शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

वेल्हे तालुका आजही विकासापासून दूरच'

By admin | Updated: February 13, 2017 01:24 IST

वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले राजगड व किल्ले तोरणा अद्यापही पर्यटनाचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर अठरा व बारा गाव मावळ परिसर विकासापासूनच

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले राजगड व किल्ले तोरणा अद्यापही पर्यटनाचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर अठरा व बारा गाव मावळ परिसर विकासापासूनच आजही दूरच राहिला असल्याचे चित्र सध्या वेल्हे तालुक्यात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी झालेली विकासकामे केवळ कागदवरच झाली आहेत.गुंजवणी धरणाबाबत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण केले असून गुंजवणीचे पाणी तालुक्यातील वाजेघर, (बारा गाव मावळ) पासली केळद (अठरा गाव मावळ) तसेच वांगणी परिसर, रांजणे, कोंडगाव परिसरात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते. तालुक्यात तीन धरणे असुनही या भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परीस्थिती वेल्ह्यातील जनतेची झाली आहे. आगामी काळात धरणातील पाण्याचे केवळ राजकारणच होणार का? किंवा मुठभर लोकांच्या राजकीय स्वाथार्साठी बंद पाईपलाईनमधून पुरंदरला जाणार का? वेल्हे तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थांना पाणी कसे मिळणार, याबाबत तालुक्यातील सत्ताधारी पक्ष गप्प का? तर विरोधी पक्षांची भूमिका बजावणारे देखील मूग गिळून गप्प बसले आहेत.वेल्हे तालुक्यास निसर्गाने अद्भूत असे सौंदर्य दिले असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांत छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक असे लोकप्रिय किल्ले राजगड व तोरणा याच तालुक्यात आहे. मात्र पर्यटनस्थळे करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे दिसत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आजपर्यंत येथील मावळ्यांचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता किंवा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. हा तालुक्यातील मावळा पुणे, मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि कुल्फी, चहा विक्रेता तसचे मार्केट यार्डात किंवा वाशी मार्केटमध्ये हमाली करताना दिसत आहे. वेल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रोजगार निर्मितीचे साधन नसल्याने येथील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतर होताना दिसत आहे. तर येथील अनेक शेतकरी तालुक्यातील आपली शेती विकून भूमिहीन होत आहेत.तालुक्यामध्ये राजकारण करणारे अनेक राजकीय नेते पुणे शहरात स्थायिक असून तेथूनच तालुक्याचा कारभार चालविला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असून अजुनही येथील राजकीय नेते हे तालुक्यातील रस्ता, पाणी, वीज याच मुद्यावर निवडणुका लढवित आहेत.