शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रुद्र गंगेवरील बंधारे दुरुस्त होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST

परिंचे : दक्षिण पुरंदरमधून वाहणाऱ्या रुद्र गंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत, पुरंदरमधील प्रशासनाकडून या ...

परिंचे : दक्षिण पुरंदरमधून वाहणाऱ्या रुद्र गंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत, पुरंदरमधील प्रशासनाकडून या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू होणार असून, या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम न झाल्यास रुद्रगंगा नदीत पाणी साठवणूक करणे अवघड जाणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.

दक्षिण पुरंदरमध्ये दहा सप्टेंबर दरम्यान कांबळवाडी, हरगुडे, पांगारे व परिंचे परिसरात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये कांबळवाडी, हरगुडे परिसरातील अनेक बंधारे, माती बांध फुटून शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी रुद्र गंगा नदीला कधी नव्हे एवढा मोठा पूर आला होता. या पुरात वाहून आलेली मोठी झाडेझुडपे नदीवरील बंधाऱ्यामध्ये अडकली आहेत. पुराचा प्रवाह मोठा असल्याने हे पाणी नदीपात्राशेजारील शेतात घुसून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही ठिकाणी नदीचे पात्र बदलले आहे. यादववाडी, परिंचे येथील स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

जलयुक्त शिवार योजनेतून गेल्या तीन वर्षापूर्वी रुंद्र गंगा नदीवर अनेक बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. याचा फायदा नदीकाठच्या गावांना झाला आहे. भूजल पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले. नदीला आलेल्या पुरात अनेक बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक बंधाऱ्यांना तडे गेले आहेत, अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत असून हे बंधारे दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे. बंधारे दुरुस्ती करण्याची मागणी परिंचे परिसरातील शेतकरी करत असून कृषी व मृद संधारण विभागाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तातडीने या फुटलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

फोटो : परिंचे (ता.पुरंदर) रुद्र गंगा नदीवरील अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत असून स्थानिक शेतकऱ्यांकडून दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.