शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

भोरमधील वाहतूकसमस्या सुटणार कधी?

By admin | Updated: January 11, 2016 01:36 IST

रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व माल वाहतुकीच्या गाड्या, फळांच्या गाड्या, दुकानांचे फलक, रस्त्यावर बसलेले भाजीपाला, खेळणी, चप्पल व इतर विक्रते यामुळे खोळंबलेल्या

रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व माल वाहतुकीच्या गाड्या, फळांच्या गाड्या, दुकानांचे फलक, रस्त्यावर बसलेले भाजीपाला, खेळणी, चप्पल व इतर विक्रते यामुळे खोळंबलेल्या वाहतुकीतून धुराचा वास घेत जीव मुठीत धरून जावे लागते. पोलीस व भोर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे भोरवासीयांचा श्वास नेहमीच गुदमरतो. तो वाहतुकीच्या व प्रदूषणाच्या कोंडीतून सुटणार कधी? असा प्रश्न भोर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. भोर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नगरपालिका चौक ते एसटी स्टँडपर्यंतच्या रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने, बँका व कार्यालये आहेत. मात्र कोणत्याच इमारतीला पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्यांच्या गाड्या, दुकानांचा माल घेऊन आलेले ट्रक व बँकांत, कार्यालयांत येणारे याशिवाय दुकानदारांच्या गाड्या व दुकानांचे फलक यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. राजवाडा चौक, पंचायत समिती, नवी आळी, सम्राट चौक चौपाटी या परिसरातही वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याचाही त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागतो, तर मंगळवारी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे विक्रेते व ग्राहक येत असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर सतत वाहतुकीची कोंडी झालेली असते.नगरपालिकेकडून तीन वर्षांपूर्वी सम-विषम तारखेला पार्किंग करून वाहतुकीवर उपाय काढण्यात आला होता. फलकही लावण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे ते बारगळले. नवीन अधिकारी आल्यावर चार-पाच महिन्यांपूर्वी पोलीस अधिकारी नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन वाहतुकीवर उपाययोजना करण्यात आली होती. त्या वेळी शहरातील बाजारपेठेतील बाहेर आलेली अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला. काही नियमही ठरविण्यात आले. मात्र पोलीस व नगरपालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पुढे काहीच झाले नाही. ठरलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम त्यांनी केल्याने वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ राहिली आहे. भोर पोलीस ठाण्याकडून दोन पोलिसांची शहरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे पोलीस शहरातील वाहतुकीची कोंडी सुधारण्याऐवजी एसटी स्टँडवरील अवैध वाहतूक कशी सुरळीत चालेल, याकडे अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्याऐवजी अधिकच वाढत गेली आहे. याला पोलीस आणि नगरपालिकाच जबाबदार असल्याचे नागरिक सांगतात.