शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: सियालकोटच्या लुनी इथला दहशतवादी तळ भारताने केला उद्ध्वस्त
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
5
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
6
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
7
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
8
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
9
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
10
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
11
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
12
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
13
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
14
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
15
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
16
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
17
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
18
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
19
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
20
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी

घोडमधून पाणी सोडले ; पिकांना दिलासा

By admin | Updated: February 27, 2015 23:51 IST

चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली.

निमोणे : चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण हे पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. धरणाची साठवण क्षमता ७६३९ दलघफू एवढी असून, मृत पाणीसाठा २१६२ दलघफू एवढा असून, उपयुक्त पाणीसाठा ३१८३ दलघफू एवढा आहे. दरम्यान, धरण बांधणीनंतर आजपर्यंत धरणाच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे. सध्या धरणामध्ये ५३५५ दलघफू एवढा पाणीसाठा असून, तो ५८ टक्के इतका आहे. या धरणाच्या पाण्यावर शिरूर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील सुमारे सहा हजार हेक्टर बारमाही सिंचनाखाली आहे. त्याशिवाय रांजणगाव औद्योगिक वसाहत व घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांना औद्योगिक उपयोगासाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीकाठच्या गावाबरोबरच श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत या मोठ्या लोकसंख्येच्या गावांनाही पिण्यासाठी पाणीपुरवठा येथूनच होतो. धरणाच्या खालच्या भागामध्ये शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शिरसगाव, धनगरवस्ती, नलगेमळा, नांद्रेमळा, खोरेवस्ती व तांदळी-संगम हे सहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्यावर सुमारे दोन हजार हेक्टर ओलिताखाली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि बंधाऱ्यांना असणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील गळतीने हे बंधारे कोरडे पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर होती. शेतकऱ्यांनी वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली होती. (वार्ताहर)