शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा थांबला; उद्योगांसमोरील प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 20, 2016 00:51 IST

उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडण्यात आले होते; त्यामुळे जलशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे.

बारामती : उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडण्यात आले होते; त्यामुळे जलशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. पाणीपातळी खालावल्याने बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे उद्योगांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होेते. उजनीतून बारामती एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठी गळती होते. परिणामी, एमआयडीसीतील उद्योगांना आवश्यक पाणीपुरवठा होत नाही. पाणी संकटाची टांगती तलवार उद्योगांवर कायम असते. टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ या उद्योगांवर अनेक दिवसांपासून आली आहे. त्यातच मंगळवार (दि. १९)पासून एमआयडीसीचा पाणीपुरवठा पूर्ण थांबला आहे. शुक्रवारी (दि. २२) हा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा एमआयडीसी प्रशासनाच्या करण्यात येणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे आगामी दोन दिवस उद्योगांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्यासह पंढरीनाथ कांबळे, शहाजी रणनवरे, शंकर कचरे, संजय थोरात, सुनील गोळे, नरेश तुपे, भाऊसाहेब तुपे, टी. पी. नायर, रमाकांत पाडुळे, बापू बाबरे या उद्योजकांनी उजनी जलाशयाला भेट देऊन पाहणी केली. याबाबत अध्यक्ष काकडे यांनी सांगितले की, उजनीतून पाणी सोडल्याने पाणीपातळी घटली, एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. (प्रतिनिधी)