शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

रुद्र गंगेवरील बंधारे दुरुस्त होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST

परिंचे : दक्षिण पुरंदरमधून वाहणाऱ्या रुद्र गंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत, पुरंदरमधील प्रशासनाकडून या ...

परिंचे : दक्षिण पुरंदरमधून वाहणाऱ्या रुद्र गंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत, पुरंदरमधील प्रशासनाकडून या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू होणार असून, या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम न झाल्यास रुद्रगंगा नदीत पाणी साठवणूक करणे अवघड जाणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.

दक्षिण पुरंदरमध्ये दहा सप्टेंबर दरम्यान कांबळवाडी, हरगुडे, पांगारे व परिंचे परिसरात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये कांबळवाडी, हरगुडे परिसरातील अनेक बंधारे, माती बांध फुटून शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी रुद्र गंगा नदीला कधी नव्हे एवढा मोठा पूर आला होता. या पुरात वाहून आलेली मोठी झाडेझुडपे नदीवरील बंधाऱ्यामध्ये अडकली आहेत. पुराचा प्रवाह मोठा असल्याने हे पाणी नदीपात्राशेजारील शेतात घुसून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही ठिकाणी नदीचे पात्र बदलले आहे. यादववाडी, परिंचे येथील स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

जलयुक्त शिवार योजनेतून गेल्या तीन वर्षापूर्वी रुंद्र गंगा नदीवर अनेक बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. याचा फायदा नदीकाठच्या गावांना झाला आहे. भूजल पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले. नदीला आलेल्या पुरात अनेक बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक बंधाऱ्यांना तडे गेले आहेत, अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत असून हे बंधारे दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे. बंधारे दुरुस्ती करण्याची मागणी परिंचे परिसरातील शेतकरी करत असून कृषी व मृद संधारण विभागाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तातडीने या फुटलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

फोटो : परिंचे (ता.पुरंदर) रुद्र गंगा नदीवरील अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत असून स्थानिक शेतकऱ्यांकडून दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.