शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:38 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मुंबई येथे झालेल्या कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या दि. ५ पासून पाच कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात येणार असून ते या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन असेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. आर. कानडे व शाखा अभियंता जे. डी. गळगे यांनी दिली.पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकरिता शुक्रवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहावर कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे हे होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. शरद सोनवणे, आ. बाबूराव पाचर्णे, आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे,. जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, मुख्य अधिकारी जयश्री काटकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता के. आर. कानडे आदी उपस्थित होते.या वेळी कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी आवर्तनाचे पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व लोकप्रतिनिधींनी दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी केली. जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे यांनी ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पिंपळगाव डावा मीना शाखा, डिंभे उजवा कालवा, मीना पूरक कालवा आणि घोड शाखा या कालव्यांद्वारे येत्या ५ मार्चपासून सोडण्यात येणार आहे. पिंपळगाव डावा मीना शाखा कालव्याद्वारे ३६ दिवस, डिंभे उजवा कालव्याद्वारे ४० दिवस, मीना पूरक कालव्याद्वारे ४ दिवस व घोड शाखा कालव्याद्वारे १२ ते १५ दिवस असे पाणी सोडण्याचे नियोजन आहे.या कालव्यांद्वारे दि. ५ मार्च रोजी, घोड शाखा कालव्याद्वारे १४ मार्च रोजी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, पाण्याची मागणी लक्षात घेऊन लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबतही नियोजन सुरू आहे. पिंपळगाव जोगा धरणातून उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर पाण्याचे रोटेशन पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०१९मध्ये या धरणातील मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन उन्हाळ्यातील हे शेवटचे आवर्तन असेल. या उन्हाळी आवर्तनाचा लाभ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना होणार आहे, अशी माहिती कानडे व गळगे यांनी दिली.दरम्यान, यापूर्वी कालवा समितीची बैठक रद्द झाल्याने आवर्तन सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र, आज झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.>सध्या धरणातील उपलब्ध साठा असासध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे- जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस ७,६४८ द.ल.घ.फू. (२५.०५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीला याच धरणांमध्ये १७,२३३ द.ल.घ.फू. (५४.४३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.सद्य:स्थितीला येडगाव धरणात ९२० द.ल.घ.फू. (४७.३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरणात ११९९ द.ल.घ.फू. (११.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात २५१ द.ल.घ.फू. (२१.५० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.पिंपळगाव जोगा धरणात ८५७ द.ल.घ.फू. (२२.०४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. चिल्हेवाडी धरणात १,७५० द.ल.घ.फू. (२०.१७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर, आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात ४,४१९ द.ल.घ.फू. (३५.३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.