शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:38 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मुंबई येथे झालेल्या कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या दि. ५ पासून पाच कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात येणार असून ते या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन असेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. आर. कानडे व शाखा अभियंता जे. डी. गळगे यांनी दिली.पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकरिता शुक्रवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहावर कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे हे होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. शरद सोनवणे, आ. बाबूराव पाचर्णे, आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे,. जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, मुख्य अधिकारी जयश्री काटकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता के. आर. कानडे आदी उपस्थित होते.या वेळी कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी आवर्तनाचे पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व लोकप्रतिनिधींनी दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी केली. जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे यांनी ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पिंपळगाव डावा मीना शाखा, डिंभे उजवा कालवा, मीना पूरक कालवा आणि घोड शाखा या कालव्यांद्वारे येत्या ५ मार्चपासून सोडण्यात येणार आहे. पिंपळगाव डावा मीना शाखा कालव्याद्वारे ३६ दिवस, डिंभे उजवा कालव्याद्वारे ४० दिवस, मीना पूरक कालव्याद्वारे ४ दिवस व घोड शाखा कालव्याद्वारे १२ ते १५ दिवस असे पाणी सोडण्याचे नियोजन आहे.या कालव्यांद्वारे दि. ५ मार्च रोजी, घोड शाखा कालव्याद्वारे १४ मार्च रोजी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, पाण्याची मागणी लक्षात घेऊन लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबतही नियोजन सुरू आहे. पिंपळगाव जोगा धरणातून उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर पाण्याचे रोटेशन पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०१९मध्ये या धरणातील मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन उन्हाळ्यातील हे शेवटचे आवर्तन असेल. या उन्हाळी आवर्तनाचा लाभ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना होणार आहे, अशी माहिती कानडे व गळगे यांनी दिली.दरम्यान, यापूर्वी कालवा समितीची बैठक रद्द झाल्याने आवर्तन सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र, आज झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.>सध्या धरणातील उपलब्ध साठा असासध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे- जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस ७,६४८ द.ल.घ.फू. (२५.०५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीला याच धरणांमध्ये १७,२३३ द.ल.घ.फू. (५४.४३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.सद्य:स्थितीला येडगाव धरणात ९२० द.ल.घ.फू. (४७.३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरणात ११९९ द.ल.घ.फू. (११.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात २५१ द.ल.घ.फू. (२१.५० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.पिंपळगाव जोगा धरणात ८५७ द.ल.घ.फू. (२२.०४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. चिल्हेवाडी धरणात १,७५० द.ल.घ.फू. (२०.१७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर, आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात ४,४१९ द.ल.घ.फू. (३५.३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.