शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आम्हाला विमानतळ नकोच!; पुरंदरच्या सात गावांतील रहिवाशांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:35 IST

राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षभरात केंद्र शासन व संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ व्हावा, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळविल्या आहेत. त्यामुळे विमानतळाचा मार्ग मोकळा झाला; परंतु स्थानिक नागरिकांनी विमानतळासाठी आपल्या शेतजमिनी देण्यास स्पष्ट नकार दर्शवून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढला.

पुणे : राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षभरात केंद्र शासन व संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ व्हावा, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळविल्या आहेत. त्यामुळे विमानतळाचा मार्ग मोकळा झाला; परंतु स्थानिक नागरिकांनी विमानतळासाठी आपल्या शेतजमिनी देण्यास स्पष्ट नकार दर्शवून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढला.पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी ७ गावांतील रहिवाशांची जमीन जाणार आहे. या ग्रामस्थांनी विमानतळविरोधी जनसंघर्ष समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून पारगाव, खानवडी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर आणि मंजवडी येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विमानतळाच्या विरोधातील निवेदन दिले. तसेच, पुरंदरचे स्थानिक आमदार व राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या विरोधातही घोषणा दिल्या. पुरंदर भागातील जमिनी ओलिताखाली आल्या आहेत.प्रकल्पांसाठी बागायती जमिनी घेतल्या जाऊ नयेत, असाकायदा आहे. तसेच, शेतीवरच आमची उपजीविका असल्यानेजमीन गेल्यानंतर आम्ही कसेजगणार? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.लवकरच बाधित गावांत जाऊन साधणार संवाद- ‘आम्ही तुमच्याकडे विमानतळ मागायला आलो नव्हतो. तुम्हाला विमानतळ करायचेच असेल तर शासकीय जमिनीवर करा, शेतकºयांच्या बागायती जमिनी घेऊ नका,’ अशी भूमिका आंदोलकांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावर राव यांनी आंदोलकांचे म्हणाणे ऐकून घेतले.- पुरंदर विमानतळासाठी घेतल्या जाणाºया जमिनीसाठी चांगला मोबदला दिला जाईल; त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊनये, असे आवाहन सौरभ राव यांनी केले.

 

टॅग्स :Puneपुणे