शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

त्यांचा साहित्याशी काय संबंध?

By admin | Updated: October 30, 2015 00:24 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अशोक वाजपेयी बोलत आहेत; पण त्यांचा साहित्याशी संबंध काय, साहित्य क्षेत्रात योगदान काय

पुणे : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अशोक वाजपेयी बोलत आहेत; पण त्यांचा साहित्याशी संबंध काय, साहित्य क्षेत्रात योगदान काय, असा थेट सवाल ज्येष्ठ साहित्यिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी उपस्थित केला. कलबुर्गी यांची झालेली हत्या दुर्दैवी आहे. माझ्यावरही शाब्दीक हल्ले झाले, सनातनी ठरविले गेले. कर्नाटकात कॉँग्रेसेचे राज्य आहे, दादरीत डाव्या विचारसरणीचे राज्य आहे. असे असताना या घटनांना मोदी जबाबदार कसे, असेही ते म्हणाले.अक्षरधाराने आयोजित केलेल्या ५५०व्या दीपावली शब्दोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी भैरप्पा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात कन्नड अनुवादिका उमा कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उद्घाटन समारंभास प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. नरसिंह मांकडे उपस्थित होते.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या झाली. त्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले. सध्याचे वातारवण बघता साहित्यिकांनी काय करावे, या प्रश्नाला उत्तर देताना भैरप्पा म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डाव्या विचारसरणीचे राज्य आले. पंडित नेहरू डाव्या विचारसरणीचे होते. डाव्या विचारसरणीची कार्यपद्धती अवलंबली गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून नेहरूंची नातलग नयनतारा सेहगल यांनी पुरस्कार परत केला. त्यानंतर अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अर्जुनसिंह यांचे जवळचे असलेले अशोक वाजपेयी बोलत आहे. त्यांचे साहित्यात काय योगदान आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्या-त्या राज्यांची आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनांना मोदी जबाबदार कसे?डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘पारखा’ या कादंबरीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी या कादंबरीविषयी विवेचन केले. डॉ. मांडके, डॉ. बोरसे, प्रा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)