शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
4
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
5
IND vs AUS : "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
6
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
7
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
8
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
9
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
10
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
11
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
12
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
13
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
14
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
15
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
16
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
17
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
18
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
19
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
20
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 

पुरोगामी महाराष्ट्राच्या वाडमयीन संस्कृतीचे भवितव्य काय : ना.धों.महानोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:11 IST

शासनाकडे इतर कामांसाठी पैैसे आहेत, मात्र ग्रंथालयांसाठी नाहीत. ग्रंथालयांची ही अवस्था पाहून अस्वस्थता येते.

पुणेसरकार आमदार, खासदारांना भरघोस निधी देते, मग वाचनालयांबाबत उदासिनता का? गेल्या तीन वर्षात साडेबारा हजारांपैकी पाच हजार ग्रंथालये बंद केली. तीन वर्षांपासून सहा हजार ग्रंथालयांना किरकोळ कारणांवरुन अनुदान मिळालेले नाही. ग्रंथालयांसाठी शासनाकडे पैसे नाहीत, ही पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे. न्यायालयाने फटकारले असूनही तीन वर्षे मठ्ठपणे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या वाड.मयीन संस्कृतीचे काय होणार, असा सवाल ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी उपस्थित केला. शासनाकडे इतर कामांसाठी पैैसे आहेत, मात्र ग्रंथालयांसाठी नाहीत. ग्रंथालयांची ही अवस्था पाहून अस्वस्थता येते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

              एसएनडीटी पदव्युत्तर मराठी विभाग आणि समकालीन प्रकाशनाच्या वतीने चंद्रकांत पाटील आणि केशव तुपे संपादित ‘लोचना आणि आलोचना’ या पुस्तकाविषयी मुक्त संवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर आणि लेखक-समीक्षक रेखा इनामदार-साने, मराठी विभागप्रमुख प्रताप गायकवाड, चंद्रकात पाटील, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

               महानोर म्हणाले, ‘घरोघरी टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरसाठी जागा आहे, मात्र पुस्तकांसाठी कोनाडा नाही. नातेसंबंध, अर्थकारणाप्रमाणे सामान्यांच्या आयुष्यात ज्ञानप्रक्रियेलाही जागा व्हायला हवी. ज्ञानाच्या प्रक्रियेतून जगण्याला अर्थ प्राप्त होतो. साहित्य संमेलनाला २५,००० लोक येतात. त्यापैैकी १०,००० लोक १० पुस्तकेही खरेदी करत नाहीत. अशी परिस्थिती असेल तर वाचनसंस्कृती वृध्दिंगत कशी होणार? पुरोगामी महाराष्ट्रात हा विचार का रुजत नाही? पुस्तके घरात विराजमान का होत नाहीत? वाचकच उरलेला नाही, तरुणांचे काय करायचे, ते समजत नाही.  साहित्यानेच समाज, राष्ट्राची उभारणी झाली आहे. साहित्यिक, वाचक, विद्यार्थी पुन्हा जागे होतील आणि वैैचारिक वाड.मय नव्याने निर्माण होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’

              इनामदार-साने म्हणाल्या, ‘श्याम मनोहर आपल्या लेखनातून वाचकांसमोर आव्हाने निर्माण करतात. अज्ञाताच्या शोधासाठी कोणती अभ्यासपद्धती अवलंबता येईल, याचा अंदाज येतो. भावना आणि बौद्धिकता, व्यक्ती आणि व्यवस्था, धर्म आणि धर्मनिरपेक्षता यांचा मिलाप या दिशादर्शक साहित्यात पहायला मिळतो. साहित्य व्यवहारातील चांगल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कथानक हा साहित्याचा गाभा असतो. एका आशयसूत्राला अनेक धाग्यांनी घातलेली वीण सशक्त लेखनात पहायला मिळते. उत्स्फूर्तता हे आश्वासक समीक्षेचे द्योतक आहे. याउलट, आस्वादन समीक्षेने लेखक अनेकदा भारावून जातात.’यावेळी महानोर यांनी संपादित केलेल्या ‘गपसप’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. प्रताप गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आनंद अवधानी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. नागनाथ बळते यांनी सूत्रसंचालन केले.

कुसुमाग्रजांची कविता वा.चो.देशपांडे यांच्या नावाने

मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये कुसुमाग्रजांची कविता वा.चो.देशपांडे यांच्या नावाने छापण्यात आली. ते पाहून धक्का बसला, याबाबत विचारणा केली असता  शासनाने नियुक्त केलेल्या सात साहित्यिकांच्या संपादक मंडळाने ते पुस्तक तपासल्याची माहिती मिळाली. त्याबाबत विचारणा केली असता, एका बार्इंनी ‘तुम्ही आमदार आहात, तुमहाला काय कळते’ असे विचारले असता ‘अहो, मी आधी कवी आहे’, असे दुर्देवाने सांगावे लागल्याचा किस्सा महानोर यांनी सांगितला.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकmarathiमराठीGovernmentसरकार