शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा

By admin | Updated: April 30, 2015 23:54 IST

पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार, याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे.

पुणे : गेल्या पंधरा वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेला व पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार, याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे. शासनाने पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर तरी पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १९९७ ला हे विमानतळ राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्यातील लष्करी तळाला त्याचा अडथळा येत असल्याने शासनाने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर खेड तालुक्यातच चाकणच्या उत्तरेस पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या शिरोली-चांदूस परिसरात विमानतळासाठी जागेचा सर्व्हे करण्यात आला. या जागेला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तसेच येथील डोंगराळ जागा विमानतळासाठी तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचा अभिप्राय एमएडीसी (महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी) दिला. त्यामुळे विमानतळासाठी पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरु झाला आणि कडूस-पाईट येथे विमानतळ करता येईल का, याबाबत विचार सुरू झाला. ही जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा अभिप्राय तांत्रिक समितीने दिला आहे. परंतु येथेदेखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने राजगुरुनगरच्या पूर्वेस ‘सेझ’च्या जागेत विमानतळ करता येईल, असा प्रस्ताव पुढे आला आहे. परंतु याबाबत देखील गेले दोन वर्षे काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्यात राज्य शासनाने सेझसाठी संपादित करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही जमीनदेखील विमानतळासाठी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे भाजप सरकारच्या काळात पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)४शासनाने पुणे आणि लगतच्या जिल्ह्यातील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे १९९७ ला हे विमानतळ राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला.