शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी, बोअरवेलची पातळी खालावली

By admin | Updated: April 25, 2017 03:57 IST

शेतकऱ्यांच्या हातातील आणि नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वाढला आहे

खोडद : शेतकऱ्यांच्या हातातील आणि नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षीदेखील जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. चालू वर्षी कडाक्याचा उन्हाळा आणि तापमानात झालेली प्रचंड वाढ, यामुळे टोमॅटो आणि अन्य पिकांची काळजी घेता घेता बळीराजाची दमछाक झाली आहे.त्यातच भर म्हणजे, चालू वर्षी तालुक्यातील विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असल्याने पाण्याअभावी शेतातील टोमॅटो आणि इतर पिके जगविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र गावोगावी पाहावयास मिळत आहे.सध्या जुन्नर तालुक्यात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्याप्रमाणात खालावत आहे. जमिनीतील पाणी मिळेल, या आशेने शेतकरी दररोज ५० ते ७० ठिकाणी बोअरवेल खोदत आहेत. पण, पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ६०० फूट खोल बोअरवेलसाठी १८,००० ते ३०,००० रुपये खर्च होत आहेत. पूर्वी ५० ते १०० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे बारमाही विहिरी आठमाही झाल्या आहेत. यामुळे विहीर बागायत कमी होऊन बोअरचे प्रमाण वाढले आहे.या वर्षी हवामान विभागाने, आंतरराष्ट्रीय संस्थांनी मॉन्सून चांगले होण्याचे संकेत दिले आहेत. या सुविधांचा फायदा घेण्याची हीच वेळ आहे. रोजगार हमी योजनेमध्ये जुन्या नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. कारण, राज्यातील सर्व विभागातील पाणीपातळी ४ते ७ मीटर घटल्याची नोंद आहे. शास्त्रीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल. यातूनच दुष्काळ या समस्येवर कायमचा शाश्वत उपाय सापडू शकेल, असे कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.(वार्ताहर)