शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

वालचंदनगर - कळंब मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:13 IST

वालचंदनगर : वालचंदनगर ते कळंब मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यातच ...

वालचंदनगर : वालचंदनगर ते कळंब मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यातच भर म्हणून की काय रस्त्याच्या दुतर्फा बाजूंना काटेरी झुडपांनी विळखा घातल्याने वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज लागत नाही, परिणामी काटेरी झुडपांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सदर रस्त्याची डागडुजी करून रस्त्याच्या कडेला असणारी काटेरी झुडपे काढावीत, अशी मागणी प्रवासीवर्ग आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून होत आहे. वालचंदनगर ही मुख्य बाजारपेठ आणि औद्योगिक वसाहत असून येथील कंपनीत कळंब, चिखली,कुरवली, जांब, उद्धट, पवारवाडी,मानकरवाडी, तावशी,परिटवाडी भागातील शेकडो कामगार याच रस्त्याने तीन पाळ्यांमध्ये काम करण्यासाठी येत जात असतात. वालचंदनगर - कळंब हा रहदारीचा मुख्य मार्ग असून या मार्गावरून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस येत जात असतात, कळंब गाव लोकसंख्येच्या दृष्टीने इंदापूर तालुक्यात मोठे असून येथे शैक्षणिक संकुले आहेत, येथील वालचंद विद्यालयात फडतरे शैक्षणिक संकुलात आणि विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी ये-जा करीत असतात. सदरचा रस्ता रहदारीसाठी महत्त्वाचा असल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, ठेकेदाराकडून कामात हेळसांड झाल्यामुळे रस्त्याची वाट लागली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

वालचंदनगर-कळंब या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढली असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

१४०९२०२१-बारामती-०४

————————————————