शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांमध्ये होणार पाणीतंटे; मीटर मुख्य वाहिनीला असल्याने वापरावरून होणार झगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 04:00 IST

पाणी देण्याची आपली जबाबदारी सोसायटीच्या कुंपणापर्यंत, त्यापुढची जबाबदारी सोसायटीची असे महापालिका समजत असल्यामुळे समान पाणी योजनेचे बिल यायला लागल्यानंतर सोसायट्यांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यातून स्वतंत्र नळजोड तर होतीलच; शिवाय पाणी साठवणूक टाक्यांची संख्याही सोसायटीत वाढतील, असे दिसते आहे.

- राजू इनामदारपुणे : पाणी देण्याची आपली जबाबदारी सोसायटीच्या कुंपणापर्यंत, त्यापुढची जबाबदारी सोसायटीची असे महापालिका समजत असल्यामुळे समान पाणी योजनेचे बिल यायला लागल्यानंतर सोसायट्यांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यातून स्वतंत्र नळजोड तर होतीलच; शिवाय पाणी साठवणूक टाक्यांची संख्याही सोसायटीत वाढतील, असे दिसते आहे.गेल्या काही वर्षांत पुणे शहरात सोसायट्यांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. किमान ७ हजार तरी सोसायट्या असतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. सोसायटी कायद्यानुसार नोंदणी न झालेल्या सोसायट्यांची संख्या यापेक्षाही जास्त असणार आहे. एका सोसायटीत किमान १५ सदनिकाधारक तरी असतातच. त्याशिवाय २०० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या मोठ्या सोसायट्यांची संख्याही बरीच आहे.या सोसायट्यांनी त्यांच्या सदस्यसंख्येला पुरेसे असतील इतके नळजोड महापालिकेकडून घेतले आहे. सध्या त्यांना मीटरप्रमाणे नाही तर वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते. समान पाणी योजनेत आता त्यांच्या नळजोडावर मीटर बसवले जाईल. तीन नळजोड असतील तर तिन्हींवर व त्यापेक्षा जास्त असले तरी सर्वच नळजोडांवर मीटर बसवण्यात येणार आहे. त्यातून किती दिले गेले, त्यावर महापालिका त्यांना दरमहा बिल आकारणी करेल. ते पैसे सोसायटीने महापालिकेकडे जमा करायचे आहेत. कारण ग्राहक म्हणून सोसायटीचीच नोंद महापालिका दप्तरात असणार आहे.सोसायटीने हे बिल आपल्या सदस्यांमध्ये विभागून त्याप्रमाणे पैसे जमा करायचे व ते महापालिकेत भरायचे, असे यात अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ते शक्य होणार नाही अशी चिन्हे आहेत. कारण प्रत्येक घरातील सदस्यसंख्येत फरक असतोच. काही घरांमध्ये फक्त दोनच व्यक्ती, तर काही घरांमध्ये एकत्र कुटुंब असेल तर १० पेक्षा जास्त व्यक्ती असतात. सोसायटीने आपल्या सदस्यांना समान बिल आकारणी केली तर त्यांच्याकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे. दोनच सदस्य असलेले कुटुंब १० सदस्यांच्या कुटुंबाइतके बिल द्यायला तयार होणार नाही. त्यातून वाद निर्माण होतील, असे दिसते आहे.महापालिकेने याचा विचारच केलेला दिसत नाही. आयुक्त कुणाल कुमार यांना याबाबत विचारले असता त्यांनी महापालिकेची जबाबदारी सोसायटीपर्यंत पाणी आणून देण्याची आहे. त्यापुढची जबाबदारी सोसायटीची असेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यसंख्येनिहाय बिल आकारणी करण्याचे नवे काम सोसायटीच्या पदाधिकाºयांना करावे लागणार आहे. त्यावरूनही आम्ही इतके पाणी वापरलेच नाही, असा युक्तिवाद होण्याचे नाकारता येत नाही. सोसायटीच्या दरमहाचा देखभाल दुरुस्तीचा खर्च देण्यास काकू करणारे काही सदस्य असतात. ते पाण्यासाठी दरमहा असा खर्च देतील का, याविषयी महापालिकेच्याच पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांना शंका आहेत.टाक्यांचा प्रश्न होणार गंभीर१प्रत्येक सदस्याने स्वतंत्र नळजोड घ्यायचा हा यावरचा उपाय आहे, मात्र त्यामुळे सोसायटीच्या आवारात पाणी साठवणूक टाक्यांची संख्या वाढतील. कारण महापालिकेचे पाणी दुसºया मजल्यापेक्षा जास्त वर चढत नाही.२सध्या सोसायटीची एकच पाणी साठवण टाकी असते व तिला पंप लावून ते पाणी प्रत्येक घरात पोहोचवण्याची व्यवस्था केलेली असते. स्वतंत्र नळजोड घेतला गेल्यास संबंधित कुटुंब त्याची स्वतंत्र टाकी सोसायटीच्या आवारात करेल. त्यासाठी त्याला जागा लागेल. ती कशी द्यायची व किती टाक्या करून द्यायच्या हा एक वेगळाच प्रश्न सोसायटीसमोर निर्माण होणार आहे.३सध्या चारचाकी वाहन लावण्यासाठी सोसायटी त्या जागेच्या सदनिकाधारकाला पैसे आकारत असते. टाकीसाठी तसा निर्णय घेतला गेला तर सोसायटीची बरीच रिकामी जागा लागेल व सोसायटीत जागाही शिल्लक राहणार नाही. तसेच त्यातून इमारतीच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होणार आहे.यावर सोसायटीतच निर्णय होणे अपेक्षित आहे. सदस्यसंख्येनुसार त्यांना बिल आकारणी करणे अपेक्षित आहे किंवा सोसायटीनेच प्रत्येक सदस्याला त्याच्या नळजोडावर मीटर बसवून दिले तरी हा प्रश्न सुटणारा आहे.- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिकामहापालिकेची जबाबदारी सोसायटीच्या कुंपणापर्यंत पाणी पोहोचवण्याचीच आहे. त्यापुढची व्यवस्था सोसायटीनेच पाहायची असते. त्यामुळे आमचे मीटर सोसायटीपर्यंत जे नळजोड गेले आहेत, त्यावरच असेल व त्याप्रमाणेच बिल आकारणी होईल.- व्ही. जी. कुलकर्णी,अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी