शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

घोडमधून पाणी सोडले ; पिकांना दिलासा

By admin | Updated: February 27, 2015 23:51 IST

चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली.

निमोणे : चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण हे पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. धरणाची साठवण क्षमता ७६३९ दलघफू एवढी असून, मृत पाणीसाठा २१६२ दलघफू एवढा असून, उपयुक्त पाणीसाठा ३१८३ दलघफू एवढा आहे. दरम्यान, धरण बांधणीनंतर आजपर्यंत धरणाच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे. सध्या धरणामध्ये ५३५५ दलघफू एवढा पाणीसाठा असून, तो ५८ टक्के इतका आहे. या धरणाच्या पाण्यावर शिरूर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील सुमारे सहा हजार हेक्टर बारमाही सिंचनाखाली आहे. त्याशिवाय रांजणगाव औद्योगिक वसाहत व घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांना औद्योगिक उपयोगासाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीकाठच्या गावाबरोबरच श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत या मोठ्या लोकसंख्येच्या गावांनाही पिण्यासाठी पाणीपुरवठा येथूनच होतो. धरणाच्या खालच्या भागामध्ये शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शिरसगाव, धनगरवस्ती, नलगेमळा, नांद्रेमळा, खोरेवस्ती व तांदळी-संगम हे सहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्यावर सुमारे दोन हजार हेक्टर ओलिताखाली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि बंधाऱ्यांना असणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील गळतीने हे बंधारे कोरडे पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर होती. शेतकऱ्यांनी वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली होती. (वार्ताहर)