शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

विषमतेच्या भिंती तोडाव्या लागतील

By admin | Updated: March 26, 2017 02:15 IST

सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात संकल्पचित्र आणि व्यावहारिक तपशील यांचा मेळ घालण्याची गरज आहे.

पुणे : सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात संकल्पचित्र आणि व्यावहारिक तपशील यांचा मेळ घालण्याची गरज आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण वैश्विक होण्याऐवजी संकुचित झालो आहोत. मोदी, ट्रम्प यांच्यासारख्या नेतृत्वामुळे भिंती पडल्या की उभ्या राहिल्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या भिंती तोडण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.सामाजिक कृतज्ञता निधी संस्थेच्या वतीने वार्षिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मुंबईचे गजानन खातू, एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार वाईच्या उषा ढवण आणि डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार जगदीश खैरालिया यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी भावे बोलत होत्या. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे आदी या वेळी उपस्थित होते.भावे म्हणाल्या, ‘‘मूल्यांचा गाभा असलेलेच लोक परिवर्तनाचे स्वप्न पाहू शकतात. सध्या बदल आणि परिवर्तन यांतील बदलच कळेनासा झाला आहे. राज्यकर्त्यांनी विकासाचे गारूड निर्माण केले आहे. विकास या शब्दाचेच भय वाटू लागले आहे. शासनाविरुद्ध बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना मरू देणार नाही, असे किंचाळून सांगणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मरू देणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहिले जाणार का? ही समीकरणे बदलण्यासाठी तरुण पिढीला नवी ऊर्जा द्यावी लागेल. रोजच्या जगण्यातील बदलांतून सामान्य माणसाची गुणवत्ता वाढविण्याची आणि माणसातील गुंतवणुकीची गरज आहे.’’उषा ढवण आणि जगदीश खैरालिया यांनीही मनोगत व्यक्त केले. सुभाष वारे यांनी प्रास्ताविक केले. काका पायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एवढा निधी मिळतो कोठून ? मुख्यमंत्री गडबडल्यासारखे का वागत आहेत? त्यांना शेतकऱ्यांबाबत ठोस भूमिका घेता येत नाही का? असा सवाल करीत बाबा आढाव म्हणाले, ‘‘संसदीय लोकशाहीत उलथापालथ होत आहे. मूलभूत प्रश्नांना तोंड फुटले आहे. सरकारच यशामुळे सुस्त झाले आहे आणि सर्वांना शत्रू मानत आहे.४कर्जमाफीच्या मागणीवर संघर्ष होत असताना शेतीमालाच्या हमीभावाबाबत कोणीच बोलत नाही, हा धोका आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची, सरकारला पर्याय देण्याची आवश्यकता आहे. पर्यायाशिवाय काळाचे आव्हान स्वीकारता येणार नाही. निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश सरकार कसे पचवते, याकडे सर्वांचे बारकाईने लक्ष आहे.’’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एवढा निधी मिळतो कोठून, असा सवालही त्यांनी केला.शेतकरी संघटनांचे नेते आंदोलन करून सत्ताधारी झाले. शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे. आजची पिढी बंडखोर झाली आहे. त्यांच्या बंडखोरीचे योग्य दिशेने बंडात परिवर्तन करावे लागेल. प्रश्नांची उत्तरे स्वत:च्याच देशात शोधावी लागतील. त्यासाठी स्वत:च्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजाशी, नव्या पिढीशी सुसंवाद साधावा लागेल. भारताची अर्थव्यवस्था शेतीमुळे टिकून आहे. त्यामुळे शेतीमालाला रास्त दर मिळाला, तर अर्थव्यवस्थेला गती मिळेल.- गजानन खातू