शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

जलसाक्षरता केंद्र महत्त्वाचे ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:37 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेला उत्साह चिरकाल टिकविण्यासाठी शासनाकडून जलसाक्षरता केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त व जलयुक्त बनविण्यामध्ये या केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेला उत्साह चिरकाल टिकविण्यासाठी शासनाकडून जलसाक्षरता केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त व जलयुक्त बनविण्यामध्ये या केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.यशदा येथे सुरु करण्यात आलेल्या जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभ रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी जलबिरादरीचे प्रणेते राजेंद्रसिंह, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते पोपट पवार, यशदाचे संचालक आनंद लिमये आदी उपस्थित होते.जलसाक्षरता केंद्र्राच्या माध्यमातून नेमलेले साडेसात हजार स्वयंसेवक आपल्या भागातील पाण्याचा वापर, पीकपद्धती, नियोजन यावर लक्ष ठेवतील. जल अभियानातून निर्माण झालेले काम संस्थात्मक पातळीवर सुरु ठेवण्याचे काम जलसाक्षरता केंद्र करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.गिरीश महाजन म्हणाले, जलसाक्षरता योजनेसाठी २८ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले आहेत. शेतकºयांना न्याय द्यायचा असेल तर त्याला पाणी आणि वीज द्यावी लागेल. यापुढील काळात ठिबक सिंचनाचा अवलंब केला जाणार आहे.विजय शिवतारे म्हणाले, पाण्याची उपयोगिता वाढविण्यावर भर दिला जात आहे. शहरातल्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पुस्तकामध्ये जलसाक्षरता मोहिमेचा समावेश केला पाहिजे.यशदा येथील जलसाक्षरता केंद्र हे मुख्यालय असेल, विभागीय पातळीवर त्याची कार्यालये स्थापन करण्यात येतील. या कार्यालयांच्या माध्यमातून जलसाक्षरता जागृतीचे काम केले जाईल.राजेंद्रसिंहांकडे जलकुंभ सुपूर्तपाच खोºयातील नद्यांचे आणलेले पाणी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते एका जलकुंभात एकत्र करण्यात आले. हा जलकुंभ मुख्यमंत्र्यांनी जलपुरुष राजेंद्रसिंह यांच्याकडे सुपूर्त केला. राजेंद्रसिंह मंगळवारपासून जल संरक्षणाच्या प्रबोधनासाठी ‘चंद्रभागा नमामि’ ही यात्रा करणार आहेत. या यात्रेमध्ये हा जलकुंभ घेऊन ते फिरणार आहेत.जनतेची दुष्काळ व पुरापासून सुटका झाल्यानंतर खºया अर्थाने स्वातंत्र मिळाले असे म्हणता येईल. राज्यातील ४ वेगवेगळ्या प्रकारच्या जलसाक्षरता राबविल्या जाणे आवश्यक आहे. पर्जन्यचक्र व राज्यातील पीक पद्धती यामध्ये समन्वय निर्माण झाला पाहिजे. राज्याला पाणीदार बनविण्याची मोहीम सुरू होत आहे. छोट्या नद्यांना प्रवाहित करण्याचे काम दुसºया टप्प्यात हाती घेतले जावे.- राजेंद्रसिंह, जलतज्ज्ञ