शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देशी गाय नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:59 IST

गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

रावणगाव : गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे होत असलेले तुकडीकरण, शासकीय प्रकल्पासाठी घरे बांधणे, दुकाने, मॉल्स, आॅफिसेस, कारखाने अशा विविध कारणांसाठी जमिनीचे होत असलेले संपादन; तसेच पावसाची कमतरता, सतत पडणारा दुष्काळ यामुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. अशावेळी देशी गार्इंना खाद्यपुरवठा दिवसेंदिवस महागाच होत आहे. देशी गार्इंपासून उत्पन्नदेखील कमी मिळते. त्यामुळे देशी गाई सांभाळणे परवडत नसल्याची शेतकºयांची भावना झाली आहे. पूर्वी शेतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे; परंतु यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीची नांगरणी, पेरणी, मळणी अशी जवळ जवळ सर्वच कामे यंत्रांच्या साहाय्याने झटपट करता येऊ लागल्याने शेतीमशागतीत बैलांचा वापर कमी होऊ लागल्याने देशी गाईंचे महत्त्व आपोआपच कमी होऊ लागले आहे.गेल्या काही दशकांपासून देशी गाईची जागा संकरित गाईने घेतली आहे. संकरित गाईपासून मिळणाºया दुधाच्या तुलनेत देशी गाईंपासून खूपच कमी प्रमाणात दूध मिळत असल्यामुळे देशी गाईच्या पालनाकडे शेतकरी दिवसेंदिवस दुर्लक्ष करीत आहेत. जसजशी देशी गाईंची संख्या कमी कमी होऊ लागली आहे, तस तसे बैलपोळासारख्या सणांनादेखील खºयाखुºया बैलांऐवजी मातीचे अथवा लाकडाचे बैल खरेदी करून त्यांची पूजा करण्याची वेळ लोकांवर आली आहे. गोमातेच्या गोमुत्रामुळे बरेचसे आजार दूर होतात तीच गोमाता अलीकडे बोटावर मोजण्या एवढ्याच शेतकºयांकडे पाहावयास मिळत आहे.पूर्वी गावाकडे देशी गाईंचे कळप माळरानावर चरताना मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत होते. दिवसेंदिवस ते चित्र दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे देशी गाई आत्ता गोशाळेमध्येच मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहेत. परिणामी, देशी गाईचे दुधासह तूप मिळणेदेखील दुरापास्त होऊ लागले आहे. पूर्वीचे वैभवशाली दिवस पुन्हा प्राप्त करावयाचे असतील तर शेतकºयांनी देशी गाईंचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले पाहिजे>का होऊ लागली देशी गाय नामशेष?पावसाची अनियमितता, सतत पडणारा दुष्काळ, दिवसेंदिवस नष्ट होत असलेली चराऊ कुरणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचावाढता वापर.