शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

आम्ही ‘अस्वच्छ’च बरे!

By admin | Updated: July 28, 2016 04:06 IST

गेल्या काही वर्षांत शहराची घनकचरा समस्या सर्वाधिक गंभीर बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला पुणेकरांच्या सहभागाचीही आवश्यकता असल्याने १ मे २०१६ रोजी महापालिकेने

- सुनील राऊत,  पुणे

गेल्या काही वर्षांत शहराची घनकचरा समस्या सर्वाधिक गंभीर बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला पुणेकरांच्या सहभागाचीही आवश्यकता असल्याने १ मे २०१६ रोजी महापालिकेने नागरी सहभागासाठी जाहीर केलेल्या ‘स्वच्छ’ पुरस्कारांला पुणेकरांनीच राम राम ठोकला आहे. या पुरस्कारात सहभागी होण्यासाठी महापालिकेने १ मे २०१६ ते १ आॅगस्ट २०१६ ही तीन महिन्यांची मुदत जाहीर केली होती. मात्र, मुदत संपण्यास अवघे चार दिवस उरले असतानाही; या पुरस्कारासाठी एकही अर्ज आलेला नाही. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, शौचालये, तसेच कचरा व्यवस्थापनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोसायट्या, कुटुंब, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक संस्था तसेच खासगी संस्था अशा सहा प्रकारांमध्ये अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. मात्र, दिलेली मुदत संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना एकही प्रवेशिका न आल्याने ही पुरस्कार योजना गुंडाळण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. पालिकेवर राहिला नाही विश्वास...शहरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत महापालिकेकडून दरवर्षी जवळपास तीनशे कोटींहून अधिक रुपये खर्च केले जातात. त्यानंतरही पालिकेस कचरा व्यवस्थापनासाठी जागाच मिळत नसल्याने कचऱ्याची ही समस्या कायम आहे. मात्र, केवळ व्यवस्थापन करून ही समस्या सुटणार नाही. त्यामुळे कचऱ्याची निर्मितीच कमी करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांची जनजागृती केली आहे. तसेच नवीन उपक्रमांच्या संशोधनासाठी प्राधान्य दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही पुणेकर घनकचरा व्यवस्थापनासाठी समोर येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेवर विश्वास राहिला नाही का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकही उदासीन असल्याचे बोलले जात आहे. काय आहे स्वच्छ पुरस्कार?2011च्या महापालिका निवडणुकीनंतर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. त्यानंतर विद्यमान महापौर वैशाली बनकर यांनी शहराची कचरा समस्या सोडविण्यासाठी लोकनेते यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियान सुरू केले. 02वर्षे हे अभियान सुरू होते. त्यानंतर मागील वर्षी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या अभियानाची तरतूद रद्द करून नवीन योजना आणण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) च्या माध्यमातून शहरातील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण कल्पना तसेच व्यवस्थापनाच्या पद्धतींचा समावेश करावा, यासाठी असे उपक्रम राबविणाऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी ‘स्वच्छ पुरस्कार’ योजना महापौर प्रशांत जगताप यांनी जाहीर केली. 01 आॅगस्ट 2016 पर्यंत पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत होती. मात्र, तीन महिने उलटल्यानंतरही या पुरस्कारांसाठी पालिकेकडे एकही अर्ज आलेला नाही.सहा विभागांसाठी ५ लाखांची बक्षिसे- महापालिकेकडून ही पुरस्कार योजना कुटुंब, गृहनिर्माण संस्था, शाळा/ महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक संस्था, खासगी संस्था अशा सहा विभागांमध्ये ही स्पर्धा होती. त्यात सर्व विभागांसाठी पहिल्या क्रमांकास ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांक १० हजार रुपये असे बक्षीस निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, या पुरस्कारांसाठी परीक्षक समिती ठरवून त्याद्वारे पुरस्कार दिले जाणार आहेत. जाहिरात खर्चही जाणार वाया- या पुरस्कारांची सर्वाधिक जनजागृती महापालिकेने गेल्या तीन महिन्यांत केली आहे. त्यात शहरात ठिकठिकाणी मोठ्या जाहिराती तसेच बॅनर लावणे, तब्बल ५ लाख माहितीपत्रकांचे वाटप, रेडिओवरून जाहिराती, पत्रकार परिषदा, व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, सोसायट्या, संस्थांच्या बैठका अशा विविध माध्यमातून लाखो रुपये खर्चून या पुरस्काराची जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतरही पुणेकरांनी या योजनेस काहीच प्रतिसाद दिला नसल्याचे यावरून दिसून येते.