शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

...इतक्या तुटपुंज्या रकमेत काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:15 IST

लोककलावंतांची शासनाकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल झाला असला तरी नाट्यगृहे अद्याप बंद आहेत आणि ...

लोककलावंतांची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल झाला असला तरी नाट्यगृहे अद्याप बंद आहेत आणि जत्रा, यात्रा, उत्सव रद्द करण्यात असल्याने हातावर पोट असलेल्या लोककलावंतांवर दीड वर्षांपासून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शासनाने लोककलावंतांना दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, या पैशात काय होणार आणि ही रक्कम किती लोककलावंतांना मिळणार? यातच कलावंतांकडून जनजागृतीचे कार्यक्रमही करून घेतले जाणार आहेत. त्यासाठी एका कार्यक्रमाला लोककलावंतांना केवळ सव्वाशे रूपये मिळणार आहेत. कलावंतांचा काही सन्मान ठेवणार का नाही? असा सवाल लोककलावंतांनी उपस्थित केला आहे. आम्हाला कार्यक्रम करण्याची किंवा आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी लोककलावंतांनी केली आहे.

गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या काळापासूनच लोककलावंतांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेक कलावंत भाजी विक्री, रिक्षा चालविणे, वडापावचा स्टॉल टाकणे, सेल्समन, गाडी धुणे, वॉचमन अशी कामे करून दिवस ढकलत आहेत. जत्रा, यात्रेचा सिझन हातचा गेला. आता गणेशोत्सवही साधेपणाने साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत जगायचं कसं? असे संकट लोककलावंतांसमोर उभे राहिले आहे. जिल्ह्यात ७० हजारांपेक्षा अधिक लोककलावंत आहेत. शासन किती कलावंतांना मदत करणार? त्यासाठी कोणते निकष लावणार? यावर अद्यापही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

चौकट

गेल्या दीड वर्षांपासून कार्यक्रमांवर बंदी असल्याने अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली आहे. सोनं-नाणं गहाण ठेवून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र अतिक्रमणवाल्यांनी गाडी उचलून नेल्याने महिन्याभरापासून काम बंद आहे. घराचे वीजबिल १७ हजार रूपये इतके आले आहे. पण पैसे भरण्याची ऐपत नसल्याने वीज कापण्यात आली आहे. शासनाने पाच हजार रूपये देण्याचे जाहीर केले आहे. पण या पैशात काय होणार? मुलांचे शिक्षण, घरखर्च कसा निघणार? त्यापेक्षा आम्हाला गणेशोत्सव, दसरा दिवाळीमध्ये कार्यक्रम करण्याची परवानगी द्या. त्यातून किमान सणासुदीला घरात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे शक्य होईल.”

-स्वाती पर्वे, लोकगायिका

चौकट

“सद्यस्थितीत मी तळेगाव दाभाडे येथे घराबाहेर नाश्त्याचा स्टॉल लावला आहे. माझ्या ग्रुपमधील अनेक मुली भाजीविक्रीचा व्यवसाय तर कुणी वॉचमन, सेल्समनचे काम करीत आहे. जिल्ह्यात अनेक लोककलावंत आहेत, त्यातील किती कलावंतांना मदत मिळणार हे माहिती नाही. आमचे नाव यादीत असेल तरच आमचे भाग्य असेल.”

-संगीता लाखे, लावणी नृत्यांगना

चौकट

“राज्य सरकार कलावंतांकडून जनजागृतीचे कार्यक्रमही करून घेणार आहे. मात्र, या कार्यक्रमांची पॉलिसी ही हास्यास्पद आहे. ‘एक नको पण कुत्रा आवर’ अशी शासनाची स्थिती आहे. एका कलावंतांना पाचशे रुपये दिले जाणार आणि चार वेगवेगळ्या गावांत जाऊन कलावंताने कार्यक्रम करायचे. याचा अर्थ एका कार्यक्रमासाठी कलावंताला सव्वाशे रुपये मिळणार. कलावंतांचा काही सन्मान ठेवणार की नाही? एखाद्या कामगारसुद्धा दिवसाला सातशे रूपये कमवतो. इतक्या तुटपुंज्या मानधनात काम करवून घेणे हा कलावंतांचा अपमान आहे. गेल्या दीड वर्षांपासून हाताला काम नाही. माझ्यावरही केटरिंगचा व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. शासन कलावंतांचा विचार करणार की नाही?”

- शाहीर हेमंत मावळे

चौकट

“दीड ते दोन वर्षांपूर्वी सव्वाशे संघटनांचे मिळून ‘महाकलामंडल’ स्थापन करण्यात आले. त्यामुळे आमच्याकडे सर्व कलावंतांची माहिती आहे. जिल्ह्यात लोककलावंतांची संख्या अधिक आहे. यासाठी लोककलावंतांची वर्गवारी व्हायला हवी. शासनाने जाहीर केलेली मदत योग्य कलावंतांपर्यंत पोहोचली पाहिजे.”

- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, नाट्य परिषद पुणे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ