शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
4
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
5
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
6
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
7
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
8
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
9
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
10
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
11
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
12
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
13
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
14
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
15
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
16
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
17
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
18
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
19
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
20
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

... तर भाटघर धरणग्रस्त घेणार जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:06 IST

भाटघर धरणग्रस्तांच्या वतीने विविध मागण्यांसाठी वाकांबे (ता. भोर) येथे धरणे आंदोलन साखळी उपोषण करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास धरणग्रस्त भाटघर धरणात जलसमाधी घेणार असल्याची माहिती

भोर : भाटघर धरणग्रस्तांच्या वतीने विविध मागण्यांसाठी वाकांबे (ता. भोर) येथे धरणे आंदोलन साखळी उपोषण करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास धरणग्रस्त भाटघर धरणात जलसमाधी घेणार असल्याची माहिती भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीचे सरचिटणीस आनंद सणस यांनी दिली.भाटघर जलाशयात २२ प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी मिळाली. त्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, प्रकल्पातील ४० गावांतील पिण्याचे व शेतीच्या कामासाठी धरणात २५ टक्के आरक्षण मिळावे, भाटघर धरणात वेळवंड ते कांबरे या पुलासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, ४० गावांना मोफत वीज द्यावी, भाटघर येथे स्वतंत्र पुनर्वसन उपविभाग सुरू करावा, या मागण्यांसाठी समितीचे अध्यक्ष भगवान कंक यांच्या प्रमुख उपस्थितीत व समितीचे सरचिणीस सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धरणग्रस्त १० आॅक्टोबरला सकाळी ९ वाजल्यापासून १७ आॅक्टोबरपर्यंत धरणे आंदोलन व साखळी उपोषण करणार आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर १८ आॅक्टोबरला दुपारी धरणात जलसमाधी घेण्यात येणार आहे.

२००८ साली मौजे वाकांबे येथे भाटघर धरणात होडीतून प्रवास करताना सुमारे २२ प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी मिळाली होती. तर मागील ९४ वर्षांत १५० प्रकल्पग्रस्तांना वेळोवेळी प्राण गमवावे लागले असून, कोणालाही मोबदला मिळालेला नाही. भाटघर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने ताराचंद गोरड, जगन्नाथ ओंबळे, सुरेश ओंबळे, दत्तात्रय ओंबळे, निवृत्ती ओंबळे, शंकर ओंबळे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्तांनी आमदार, जलसंपदा विभाग, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.भाटघर धरणग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून राजकारण बाजूला ठेवून अनेकदा आंदोलनात सहभाग घेतला आहे. तत्कालीन पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे धरणग्रस्तांच्या दाखल्यांसाठी पाठपुरावा करून दाखले मिळावे म्हणून जीआर मंजूर करून घेतला. मात्र, सरकार बदलले आणि त्याची अंमलबजावणी रखडली. पुन्हा पाठपुरावा करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.- संग्राम थोपटे, आमदार

टॅग्स :Puneपुणे