शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

नीरा कालव्यात सोडले पाणी

By admin | Updated: May 9, 2017 03:25 IST

शेतकरी संघटनेने काझड (ता. इंदापूर) येथे खडकवासला व नीरा डाव्या कालव्याला जोडणाऱ्या सणसर जोडकालव्यात पाणी सोडून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : शेतकरी संघटनेने काझड (ता. इंदापूर) येथे खडकवासला व नीरा डाव्या कालव्याला जोडणाऱ्या सणसर जोडकालव्यात पाणी सोडून आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नवनाथ बनसोडे, हनुमंत वीर, पांडुरंग बनसोडे, हनुमंत बनसोडे आदींसह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.काझड, शिंदेवाडी, अकोले भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी सणसर जोडकालव्यासाठी संपादित झाल्या आहेत. मात्र, कालवा सुरू होऊनदेखील जोडकालव्याचा या शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. हक्काच्या जमिनी देऊनही शेती कोरडीच पडत आहे. दरवेळी पाण्यासाठी या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते. पिके जळून चालल्याने या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यानुसार रायते व इतर पदाधिकाऱ्यांनी शाखा अभियंता पाटील यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचा संयम संपण्याअगोदर जोडकालव्यात पाणी सोडा, अशी मागणी रायते यांनी केली. त्यानंतर कालव्यात पाणी सोडले. या वेळी जिल्हाध्यक्ष रायते यांनी सांगितले, की पाणी पुरेपूर असूनही पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ते वेळेवर मिळत नाही. बागायती भागाबरोबरच दुष्काळी भागाचेही प्रश्न पाण्याअभावी वाढल्याने आंदोलन करण्याची वेळ आली. दरम्यान, शनिवारी (दि. ६) काँग्रेस व राष्ट्रवादीने सणसर येथे नीरा डाव्या कालव्याच्या वितरिकेला पाणी सोडण्यासाठी शनिवारी सकाळी आंदोलन केले. त्यामुळे पाण्यावरून येथील वातावरण तापले आहे.