शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

विहिरी, बोअरवेलची पातळी खालावली

By admin | Updated: April 25, 2017 03:57 IST

शेतकऱ्यांच्या हातातील आणि नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वाढला आहे

खोडद : शेतकऱ्यांच्या हातातील आणि नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षीदेखील जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. चालू वर्षी कडाक्याचा उन्हाळा आणि तापमानात झालेली प्रचंड वाढ, यामुळे टोमॅटो आणि अन्य पिकांची काळजी घेता घेता बळीराजाची दमछाक झाली आहे.त्यातच भर म्हणजे, चालू वर्षी तालुक्यातील विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असल्याने पाण्याअभावी शेतातील टोमॅटो आणि इतर पिके जगविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र गावोगावी पाहावयास मिळत आहे.सध्या जुन्नर तालुक्यात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्याप्रमाणात खालावत आहे. जमिनीतील पाणी मिळेल, या आशेने शेतकरी दररोज ५० ते ७० ठिकाणी बोअरवेल खोदत आहेत. पण, पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ६०० फूट खोल बोअरवेलसाठी १८,००० ते ३०,००० रुपये खर्च होत आहेत. पूर्वी ५० ते १०० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे बारमाही विहिरी आठमाही झाल्या आहेत. यामुळे विहीर बागायत कमी होऊन बोअरचे प्रमाण वाढले आहे.या वर्षी हवामान विभागाने, आंतरराष्ट्रीय संस्थांनी मॉन्सून चांगले होण्याचे संकेत दिले आहेत. या सुविधांचा फायदा घेण्याची हीच वेळ आहे. रोजगार हमी योजनेमध्ये जुन्या नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. कारण, राज्यातील सर्व विभागातील पाणीपातळी ४ते ७ मीटर घटल्याची नोंद आहे. शास्त्रीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल. यातूनच दुष्काळ या समस्येवर कायमचा शाश्वत उपाय सापडू शकेल, असे कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.(वार्ताहर)