शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नीरा कोरडी पडल्याने तीन जिल्ह्यांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 9, 2017 04:22 IST

नीरा नदी ही तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली आहे. या नदीच्या पाण्यावर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी अवलंबून आहेत. त्याचबरोबर शेकडो गावे

वालचंदनगर : नीरा नदी ही तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली आहे. या नदीच्या पाण्यावर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी अवलंबून आहेत. त्याचबरोबर शेकडो गावे, वाड्यावस्त्या या नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु, पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने नीरा नदीच्या पात्रातील पाण्याने दोन महिन्यांतच तळ गाठला. तिन्ही जिल्ह्यांतील नदीकाठच्या शेतकऱ्यांवर तीव्र पाणी संकट ओढवलेले आहे. नीरा नदीवर पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील नदीकाठची अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नदी कोरडी पडलेली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आल्याने भयानक दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली होती. जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता. आज नीरा नदीच्या पात्रात एक थेंबही शिल्लक राहिला नसल्यामुळे गेल्यावर्षीचे दिवस येथील शेतकऱ्यांंना आठवण करून देत आहे. नदीच्या काठावरील असंख्य शेतकऱ्यांनी पाण्याच्या अपेक्षेने उन्हाळी पिके घेतलेली आहेत. परंतु, पाणीच शिल्लक नसल्याने पिके जागेवरच वाळून जात आहेत. जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या नीरा नदीपात्रात पाणी सोडल्यास हजारो जनावरांच्या जीविताचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे म्हणून नदीच्या पात्रातच आंदोलन करण्यात आले होते. परंतु, संबंधित विभागाने याची दखल न घेतल्याने आज नदीकाठावरील शेतकऱ्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.