शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 5, 2017 02:14 IST

बारामती तालुक्यातील २२ गावे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ४० वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची

मोरगाव : बारामती तालुक्यातील २२ गावे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ४० वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असल्याने बळीराजा देशोधडीला लागला आहे. यामुळे मुर्टी (ता. बारामती) येथे अंध नामदेव अप्पा कारंडे यांनी पाण्यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मुर्टी, मोराळवाडी, मोढवे, मोरगाव, तरडोली, आंबी, लोणी भापकर, जळगाव कडेपठार, ढाकाळे, मुढाळे, माळवाडी, जळगाव, भिलारवाडी, सायंबाचीवाडी, काऱ्हाटी, फोंडवाडा ही कायम दुष्काळी गावे आहेत. या गावांतील जमीन बहुतांश काळी, कसदार असूनही शेतकरी पाण्याअभावी देशोधडीला लागला आहे. जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले नामदेव कारंडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विविध विभागांना त्यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कारंडे यांनी सांगितले, की वर्षातील दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरडी असलेली कऱ्हा नदी व आठ महिन्यांपेक्षा अधीक काळ वाहणारी नीरा नदी यांचा जोड प्रकल्प राबविल्यास येथील शेतीला पाणी मिळेल. तसेच, तालुक्यातील बहुतांश खेडेगावांत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळत नाही. मुर्टी येथे चांगले बसस्थानक बांधावे, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांना योग्य मानधन द्यावे. मुर्टी येथे पोलीस मदत केंद्र व्हावे, गुंजवणी धरणातील पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी मिळावे, पुरंदर उपसा योजना शासनामार्फत १२ महिने कार्यान्वित ठेवावी, मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशा वेगवेगळ्या सामाजिक कामांसाठी कारंडे यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, बुधवारी (दि. ३) जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी नामदेव कारंडे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)आरोग्य तपासणी करू देणार नाही : कारंडेदरम्यान, मुर्टी आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे. जोपर्यंत आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक होत नाही. तोपर्यंत मी माझी वैद्यकीय तपासणी करू देणार नाही, असेही कारंडे यांनी सांगितले. यापूर्वीही कारंडे यांनी आॅक्टोबर २०१३मध्ये जिरायती भागातील गावांसाठी ६ दिवस उपोषण केले होते.दुसऱ्यांदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तप्त उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा एक घोट जरी मिळाला नाही, तरी पशुपक्ष्यांसह मनुष्य कासावीस होतो. मात्र, अशा दिवसांत कारंडे यांच्या उपोषणामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.