शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

देशी गाय नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:59 IST

गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

रावणगाव : गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे होत असलेले तुकडीकरण, शासकीय प्रकल्पासाठी घरे बांधणे, दुकाने, मॉल्स, आॅफिसेस, कारखाने अशा विविध कारणांसाठी जमिनीचे होत असलेले संपादन; तसेच पावसाची कमतरता, सतत पडणारा दुष्काळ यामुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. अशावेळी देशी गार्इंना खाद्यपुरवठा दिवसेंदिवस महागाच होत आहे. देशी गार्इंपासून उत्पन्नदेखील कमी मिळते. त्यामुळे देशी गाई सांभाळणे परवडत नसल्याची शेतकºयांची भावना झाली आहे. पूर्वी शेतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे; परंतु यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीची नांगरणी, पेरणी, मळणी अशी जवळ जवळ सर्वच कामे यंत्रांच्या साहाय्याने झटपट करता येऊ लागल्याने शेतीमशागतीत बैलांचा वापर कमी होऊ लागल्याने देशी गाईंचे महत्त्व आपोआपच कमी होऊ लागले आहे.गेल्या काही दशकांपासून देशी गाईची जागा संकरित गाईने घेतली आहे. संकरित गाईपासून मिळणाºया दुधाच्या तुलनेत देशी गाईंपासून खूपच कमी प्रमाणात दूध मिळत असल्यामुळे देशी गाईच्या पालनाकडे शेतकरी दिवसेंदिवस दुर्लक्ष करीत आहेत. जसजशी देशी गाईंची संख्या कमी कमी होऊ लागली आहे, तस तसे बैलपोळासारख्या सणांनादेखील खºयाखुºया बैलांऐवजी मातीचे अथवा लाकडाचे बैल खरेदी करून त्यांची पूजा करण्याची वेळ लोकांवर आली आहे. गोमातेच्या गोमुत्रामुळे बरेचसे आजार दूर होतात तीच गोमाता अलीकडे बोटावर मोजण्या एवढ्याच शेतकºयांकडे पाहावयास मिळत आहे.पूर्वी गावाकडे देशी गाईंचे कळप माळरानावर चरताना मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत होते. दिवसेंदिवस ते चित्र दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे देशी गाई आत्ता गोशाळेमध्येच मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहेत. परिणामी, देशी गाईचे दुधासह तूप मिळणेदेखील दुरापास्त होऊ लागले आहे. पूर्वीचे वैभवशाली दिवस पुन्हा प्राप्त करावयाचे असतील तर शेतकºयांनी देशी गाईंचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले पाहिजे>का होऊ लागली देशी गाय नामशेष?पावसाची अनियमितता, सतत पडणारा दुष्काळ, दिवसेंदिवस नष्ट होत असलेली चराऊ कुरणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचावाढता वापर.