शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

... तर भाटघर धरणग्रस्त घेणार जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:06 IST

भाटघर धरणग्रस्तांच्या वतीने विविध मागण्यांसाठी वाकांबे (ता. भोर) येथे धरणे आंदोलन साखळी उपोषण करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास धरणग्रस्त भाटघर धरणात जलसमाधी घेणार असल्याची माहिती

भोर : भाटघर धरणग्रस्तांच्या वतीने विविध मागण्यांसाठी वाकांबे (ता. भोर) येथे धरणे आंदोलन साखळी उपोषण करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास धरणग्रस्त भाटघर धरणात जलसमाधी घेणार असल्याची माहिती भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीचे सरचिटणीस आनंद सणस यांनी दिली.भाटघर जलाशयात २२ प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी मिळाली. त्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, प्रकल्पातील ४० गावांतील पिण्याचे व शेतीच्या कामासाठी धरणात २५ टक्के आरक्षण मिळावे, भाटघर धरणात वेळवंड ते कांबरे या पुलासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, ४० गावांना मोफत वीज द्यावी, भाटघर येथे स्वतंत्र पुनर्वसन उपविभाग सुरू करावा, या मागण्यांसाठी समितीचे अध्यक्ष भगवान कंक यांच्या प्रमुख उपस्थितीत व समितीचे सरचिणीस सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धरणग्रस्त १० आॅक्टोबरला सकाळी ९ वाजल्यापासून १७ आॅक्टोबरपर्यंत धरणे आंदोलन व साखळी उपोषण करणार आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर १८ आॅक्टोबरला दुपारी धरणात जलसमाधी घेण्यात येणार आहे.

२००८ साली मौजे वाकांबे येथे भाटघर धरणात होडीतून प्रवास करताना सुमारे २२ प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी मिळाली होती. तर मागील ९४ वर्षांत १५० प्रकल्पग्रस्तांना वेळोवेळी प्राण गमवावे लागले असून, कोणालाही मोबदला मिळालेला नाही. भाटघर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने ताराचंद गोरड, जगन्नाथ ओंबळे, सुरेश ओंबळे, दत्तात्रय ओंबळे, निवृत्ती ओंबळे, शंकर ओंबळे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्तांनी आमदार, जलसंपदा विभाग, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.भाटघर धरणग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून राजकारण बाजूला ठेवून अनेकदा आंदोलनात सहभाग घेतला आहे. तत्कालीन पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे धरणग्रस्तांच्या दाखल्यांसाठी पाठपुरावा करून दाखले मिळावे म्हणून जीआर मंजूर करून घेतला. मात्र, सरकार बदलले आणि त्याची अंमलबजावणी रखडली. पुन्हा पाठपुरावा करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.- संग्राम थोपटे, आमदार

टॅग्स :Puneपुणे