शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

घोडमधून पाणी सोडले ; पिकांना दिलासा

By admin | Updated: February 27, 2015 23:51 IST

चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली.

निमोणे : चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण हे पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. धरणाची साठवण क्षमता ७६३९ दलघफू एवढी असून, मृत पाणीसाठा २१६२ दलघफू एवढा असून, उपयुक्त पाणीसाठा ३१८३ दलघफू एवढा आहे. दरम्यान, धरण बांधणीनंतर आजपर्यंत धरणाच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे. सध्या धरणामध्ये ५३५५ दलघफू एवढा पाणीसाठा असून, तो ५८ टक्के इतका आहे. या धरणाच्या पाण्यावर शिरूर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील सुमारे सहा हजार हेक्टर बारमाही सिंचनाखाली आहे. त्याशिवाय रांजणगाव औद्योगिक वसाहत व घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांना औद्योगिक उपयोगासाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीकाठच्या गावाबरोबरच श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत या मोठ्या लोकसंख्येच्या गावांनाही पिण्यासाठी पाणीपुरवठा येथूनच होतो. धरणाच्या खालच्या भागामध्ये शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शिरसगाव, धनगरवस्ती, नलगेमळा, नांद्रेमळा, खोरेवस्ती व तांदळी-संगम हे सहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्यावर सुमारे दोन हजार हेक्टर ओलिताखाली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि बंधाऱ्यांना असणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील गळतीने हे बंधारे कोरडे पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर होती. शेतकऱ्यांनी वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली होती. (वार्ताहर)