शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

पुरोगामी महाराष्ट्राच्या वाडमयीन संस्कृतीचे भवितव्य काय : ना.धों.महानोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:11 IST

शासनाकडे इतर कामांसाठी पैैसे आहेत, मात्र ग्रंथालयांसाठी नाहीत. ग्रंथालयांची ही अवस्था पाहून अस्वस्थता येते.

पुणेसरकार आमदार, खासदारांना भरघोस निधी देते, मग वाचनालयांबाबत उदासिनता का? गेल्या तीन वर्षात साडेबारा हजारांपैकी पाच हजार ग्रंथालये बंद केली. तीन वर्षांपासून सहा हजार ग्रंथालयांना किरकोळ कारणांवरुन अनुदान मिळालेले नाही. ग्रंथालयांसाठी शासनाकडे पैसे नाहीत, ही पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे. न्यायालयाने फटकारले असूनही तीन वर्षे मठ्ठपणे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या वाड.मयीन संस्कृतीचे काय होणार, असा सवाल ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी उपस्थित केला. शासनाकडे इतर कामांसाठी पैैसे आहेत, मात्र ग्रंथालयांसाठी नाहीत. ग्रंथालयांची ही अवस्था पाहून अस्वस्थता येते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

              एसएनडीटी पदव्युत्तर मराठी विभाग आणि समकालीन प्रकाशनाच्या वतीने चंद्रकांत पाटील आणि केशव तुपे संपादित ‘लोचना आणि आलोचना’ या पुस्तकाविषयी मुक्त संवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर आणि लेखक-समीक्षक रेखा इनामदार-साने, मराठी विभागप्रमुख प्रताप गायकवाड, चंद्रकात पाटील, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

               महानोर म्हणाले, ‘घरोघरी टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरसाठी जागा आहे, मात्र पुस्तकांसाठी कोनाडा नाही. नातेसंबंध, अर्थकारणाप्रमाणे सामान्यांच्या आयुष्यात ज्ञानप्रक्रियेलाही जागा व्हायला हवी. ज्ञानाच्या प्रक्रियेतून जगण्याला अर्थ प्राप्त होतो. साहित्य संमेलनाला २५,००० लोक येतात. त्यापैैकी १०,००० लोक १० पुस्तकेही खरेदी करत नाहीत. अशी परिस्थिती असेल तर वाचनसंस्कृती वृध्दिंगत कशी होणार? पुरोगामी महाराष्ट्रात हा विचार का रुजत नाही? पुस्तके घरात विराजमान का होत नाहीत? वाचकच उरलेला नाही, तरुणांचे काय करायचे, ते समजत नाही.  साहित्यानेच समाज, राष्ट्राची उभारणी झाली आहे. साहित्यिक, वाचक, विद्यार्थी पुन्हा जागे होतील आणि वैैचारिक वाड.मय नव्याने निर्माण होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’

              इनामदार-साने म्हणाल्या, ‘श्याम मनोहर आपल्या लेखनातून वाचकांसमोर आव्हाने निर्माण करतात. अज्ञाताच्या शोधासाठी कोणती अभ्यासपद्धती अवलंबता येईल, याचा अंदाज येतो. भावना आणि बौद्धिकता, व्यक्ती आणि व्यवस्था, धर्म आणि धर्मनिरपेक्षता यांचा मिलाप या दिशादर्शक साहित्यात पहायला मिळतो. साहित्य व्यवहारातील चांगल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कथानक हा साहित्याचा गाभा असतो. एका आशयसूत्राला अनेक धाग्यांनी घातलेली वीण सशक्त लेखनात पहायला मिळते. उत्स्फूर्तता हे आश्वासक समीक्षेचे द्योतक आहे. याउलट, आस्वादन समीक्षेने लेखक अनेकदा भारावून जातात.’यावेळी महानोर यांनी संपादित केलेल्या ‘गपसप’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. प्रताप गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आनंद अवधानी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. नागनाथ बळते यांनी सूत्रसंचालन केले.

कुसुमाग्रजांची कविता वा.चो.देशपांडे यांच्या नावाने

मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये कुसुमाग्रजांची कविता वा.चो.देशपांडे यांच्या नावाने छापण्यात आली. ते पाहून धक्का बसला, याबाबत विचारणा केली असता  शासनाने नियुक्त केलेल्या सात साहित्यिकांच्या संपादक मंडळाने ते पुस्तक तपासल्याची माहिती मिळाली. त्याबाबत विचारणा केली असता, एका बार्इंनी ‘तुम्ही आमदार आहात, तुमहाला काय कळते’ असे विचारले असता ‘अहो, मी आधी कवी आहे’, असे दुर्देवाने सांगावे लागल्याचा किस्सा महानोर यांनी सांगितला.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकmarathiमराठीGovernmentसरकार