शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

वेल्हे तालुका आजही विकासापासून दूरच'

By admin | Updated: February 13, 2017 01:24 IST

वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले राजगड व किल्ले तोरणा अद्यापही पर्यटनाचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर अठरा व बारा गाव मावळ परिसर विकासापासूनच

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले राजगड व किल्ले तोरणा अद्यापही पर्यटनाचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर अठरा व बारा गाव मावळ परिसर विकासापासूनच आजही दूरच राहिला असल्याचे चित्र सध्या वेल्हे तालुक्यात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी झालेली विकासकामे केवळ कागदवरच झाली आहेत.गुंजवणी धरणाबाबत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण केले असून गुंजवणीचे पाणी तालुक्यातील वाजेघर, (बारा गाव मावळ) पासली केळद (अठरा गाव मावळ) तसेच वांगणी परिसर, रांजणे, कोंडगाव परिसरात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते. तालुक्यात तीन धरणे असुनही या भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परीस्थिती वेल्ह्यातील जनतेची झाली आहे. आगामी काळात धरणातील पाण्याचे केवळ राजकारणच होणार का? किंवा मुठभर लोकांच्या राजकीय स्वाथार्साठी बंद पाईपलाईनमधून पुरंदरला जाणार का? वेल्हे तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थांना पाणी कसे मिळणार, याबाबत तालुक्यातील सत्ताधारी पक्ष गप्प का? तर विरोधी पक्षांची भूमिका बजावणारे देखील मूग गिळून गप्प बसले आहेत.वेल्हे तालुक्यास निसर्गाने अद्भूत असे सौंदर्य दिले असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांत छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक असे लोकप्रिय किल्ले राजगड व तोरणा याच तालुक्यात आहे. मात्र पर्यटनस्थळे करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे दिसत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आजपर्यंत येथील मावळ्यांचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता किंवा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. हा तालुक्यातील मावळा पुणे, मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि कुल्फी, चहा विक्रेता तसचे मार्केट यार्डात किंवा वाशी मार्केटमध्ये हमाली करताना दिसत आहे. वेल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रोजगार निर्मितीचे साधन नसल्याने येथील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतर होताना दिसत आहे. तर येथील अनेक शेतकरी तालुक्यातील आपली शेती विकून भूमिहीन होत आहेत.तालुक्यामध्ये राजकारण करणारे अनेक राजकीय नेते पुणे शहरात स्थायिक असून तेथूनच तालुक्याचा कारभार चालविला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असून अजुनही येथील राजकीय नेते हे तालुक्यातील रस्ता, पाणी, वीज याच मुद्यावर निवडणुका लढवित आहेत.