शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बारामतीत १६ टँकरद्वारे १२ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:41 IST

पाणीटंचाईची समस्या गंभीर : महिला ग्रामस्थांचे हाल

बारामती : तालुक्याच्या जिरायती भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्या जिरायती भागातील १२ गावांना व १४० वाड्या-वस्त्यांना १६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या मागणीचे प्रस्तावदेखील पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढत जाणार आहे.

बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी आदी गावांना शासकीय टँकरने, तर काळखैरवाडी, कारखेल, भिलारवाडी, जळगाव सुपे, बाबुर्डी, गाडीखेल, वढाणे, मुर्टी, मोढवे, उंडवडी, कडेपठार, खराडेवाडी, आंबी खुर्द आदी गावांना खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण १२ गावे व १४० वाड्या-वस्त्यांवरील ३१ हजार ७१७ लोकसंख्येला ६० पैकी ४९ खेपांद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून उन्हाचा चटका वाढणार आहे. परिणामी पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करेल. टँकरच्या मागणीतदेखील वाढ होणार आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता उन्हाळ्यात टँकरची संख्या ५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दुष्काळाच्या झळांमध्ये वाढ...

काºहाटी : बारामतीच्या जिरायती भागात दुष्काळाची भीषणता इतकी वाढली आहे, की झाडांना पाने राहिली नाहीत. पाण्याअभावी परिसरातील वटवृक्षांची पालवी संपूर्णपणे गळून गेली आहे.एरवी जानेवारी महिन्यामध्ये हिरवेगार असणारी झाडे डिसेंबरमध्येच पानगळती होऊन बसले आहेत. चार-पाच वर्षांच्या दुष्काळाचा परिणाम झाडाझुडपांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, कित्येक झाडे-झुडपे या दुष्काळातून नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना या दुष्काळात सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. सलग पाच वर्षांच्या दुष्काळाने कºहा नदीचे पात्र खळखळलेच नाही. दुष्काळामुळे जनावरांबरोबर पिण्याच्या पाण्याचा, तसेच चाºयाचा मोठा प्रश्न पुढील काही महिन्यांमध्ये अधिकच तीव्र होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती