शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पुरंदरमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: March 24, 2017 03:56 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षभर टंचाईच्या झळा सुरू होत्या. टँकर बंदच झाले नव्हते. या वर्षी या थोडासा दिलासा मिळाला असून,

जेजुरी : गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षभर टंचाईच्या झळा सुरू होत्या. टँकर बंदच झाले नव्हते. या वर्षी या थोडासा दिलासा मिळाला असून, मार्चअखेर टँकर सुरू झाले आहेत. टँकरची मागणी होऊ लागली असून आता फक्त पुरंदर तालुक्यात ४ टँकरने ३ गावांतील २१ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. ८ हजार २८ लोकांना सध्या टंचाईची झळ बसत आहे. पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी या गावांचे टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अजूनही साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, सोनोरी, दिवे, मावडी क.प., बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी गावांतील टँकरचे प्रस्ताव दाखल असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी दिली आहे.या वर्षी पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पश्चिम पट्ट्यातील सुमार पावसामुळे कऱ्हा नदीतून वाहिलेल्या पाण्यावर नाझरे जलाशयात केवळ ४० टक्केच (३८५ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा निर्माण झाला होता. त्यावर परिसरातील पाणी योजनांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी ही इतर गावांची पिण्याच्या पाण्याची तीव्रता दिवसेंदिवस तीव्र स्वरूपाची होऊ लागली आहे.इतर ६ गावठाणे आणि ६८ वाड्यावस्त्यांवरील १३ हजार ७२१ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत. लवकरच येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन टँकर सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे रवींद्र गायकवाड यांनी संगितले. वरील गावांचे पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे उद्भव आटलेले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. (वार्ताहर)