शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 5, 2017 02:14 IST

बारामती तालुक्यातील २२ गावे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ४० वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची

मोरगाव : बारामती तालुक्यातील २२ गावे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ४० वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असल्याने बळीराजा देशोधडीला लागला आहे. यामुळे मुर्टी (ता. बारामती) येथे अंध नामदेव अप्पा कारंडे यांनी पाण्यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मुर्टी, मोराळवाडी, मोढवे, मोरगाव, तरडोली, आंबी, लोणी भापकर, जळगाव कडेपठार, ढाकाळे, मुढाळे, माळवाडी, जळगाव, भिलारवाडी, सायंबाचीवाडी, काऱ्हाटी, फोंडवाडा ही कायम दुष्काळी गावे आहेत. या गावांतील जमीन बहुतांश काळी, कसदार असूनही शेतकरी पाण्याअभावी देशोधडीला लागला आहे. जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले नामदेव कारंडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विविध विभागांना त्यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कारंडे यांनी सांगितले, की वर्षातील दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरडी असलेली कऱ्हा नदी व आठ महिन्यांपेक्षा अधीक काळ वाहणारी नीरा नदी यांचा जोड प्रकल्प राबविल्यास येथील शेतीला पाणी मिळेल. तसेच, तालुक्यातील बहुतांश खेडेगावांत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळत नाही. मुर्टी येथे चांगले बसस्थानक बांधावे, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांना योग्य मानधन द्यावे. मुर्टी येथे पोलीस मदत केंद्र व्हावे, गुंजवणी धरणातील पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी मिळावे, पुरंदर उपसा योजना शासनामार्फत १२ महिने कार्यान्वित ठेवावी, मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशा वेगवेगळ्या सामाजिक कामांसाठी कारंडे यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, बुधवारी (दि. ३) जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी नामदेव कारंडे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)आरोग्य तपासणी करू देणार नाही : कारंडेदरम्यान, मुर्टी आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे. जोपर्यंत आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक होत नाही. तोपर्यंत मी माझी वैद्यकीय तपासणी करू देणार नाही, असेही कारंडे यांनी सांगितले. यापूर्वीही कारंडे यांनी आॅक्टोबर २०१३मध्ये जिरायती भागातील गावांसाठी ६ दिवस उपोषण केले होते.दुसऱ्यांदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तप्त उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा एक घोट जरी मिळाला नाही, तरी पशुपक्ष्यांसह मनुष्य कासावीस होतो. मात्र, अशा दिवसांत कारंडे यांच्या उपोषणामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.