शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:38 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मुंबई येथे झालेल्या कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या दि. ५ पासून पाच कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात येणार असून ते या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन असेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. आर. कानडे व शाखा अभियंता जे. डी. गळगे यांनी दिली.पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकरिता शुक्रवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहावर कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे हे होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. शरद सोनवणे, आ. बाबूराव पाचर्णे, आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे,. जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, मुख्य अधिकारी जयश्री काटकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता के. आर. कानडे आदी उपस्थित होते.या वेळी कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी आवर्तनाचे पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व लोकप्रतिनिधींनी दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी केली. जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे यांनी ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पिंपळगाव डावा मीना शाखा, डिंभे उजवा कालवा, मीना पूरक कालवा आणि घोड शाखा या कालव्यांद्वारे येत्या ५ मार्चपासून सोडण्यात येणार आहे. पिंपळगाव डावा मीना शाखा कालव्याद्वारे ३६ दिवस, डिंभे उजवा कालव्याद्वारे ४० दिवस, मीना पूरक कालव्याद्वारे ४ दिवस व घोड शाखा कालव्याद्वारे १२ ते १५ दिवस असे पाणी सोडण्याचे नियोजन आहे.या कालव्यांद्वारे दि. ५ मार्च रोजी, घोड शाखा कालव्याद्वारे १४ मार्च रोजी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, पाण्याची मागणी लक्षात घेऊन लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबतही नियोजन सुरू आहे. पिंपळगाव जोगा धरणातून उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर पाण्याचे रोटेशन पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०१९मध्ये या धरणातील मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन उन्हाळ्यातील हे शेवटचे आवर्तन असेल. या उन्हाळी आवर्तनाचा लाभ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना होणार आहे, अशी माहिती कानडे व गळगे यांनी दिली.दरम्यान, यापूर्वी कालवा समितीची बैठक रद्द झाल्याने आवर्तन सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र, आज झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.>सध्या धरणातील उपलब्ध साठा असासध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे- जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस ७,६४८ द.ल.घ.फू. (२५.०५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीला याच धरणांमध्ये १७,२३३ द.ल.घ.फू. (५४.४३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.सद्य:स्थितीला येडगाव धरणात ९२० द.ल.घ.फू. (४७.३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरणात ११९९ द.ल.घ.फू. (११.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात २५१ द.ल.घ.फू. (२१.५० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.पिंपळगाव जोगा धरणात ८५७ द.ल.घ.फू. (२२.०४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. चिल्हेवाडी धरणात १,७५० द.ल.घ.फू. (२०.१७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर, आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात ४,४१९ द.ल.घ.फू. (३५.३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.