतील बाहेर आलेली अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला. काही नियमही ठरविण्यात आले. मात्र पोलीस व नगरपालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पुढे काहीच झाले नाही. ठरलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम त्यांनी केल्याने वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ राहिली आहे. भोर पोलीस ठाण्याकडून दोन पोलिसांची शहरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे पोलीस शहरातील वाहतुकीची कोंडी सुधारण्याऐवजी एसटी स्टँडवरील अवैध वाहतूक कशी सुरळीत चालेल, याकडे अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्याऐवजी अधिकच वाढत गेली आहे. याला पोलीस आणि नगरपालिकाच जबाबदार असल्याचे नागरिक सांगतात.