शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत आक्षेप का? अनुपम खेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 23:08 IST

‘सिनेमाची तिकिटे, क्रिकेट सामना, हॉॅटेल यांसाठी रांगेत उभे राहायला आपली हरकत नसते. मात्र, राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत का आक्षेप नोंदवला जातो ,

पुणे : ‘सिनेमाची तिकिटे, क्रिकेट सामना, हॉॅटेल यांसाठी रांगेत उभे राहायला आपली हरकत नसते. मात्र, राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत का आक्षेप नोंदवला जातो ,’ असा सवाल करत, ‘आपण आई-वडील, शिक्षकांप्रती आदर दाखवतो, तोच देशाप्रती असायला हवा. ५२ सेकंदांत आपल्यातील माणूस आणि संस्कारांचे दर्शन घडते,’ असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते आणि एफटीआयआयचे चेअरमन अनुपम खेर यांनी व्यक्त केले.‘मुक्तछंद’ या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’साठी यशस्वी लढा देणाºया शायरा बानो यांना प्रदान करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे वितरण करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खासदार पूनम महाजन, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. नाहीद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.खेर म्हणाले, ‘चाहत्यांकडून मिळणारी दाद माझ्यातील अभिनेत्याला नव्हे, तर भारतीयाला असते. भारतीय म्हणून देशाविषयी बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे, मी कायम बोलत राहीन.’शायरा बानो म्हणाल्या, ‘महिला कुटुंब, समाज आणि राष्ट्रनिर्माणात मोलाची भूमिका बजावतात. त्यांच्या मूल्यांचे हनन होऊ नये, यासाठी नवनिर्मित समाजाची गरज आहे. यापुढील आयुष्यही समाजाच्या विकासासाठी समर्पित करण्याचा मानस आहे.’कार्यक्रमाच्या आयोजक मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘आकाशाकडे झेपावण्याचे क्षण निर्माण करणाºया मोजक्याच व्यक्ती आजूबाजूला पाहायला मिळतात. अशी असामान्य आणि प्रभावशील माणसे सामान्यांना आयुष्यात प्रेरणा देत असतात. त्यांचा वारसा आपण चालवला पाहिजे आणि असामान्य कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे.’ राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.प्रकाश जावडेकर म्हणाले, की अनुपम खेर, शायरा बानो यांच्या रुपाने देशाला महान रत्ने लाभली आहेत. आजकाल राष्ट्रभक्तीबाबत बोलणाºयांना प्रतिगामी, तर इतरांना पुरोगामी म्हणण्याची नवी व्याख्या अस्तित्वात आली आहे. खेर यांनी ही भाषा मोडीत काढली. बानो यांनी महिलांच्या हक्कासाठी दिलेला लढा कौैतुकास्पद आहे. सभ्य समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्त्री-पुरुष समानता रुजायला हवी.गिरीश बापट म्हणाले, प्रमोद महाजन हे राजकारणातील बापमाणूस होते. केवळ वक्तृत्वात नव्हे, तर कर्तृत्वातही आघाडीवर होते. राजकारणात काम करणाºया प्रत्येकाने त्यांचा आदर्श डोळ््यांसमोर ठेवायला हवा. त्यांच्या नावाचा पुरस्कारही अत्यंत योग्य व्यक्तीला मिळाला. सध्या एफटीआयआयमध्ये खूप काम करण्याची गरज आहे. त्यामुळे अनुपम खेर यांची निवड अत्यंत योग्य आहे. पालकमंत्री म्हणून संस्थेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न असेल.पूनम महाजन म्हणाल्या, मी केवळ नावाने ‘महाजन’ आहे. मात्र, प्रमोद महाजन यांचा वारसा मेधा कुलकर्णी खºया अर्थाने पुढे नेत आहेत. आजकाल असहिष्णुतेच्या नावाखाली कला, साहित्याची वर्गवारी केली जाते. राजकारणाच्या नावाखाली वाटल्या गेलेल्या लोकांना अनुपम खेर यांच्यामुळे कला, संस्कृती, साहित्याचे महत्त्व समजेल. शायरा बानो यांनी महिला आणि माणुसकीसाठी काम केले आहे.

टॅग्स :FTIIएफटीआयआयAnupam Kherअनुपम खेर