शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

विहिरी, बोअरवेलची पातळी खालावली

By admin | Updated: April 25, 2017 03:57 IST

शेतकऱ्यांच्या हातातील आणि नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वाढला आहे

खोडद : शेतकऱ्यांच्या हातातील आणि नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षीदेखील जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. चालू वर्षी कडाक्याचा उन्हाळा आणि तापमानात झालेली प्रचंड वाढ, यामुळे टोमॅटो आणि अन्य पिकांची काळजी घेता घेता बळीराजाची दमछाक झाली आहे.त्यातच भर म्हणजे, चालू वर्षी तालुक्यातील विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असल्याने पाण्याअभावी शेतातील टोमॅटो आणि इतर पिके जगविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र गावोगावी पाहावयास मिळत आहे.सध्या जुन्नर तालुक्यात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्याप्रमाणात खालावत आहे. जमिनीतील पाणी मिळेल, या आशेने शेतकरी दररोज ५० ते ७० ठिकाणी बोअरवेल खोदत आहेत. पण, पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ६०० फूट खोल बोअरवेलसाठी १८,००० ते ३०,००० रुपये खर्च होत आहेत. पूर्वी ५० ते १०० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे बारमाही विहिरी आठमाही झाल्या आहेत. यामुळे विहीर बागायत कमी होऊन बोअरचे प्रमाण वाढले आहे.या वर्षी हवामान विभागाने, आंतरराष्ट्रीय संस्थांनी मॉन्सून चांगले होण्याचे संकेत दिले आहेत. या सुविधांचा फायदा घेण्याची हीच वेळ आहे. रोजगार हमी योजनेमध्ये जुन्या नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. कारण, राज्यातील सर्व विभागातील पाणीपातळी ४ते ७ मीटर घटल्याची नोंद आहे. शास्त्रीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल. यातूनच दुष्काळ या समस्येवर कायमचा शाश्वत उपाय सापडू शकेल, असे कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.(वार्ताहर)