शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात कपात का?

By admin | Updated: October 1, 2014 23:41 IST

सुभाषअण्णांच्या काळापासून दौंड तालुक्यातील जनतेला वर्षातून पाण्याची पाच आवर्तने मिळायची. मी आमदार असेर्पयत त्यात कपात होऊ दिली नाही.

यवत : सुभाषअण्णांच्या काळापासून दौंड तालुक्यातील जनतेला वर्षातून पाण्याची पाच आवर्तने मिळायची. मी आमदार असेर्पयत त्यात कपात होऊ दिली नाही. मात्र, सध्याच्या आमदारांच्या काळात दौंडकरांना मिळणा:या हक्काच्या पाण्यात का कपात झाली? असा सवाल करीत विद्यमान आमदारांना दौंडकरांना याचे उत्तर द्यावे लागेल, असे माजी आमदार रंजनाताई कुल यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले.
हिंगणीगाडा, वासुंदे, जिरेगाव, रोटी, पांढरेवाडी, कुरकुंभ, कुसेगाव, पडवी परिसरात रंजनाताई कुल यांनी आज महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अॅड. राहुल कुल यांच्या प्रचारार्थ भेटी दिल्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली वाबळे, मनीषा नवले, नूतन खराडे, सरपंच ललिता खराडे, उपसरपंच संजय गायकवाड, ज्ञानदेव खराडे, बाळासाहेब कदम, जयसिंग ताकवले, संग्राम चांदगुडे, शरद लवांड, अप्पाजी खोमणो, विलास शिंदे, सुनील चव्हाण, मंजिरी खराडे, गुलशन शेख, ज्योती खराडे, सुवर्णा ताकवले, सुजाता खराडे, हेमा ताकवले, डॉ. सोनल खराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 
या वेळी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. भेटीदरम्यान रंजनाताई यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांशी संवाद साधला.
खडकवासला धरणाचे पाणी दौंड तालुक्यातील शेतक:यांना वर्षातून पाचवेळा मिळवून देण्यासाठी तत्कालीन आमदार कै. सुभाषअण्णा कुल यांनी कसोशीने प्रय} केले आणि त्यांना यश मिळाले. मी आमदार असतानाही पाण्याची पाच आवर्तने कायम होती. आता मात्र, पाण्यावाचून शेतकरी तडफडत असताना आमदारांना ही अवस्था पाच वर्षांत दिसली नाही, हे दौंडकरांचे दुर्दैव आहे, असेही कुल म्हणाल्या. (वार्ताहर)
 
जानाई योजना, बंधारे आणि तलावाच्या माध्यमातून हिंगणीगाडा आणि परिसरात पाणी मिळाले होते. तसेच, तालुक्यात पहिल्यांदा बुडीत बंधारे बांधले; परंतु, सत्ताधा:यांनी या योजनांकडे दुर्लक्ष केल्याने विकास रखडला, त्यामुळे दौंडची जनता आता त्यांना माफ करणार नाही. आता आमची सत्ता आल्यानंतर परिसरात पुन्हा विकासाची गंगा आणू, असे आश्वासन माजी आमदार रंजनाताई कुल यांनी दिले.
पावणोतीन कोटींची कामे!
हिंगणीगाडा आणि परिसरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पावणोतीन कोटी रुपयांची कामे केली आहेत, असे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली वाबळे यांनी सांगितले. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अॅड. राहुल कुल यांचा प्रचारदौरा आज खडकी, खोरवडी, कुसेगाव परिसरात झाला. या वेळी नागरिकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला. युवक, महिला, शेतकरी यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध होतो आणि राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.