शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नीरा कोरडी पडल्याने तीन जिल्ह्यांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 9, 2017 04:22 IST

नीरा नदी ही तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली आहे. या नदीच्या पाण्यावर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी अवलंबून आहेत. त्याचबरोबर शेकडो गावे

वालचंदनगर : नीरा नदी ही तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली आहे. या नदीच्या पाण्यावर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी अवलंबून आहेत. त्याचबरोबर शेकडो गावे, वाड्यावस्त्या या नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु, पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने नीरा नदीच्या पात्रातील पाण्याने दोन महिन्यांतच तळ गाठला. तिन्ही जिल्ह्यांतील नदीकाठच्या शेतकऱ्यांवर तीव्र पाणी संकट ओढवलेले आहे. नीरा नदीवर पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील नदीकाठची अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नदी कोरडी पडलेली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आल्याने भयानक दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली होती. जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता. आज नीरा नदीच्या पात्रात एक थेंबही शिल्लक राहिला नसल्यामुळे गेल्यावर्षीचे दिवस येथील शेतकऱ्यांंना आठवण करून देत आहे. नदीच्या काठावरील असंख्य शेतकऱ्यांनी पाण्याच्या अपेक्षेने उन्हाळी पिके घेतलेली आहेत. परंतु, पाणीच शिल्लक नसल्याने पिके जागेवरच वाळून जात आहेत. जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या नीरा नदीपात्रात पाणी सोडल्यास हजारो जनावरांच्या जीविताचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे म्हणून नदीच्या पात्रातच आंदोलन करण्यात आले होते. परंतु, संबंधित विभागाने याची दखल न घेतल्याने आज नदीकाठावरील शेतकऱ्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.