शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जलसंपदा मांडणार पाणीवाटपाचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:19 IST

शहराची नेमकी लोकसंख्या, तरती लोकसंख्या, शहरालगतच्या गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा, त्यानुसार वाढीव पाण्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरआरए) बाजू मांडण्याच्या तयारीत आहे.

पुणे : शहराची नेमकी लोकसंख्या, तरती लोकसंख्या, शहरालगतच्या गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा, त्यानुसार वाढीव पाण्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरआरए) बाजू मांडण्याच्या तयारीत आहे. जलसंपदा विभाग महापालिकेने शपथपत्रात दिलेल्या लोकसंख्येनुसार पाणीवाटप करण्यावर ठाम असून, महापालिकेचा दावा खोडण्यासाठी विभागाकडून पाणीवाटपाचे गणित सुनावणीत मांडण्यात येणार आहे.येत्या गुरुवारी (दि. १३) प्राधिकरणासमोर पाणीवाटपाबाबत सुनावणी होत आहे. त्यात पुणे महापालिका शहराची लोकसंख्या नक्की किती आहे, याबाबतही माहिती देणार आहे. तसेच शहराला सध्या मिळणाऱ्या पाण्यापेक्षा अधिकचे पाणी मिळावे, याकरिता प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने लोकसंख्येवर आधारित पाण्याचा मापदंड ठरवण्याबाबत शासननिर्णय काढला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शहराला मिळणाºया पाण्यात कपात होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला शहराची लोकसंख्या नक्की किती आहे, त्याची माहिती जलसंपत्ती प्राधिकरणाला सुनावणीदरम्यान द्यावी लागणार आहे. त्यानंतरच पुण्याला अधिकचे पाणी द्यावे की नाही, याबाबत निर्णय होईल.महापालिकेला शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मापदंडानुसार पाणी द्यावे, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता यांच्याकडे देण्यात आला होता. पुणे महापालिकेने लोकसंख्येनुसार ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याऐवजी ८.१९ टीएमसी पाणीवापर करावा आणि प्राधिकरणाच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी घेतली. त्यावर महापालिकेने प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे. त्याची सुनावणी १३ डिसेंबरला होत असून, त्यामध्ये महापालिकेला लोकसंख्येची सुधारित माहितीही सादर करावी लागेल.शहराची लोकसंख्या ३९.१८ लाख, कॅन्टोन्मेंट बोर्ड व शेजारील गावे मिळून १.५८ लाख अशी एकूण ४०.७६ लाख लोकसंख्या असल्याचे शपथपत्र महापालिकेने यापूर्वी दिले आहे. प्राधिकरणाच्या मापदंडानुसार प्रतिमहिना १३५ लिटर आणि १५ टक्के गळती मिळून दरमहा दरडोई १५५ लिटर पाणी देता येणार आहे. त्यामुळे पुण्याला ८.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देणे योग्य ठरेल.महापालिकेचा २०१७-१८ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक १८.७१ टीएमसी पाणीवापर झाला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०१७, जानेवारी-मार्च २०१८ या पाच महिन्यांत सरासरी प्रतिदिन १६०० दशलक्ष लिटर पाणीवापर आहे.याच कालावधीमध्ये काही वेळा महत्तम पाणीवापर प्रतिदिन १७५० दशलक्ष लिटरपर्यंत झाला आहे. असे विविध मुद्दे जलसंपदा विभागाकडून मांडले जाणार आहेत.