शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठीही सोसावा लागणार त्रास, जादा पाण्याची मागणी दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:22 IST

महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ११ गावांमधील नागरिकांना महापालिकेत आल्यानंतरही पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावाच लागणार आहे. सध्याच्या पुणे शहरासाठीचा पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी सन २०१२ पासून पाटबंधारे खात्याने दुर्लक्षित ठेवली आहे.

पुणे : महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ११ गावांमधील नागरिकांना महापालिकेत आल्यानंतरही पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावाच लागणार आहे. सध्याच्या पुणे शहरासाठीचा पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी सन २०१२ पासून पाटबंधारे खात्याने दुर्लक्षित ठेवली आहे. त्यामुळे या ११ गावांसाठी पाणी वाढवून द्यावे, अशी मागणी करायची तरी कशी, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे.न्यायालयाच्या आदेशामुळेच राज्य सरकारने महापालिका हद्दीभोवतालची ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. तशी अधिसूचनाही जारी केली. त्यामुळे आता या गावांना नागरी सुविधा पुरवण्याची सर्व जबाबदारी महापालिकेवर आली आहे. प्रशासनाने या गावांमधील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात बहुतेकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला. पिण्याचे पाणी नियमित मिळावे अशी मागणीच त्यांनी केली. महापालिकेने पुणे शहरासाठी जाहीर केलेल्या समान पाणी योजनेत सर्व गावांचा आताच समावेश करावा, त्यासाठी आराखडा नव्याने करावा असेही सुचविण्यात आले.या सर्व गावांची मिळून लोकसंख्या साधारण ३ लाख आहे. काही गावे १० हजार लोकसंख्येची तर जवळपास असलेली २ ते ३ गावे मिळून तब्बल ६० हजार लोकसंख्येची आहेत. सर्व गावे पुण्याच्या चारी बाजूंना वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी एकत्रित अशी पाणी योजना राबवणे अशक्य आहे. महापालिकेच्या त्या गावांलगत आलेल्या जलवाहिनीतून पुढे वेगळ्या जलवाहिन्या टाकून त्यांना पाणी द्यावे लागणार आहे. मात्र त्यासाठी बराच मोठा खर्च करावा लागणार आहे. महापालिकेला सध्या तो करता येणे शक्य नाही व राज्य सरकारने तर विकासकामांसाठी एक छदामही दिलेला नाही.पाटबंधारेचा कोटा : वाढीव पाणीसाठ्याची मागणीया सर्व गावांची पिण्याच्या पाण्याची एकत्रित गरज वार्षिक २ टीएमसी इतकी आहे. पुणे शहराची सध्याची गरज वार्षिक १५ टीएमसी इतकी आहे. पुण्याला पाटबंधारे खात्याने ठरवून दिलेला कोटा ११.५० टीएमसी आहे, मात्र वाढलेल्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता महापालिका १५ टीएमसी पाणी घेते. त्यावरून पाटबंधारे खाते व महापालिका यांच्यात वाद आहेत. जादा पाणी घेतले तर दंड करण्यात येईल अशी लेखी तंबी पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिली आहे. कोटा वाढवून मिळावा अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे खात्याकडे सन २०१२मध्येच केली असून, त्याकडे खात्याने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी महापालिका व महापौरांसह सर्व पदाधिकारी वाढीव पाणीसाठ्याची मागणी करत असतात व ही मागणी आश्वासनांच्या वाºयावरच विरून जात असते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही गेली ३ वर्षे हेच सुरू आहे.या परिस्थितीत या गावांसाठी जादा पाणी आणायचे कुठून असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. येरवडा, कळस, धानोरी आदी गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी म्हणून महापालिकेने भामा- आसखेड धरणातून पाणी योजना राबवली आहे. ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आता ते बाधितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून रखडले आहे. या योजनेसाठी म्हणून धरणातील २ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी केली होती. तशी परवानगीही त्यांना मिळाली, मात्र या परवानगीचे नूतनीकरण करून घेतले नाही, म्हणून पाटबंधारे खात्याने परवानगी रद्द केली असल्याचे महापालिकेला कळवले आहे. त्यामुळे आणखी अडचण झाली आहे.गावांमधील ३ लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी द्यावे लागणारच आहे. त्यासाठीचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्याला त्वरित मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तिथे पाणी योजना राबवणेही कठीण आहे. समान पाणी योजनेत त्यांचा समावेश करायचा झाल्यास नव्याने आराखडा तयार करावा लागेल. या सर्व कामाला वेळ लागेल, तात्पुरती सोय म्हणून सध्या पुण्यासाठीच्या कोट्यातूनच त्यांना पाणी दिले जाईल.- व्ही. जी. कुलकर्णी,अधीक्षक अभियंता,पाणी पुरवठा विभाग, महापालिका

टॅग्स :Puneपुणे