शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजगडाकडे जाणाऱ्या पुलावर पाणी; बारागाव मावळ परिसरातील गावांचा संपर्क तुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 21:12 IST

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोसळलेल्या दरडी बाजूला; रस्त्यांचा मार्ग मोकळा            

मार्गसनी : पुणे जिल्ह्यासह राज्यभर गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती ओढवली आहे. त्याचवेळी राजगडकडे जाणाऱ्या साखर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असल्याने बारागाव मावळ परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. तर धानेपजवळ असलेला पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे. 

पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरती असणारे कर्नवडी गावाजवळ असलेल्या डोंगराला मागील वर्षी भेगा पडलेल्या होत्या. त्यामुळे या गावास धोका संभवतो म्हणून या गावास पाहणी करण्यासाठी तहसीलदार शिवाजी शिंदे  साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार गुप्त विभागाचे प्रमुख अभय बर्गे गेले असता कर्नवडी गावाला जोडणाऱ्या दरीमध्ये जास्त पाणी आल्याने गावांमध्ये जाता आले नाही. परंतु फोनवर संपर्क केल्यानंतर येथील लोक सुरक्षित असल्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी यावेळी सांगितले.

वेल्हे तालुक्यात गेली पाच दिवस पावसाने थैमान घातले असून प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तालुक्यातील वेल्हे केळद आणि पानशेत घोल मार्ग मोकळा झाला आहे. तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय सपकाळ  पोलीस निरीक्षक मनोज पवार आदी अधिकाऱ्यांनी तत्परतेने जाधववाडी येथे कोसळलेली दरड बाजूला केली. तसेच पानशेत - घोल रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. 

गुंजवणी धरणातून पाणी सोडल्याने कानंदी नदी दुथडी भरून वाहत आहे. तर राजगडाकडे जाणारा साखर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलेला आहे. केळद वेल्हे रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तर रस्त्याला ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. तरी नागरिकांनी रात्रीच्यावेळी प्रवास करू नये असे आवाहन तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी यावेळी केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFortगड