शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

नीरा कालव्यात सोडले पाणी

By admin | Updated: May 9, 2017 03:25 IST

शेतकरी संघटनेने काझड (ता. इंदापूर) येथे खडकवासला व नीरा डाव्या कालव्याला जोडणाऱ्या सणसर जोडकालव्यात पाणी सोडून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : शेतकरी संघटनेने काझड (ता. इंदापूर) येथे खडकवासला व नीरा डाव्या कालव्याला जोडणाऱ्या सणसर जोडकालव्यात पाणी सोडून आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नवनाथ बनसोडे, हनुमंत वीर, पांडुरंग बनसोडे, हनुमंत बनसोडे आदींसह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.काझड, शिंदेवाडी, अकोले भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी सणसर जोडकालव्यासाठी संपादित झाल्या आहेत. मात्र, कालवा सुरू होऊनदेखील जोडकालव्याचा या शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. हक्काच्या जमिनी देऊनही शेती कोरडीच पडत आहे. दरवेळी पाण्यासाठी या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते. पिके जळून चालल्याने या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यानुसार रायते व इतर पदाधिकाऱ्यांनी शाखा अभियंता पाटील यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचा संयम संपण्याअगोदर जोडकालव्यात पाणी सोडा, अशी मागणी रायते यांनी केली. त्यानंतर कालव्यात पाणी सोडले. या वेळी जिल्हाध्यक्ष रायते यांनी सांगितले, की पाणी पुरेपूर असूनही पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ते वेळेवर मिळत नाही. बागायती भागाबरोबरच दुष्काळी भागाचेही प्रश्न पाण्याअभावी वाढल्याने आंदोलन करण्याची वेळ आली. दरम्यान, शनिवारी (दि. ६) काँग्रेस व राष्ट्रवादीने सणसर येथे नीरा डाव्या कालव्याच्या वितरिकेला पाणी सोडण्यासाठी शनिवारी सकाळी आंदोलन केले. त्यामुळे पाण्यावरून येथील वातावरण तापले आहे.