शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उंबरा तेवढा शिल्लक ‘घराचे’ काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 02:05 IST

नवीन घरांची उभारणी करा; पीडितांची मागणी : शासनाची मदत आमच्यापर्यंत येईल का?

पुणे : कुठं दरड पडली, भूकंप झाला, पूर आला असं काही झालं तर शासनाकडून मदत होते. यात वेगळं काही नाही. मात्र त्या मदतीचा फायदा गरजुंनाच होत असल्याचे दिसून येत नाही. मुळा कालव्यातील दुर्घटनेत ज्यांची घरे वाहून गेली अशांना नुकसान भरपाई देण्याचे शासनाने व पालिकेने कबुल केले आहे. यावर पीडितांनी ती मदत फारच अपुरी असून आपल्याला नवीन घर बांधून देण्याची मागणी केली आहे. तसेच पंचनामे करून घेण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची, असा प्रश्न उपस्थित करून जाहीर केलेली मदत आमच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहनदेखील केले आहे.

गुरुवारी दांडेकर पुलाजवळ मुठा कालव्याला भगदाड पडून वेगाने पाण्याचा प्रवाह झोपडपट्टीवस्तीत शिरला. यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर तातडीने पालिका व जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी मदत पुरवली. या मदतीमुळे सध्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीविषयी मात्र अनेक पीडितांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सगळा संसार पाण्यात वाहून गेला असताना पालिकेकडून ११ व ६ हजारांची देण्यात येणारी मदत कितपत पुरणार, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय अनेकांचे पंचनामे अद्याप बाकी असून ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. दरवेळी पालिका व प्रशासनाकडून मदत जाहीर केली जाते. परंतु प्रत्यक्षात ती मिळण्याची शाश्वती शंकास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाची मदत याविषयी माहिती देताना स्थानिक रहिवासी महेश ननावरे यांनी सांगितले, पाण्याच्या प्रवाहात ज्यांची घरे गेली आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने घरे मिळण्याची व्यवस्था पालिकेने करावी. आपला सगळा संसार पाण्यात गेला असताना प्रशासनाने कमी मदत देवून उगाच त्यांची थट्टा करू नये. प्रमोद कुंभार यांचे दांडेकर पुलवस्ती या ठिकाणी स्वत:च्या मालकीचे गॅरेज असून त्यांनी अद्याप अनेक गाड्यांचे पंचनामे बाकी असल्याचे सांगितले. जोरदार पाण्याच्या प्रवाहाने अनेक गाड्यांची इंजिने वाहून गेली. दरम्यान, दोन दिवसानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी अद्याप स्वच्छता बाकी होती. त्यामुळे मोठी दुर्गंधी पसल्याने त्वरित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. कालवा फुटीनंतर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शनिवारपर्यंत तो बंदच असल्याचे दिसून आले. तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होता.तातडीने घर द्या... बाकीचे कष्टाने मिळवूघरातील ज्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या त्यांची किंमत पालिकेने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. ६ आणि १२ हजारांच्या मदतीने काय होणार आहे? वाटल्यास ते पैसे देऊ नका. पण आमची घरे तेवढी लवकरात लवकर बांधून द्या. बाकी आम्ही आमचे कष्टाने मिळवू. जिथे घरातला देव वाचविण्यासाठी वेळ नाही मिळाला तिथे मौल्यवान वस्तुंची काय गोष्ट. घरातली माणसे वाचली हेच महत्त्वाचे, अशी आर्त भावना पीडित सिंधू जाधव यांनी व्यक्त केली.वस्तीत पुन्हा शिरले पाणीशनिवारी दुपारी दुरुस्तीच्या कामाकरिता कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. यामुळे पुन्हा या वस्तीतील काही ठिकाणी पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला. 

टॅग्स :Puneपुणे