शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: March 24, 2017 03:56 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षभर टंचाईच्या झळा सुरू होत्या. टँकर बंदच झाले नव्हते. या वर्षी या थोडासा दिलासा मिळाला असून,

जेजुरी : गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षभर टंचाईच्या झळा सुरू होत्या. टँकर बंदच झाले नव्हते. या वर्षी या थोडासा दिलासा मिळाला असून, मार्चअखेर टँकर सुरू झाले आहेत. टँकरची मागणी होऊ लागली असून आता फक्त पुरंदर तालुक्यात ४ टँकरने ३ गावांतील २१ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. ८ हजार २८ लोकांना सध्या टंचाईची झळ बसत आहे. पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी या गावांचे टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अजूनही साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, सोनोरी, दिवे, मावडी क.प., बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी गावांतील टँकरचे प्रस्ताव दाखल असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी दिली आहे.या वर्षी पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पश्चिम पट्ट्यातील सुमार पावसामुळे कऱ्हा नदीतून वाहिलेल्या पाण्यावर नाझरे जलाशयात केवळ ४० टक्केच (३८५ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा निर्माण झाला होता. त्यावर परिसरातील पाणी योजनांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी ही इतर गावांची पिण्याच्या पाण्याची तीव्रता दिवसेंदिवस तीव्र स्वरूपाची होऊ लागली आहे.इतर ६ गावठाणे आणि ६८ वाड्यावस्त्यांवरील १३ हजार ७२१ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत. लवकरच येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन टँकर सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे रवींद्र गायकवाड यांनी संगितले. वरील गावांचे पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे उद्भव आटलेले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. (वार्ताहर)