शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिरायत भागातील गावांना पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उंडवडी कडेपठार : सध्या उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील उंडवडी कडेपठार, जराडवाडी, बऱ्हाणपूर, गोजुबावी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उंडवडी कडेपठार : सध्या उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील उंडवडी कडेपठार, जराडवाडी, बऱ्हाणपूर, गोजुबावी, खराडेवाडी, कारखेल, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे गावांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. परिसरातील ओढे-नाले आटले

आहेत. विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

या भागात गतवर्षी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र

डिसेंबरनंतर पाणीउपसा वाढल्यामुळे हळूहळू विहिरी खोल जाण्यास सुरुवात

झाली. तर आता ज्या भागात भूजलपातळी वाढली होती, त्या भागातही पाण्याची

टंचाई जाणवू लागली आहे. डिसेंबरपर्यंत ओढा-नाले, छोटे मोठे तलाव तसेच

विहिरी भरून होत्या. परिणामी रब्बी हंगामात बागायती क्षेत्रात वाढ होऊन

पीकरचना बदलली. त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने विहिरींनी आता तळ गाठला

आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिकांसमोर अडचणी वाढल्या आहेत, तर जनावरांच्या

पाण्याचाही प्रश्‍न गंभीर होत आहे. पाण्याची कमतरता असल्याने उंडवडी

कडेपठार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून कधी दोन दिवसांआड, तर कधी

चार दिवसांआड नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. जिरायती भागाला वरदान

ठरलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने

परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शिरसाई कालव्याला मध्यंतरी पाणी

सुटले असले तरी काही भागांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. सध्या

पंचायत समितीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने टँकरची मागणी करता येत

नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिरसाई उपसा

योजनेतून तलावात पाणी सोडावे,अशी मागणी उंडवडी कडेपठारचे सरपंच भरत

बनकर,उपसरपंच भूषण जराड यांनी केली आहे.

फोटो ओळ: १) उंडवडी कडेपठार येथील कोरडा पडलेला तलाव.