शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदा विरोधातील जनजागरण यात्रेचे शिरूर शहरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST

केंद्र शासनाच्या कृषी कायदा विरोधातील जनजागरण करणाऱ्या पोलखोल यात्रेचे शिरूर शहरात स्वागत करण्यात आले. शिरूर कृषी उत्पन्न ...

केंद्र शासनाच्या कृषी कायदा विरोधातील

जनजागरण करणाऱ्या पोलखोल यात्रेचे शिरूर शहरात स्वागत करण्यात आले.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुणतांबा येथून आलेल्या या यात्रेचे स्वागत बाजार समितीचा आवारात लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक यानी केले. या वेळी लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष ॲड ओमप्रकाश सतीजा, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मोहम्मद हुसेन पटेल, शिवाजीराव खेडकर, ॲड. विक्रम पाचंगे, खुशाल गाडे, वसंत बेंद्रे, डॉ. सुभाष गवारी, दीपक गायकवाड, अझिम सय्यद या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात जनजागृतीसाठी निघालेली पोलखोल यात्रा आज शिरूर शहरात आली. या यात्रेत संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी संदीप गिड्डे, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्ष्मण वंगे, प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर,अरुण कान्होरे, नितीन थोरात सहभागी झाले होते.

या पोलखोल यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाचे नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी कसे आहेत, याबाबत जनजागरण करण्यात येणार आहे. ही यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार असून या यात्रेचा समारोप २० जानेवारीला नांदेड येथे होणार आहे.

या वेळी बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी सांगितले की,

केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. असे सरकारला वाटत आहे. सरकार या गोष्टीवर ठाम आहे. तसेच

शेतीमालाच्या

निर्धारित किमतींची शेतक-यांची आग्रही मागणी असताना

सरकार सकारात्मक नसल्याने शेतकरी आंदोलनाची कोंडी अद्याप कायम आहे.

मात्र, वास्तविक पाहता हे कायदे ना शेतकऱ्यांच्या ना ग्राहकांच्या हिताचे आहेत. या कृषी कायद्याचा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना फटका बसणार असून दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन देशातील आहे असा दावा त्यांनी केला. हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पोलखोल यात्रा काढण्यात आल्याचे गिड्डे यांनी स्पष्ट केले.

दिल्ली येथील शेतक-यांचे आंदोलन संपूर्ण देशभरातील शेतक-यांचे आहे. जास्तीजास्त शेतक-यांनी या पोलखोल यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन थोरात यानी केले.

शिरूर येथे पोलखोल यात्रा शहरात आली असता तिचे स्वागत करण्यात आले.