शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

त्यांचा साहित्याशी काय संबंध?

By admin | Updated: October 30, 2015 00:24 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अशोक वाजपेयी बोलत आहेत; पण त्यांचा साहित्याशी संबंध काय, साहित्य क्षेत्रात योगदान काय

पुणे : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अशोक वाजपेयी बोलत आहेत; पण त्यांचा साहित्याशी संबंध काय, साहित्य क्षेत्रात योगदान काय, असा थेट सवाल ज्येष्ठ साहित्यिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी उपस्थित केला. कलबुर्गी यांची झालेली हत्या दुर्दैवी आहे. माझ्यावरही शाब्दीक हल्ले झाले, सनातनी ठरविले गेले. कर्नाटकात कॉँग्रेसेचे राज्य आहे, दादरीत डाव्या विचारसरणीचे राज्य आहे. असे असताना या घटनांना मोदी जबाबदार कसे, असेही ते म्हणाले.अक्षरधाराने आयोजित केलेल्या ५५०व्या दीपावली शब्दोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी भैरप्पा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात कन्नड अनुवादिका उमा कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उद्घाटन समारंभास प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. नरसिंह मांकडे उपस्थित होते.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या झाली. त्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले. सध्याचे वातारवण बघता साहित्यिकांनी काय करावे, या प्रश्नाला उत्तर देताना भैरप्पा म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डाव्या विचारसरणीचे राज्य आले. पंडित नेहरू डाव्या विचारसरणीचे होते. डाव्या विचारसरणीची कार्यपद्धती अवलंबली गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून नेहरूंची नातलग नयनतारा सेहगल यांनी पुरस्कार परत केला. त्यानंतर अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अर्जुनसिंह यांचे जवळचे असलेले अशोक वाजपेयी बोलत आहे. त्यांचे साहित्यात काय योगदान आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्या-त्या राज्यांची आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनांना मोदी जबाबदार कसे?डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘पारखा’ या कादंबरीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी या कादंबरीविषयी विवेचन केले. डॉ. मांडके, डॉ. बोरसे, प्रा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)