शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हे तालुका आजही विकासापासून दूरच'

By admin | Updated: February 13, 2017 01:24 IST

वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले राजगड व किल्ले तोरणा अद्यापही पर्यटनाचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर अठरा व बारा गाव मावळ परिसर विकासापासूनच

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले राजगड व किल्ले तोरणा अद्यापही पर्यटनाचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर अठरा व बारा गाव मावळ परिसर विकासापासूनच आजही दूरच राहिला असल्याचे चित्र सध्या वेल्हे तालुक्यात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी झालेली विकासकामे केवळ कागदवरच झाली आहेत.गुंजवणी धरणाबाबत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण केले असून गुंजवणीचे पाणी तालुक्यातील वाजेघर, (बारा गाव मावळ) पासली केळद (अठरा गाव मावळ) तसेच वांगणी परिसर, रांजणे, कोंडगाव परिसरात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते. तालुक्यात तीन धरणे असुनही या भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परीस्थिती वेल्ह्यातील जनतेची झाली आहे. आगामी काळात धरणातील पाण्याचे केवळ राजकारणच होणार का? किंवा मुठभर लोकांच्या राजकीय स्वाथार्साठी बंद पाईपलाईनमधून पुरंदरला जाणार का? वेल्हे तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थांना पाणी कसे मिळणार, याबाबत तालुक्यातील सत्ताधारी पक्ष गप्प का? तर विरोधी पक्षांची भूमिका बजावणारे देखील मूग गिळून गप्प बसले आहेत.वेल्हे तालुक्यास निसर्गाने अद्भूत असे सौंदर्य दिले असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांत छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक असे लोकप्रिय किल्ले राजगड व तोरणा याच तालुक्यात आहे. मात्र पर्यटनस्थळे करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे दिसत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आजपर्यंत येथील मावळ्यांचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता किंवा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. हा तालुक्यातील मावळा पुणे, मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि कुल्फी, चहा विक्रेता तसचे मार्केट यार्डात किंवा वाशी मार्केटमध्ये हमाली करताना दिसत आहे. वेल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रोजगार निर्मितीचे साधन नसल्याने येथील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतर होताना दिसत आहे. तर येथील अनेक शेतकरी तालुक्यातील आपली शेती विकून भूमिहीन होत आहेत.तालुक्यामध्ये राजकारण करणारे अनेक राजकीय नेते पुणे शहरात स्थायिक असून तेथूनच तालुक्याचा कारभार चालविला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असून अजुनही येथील राजकीय नेते हे तालुक्यातील रस्ता, पाणी, वीज याच मुद्यावर निवडणुका लढवित आहेत.