शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

पावसाची प्रतीक्षा : दावडी परिसरातील विहिरी कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:15 IST

आॅगस्ट महिना उजाडला, तरी पूर्व भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील विहिरी कोरड्याच आहेत. शेतातील पिकांना ऐन पावसाळ्यातही कृषीपंपाद्वारे पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

दावडी - आॅगस्ट महिना उजाडला, तरी पूर्व भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील विहिरी कोरड्याच आहेत. शेतातील पिकांना ऐन पावसाळ्यातही कृषीपंपाद्वारे पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. शेतकरी पुरेसा पाऊस कधी पडेल, याची वाट पाहत आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी, निमगाव, खरपुडी, रेटवडी, गोसासी, कनेरसर, वरुडे, वाफगाव, गाडकवाडी, टाकळकरवाडी, चिंचबाईवाडी या परिसरात यंदा आॅगस्ट माहिन्यापर्यंत जेमतेम पाऊस पडला. पावसाच्या सरी येतात. मात्र, हा पाऊस पिकांना पुरेसा ठरत नाही. त्यामुळे पाण्याची सोय असलेले शेतकरी ठिबक सिंचनद्वारे, अथवा पाटा वाटे शेतीची भरणी करत आहे. पुर्व भागात शेतक-यांनी बटाटा, वटाणा, मका यासह आदी तरकारी पिके घेतली आहेत.जमिनीच्या ओलाव्यासाठी कृत्रिमरीत्या पाणी भरणाशेतकरी पिकांना पाणी देऊ लागले आहेत. यंदा पाऊस नसल्याने विहिरी, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. शेतकरी पिकांना पाणी देत असल्याने विहिरीचीही पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी कांदा बी टाकण्यास सुरुवात केली आहे. या कांदा बियाण्याला उगवणीसाठी जामिनीत ओलवा नसल्याने शेतात कृत्रिमरीत्या पाणी भरले जात आहे. पुढील काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास विहिरी, तलाव लवकरच कोरडे पडण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे.निमसाखर परिसरात शेतीसाठी पाणी नाही1निरवांगी : निमसाखर व परिसरात शेतातील विविध प्रकारची पिके यांना पाण्याची अत्यंत गरज भासू लागली आहे. पाण्याअभावी पिके जळून जाऊ लागली आहेत. पाटबंधारे विभागाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी निमसाखर व परिसरातील शेतकरी करीत आहेत.2निमसाखर व परिसरात पाऊस पडला नसल्याने शेतातील विहिरींना पाणी अत्यंत कमी झाले आहे. यामुळे ज्या शेतकºयांच्या विहिरी आहेत, त्यांची ही पिके पाण्यावाचून जळून जाऊ लागली आहेत. जे शेतकरी फक्त कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्याच्या पिकांना तर पाण्याची अत्यंत गरज भासू लागली आहे. त्वरित कॅनॉलचे पाणी मिळणे गरजेचे आहे; अन्यथा शेतकºयांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.3निमसाखर (ता. इंदापूर) येथील विहिरीचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. या परिसरात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना त्वरित पाणी मिळणे गरजेचे आहे. शेतकºयांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या