शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाची प्रतीक्षा : दावडी परिसरातील विहिरी कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:15 IST

आॅगस्ट महिना उजाडला, तरी पूर्व भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील विहिरी कोरड्याच आहेत. शेतातील पिकांना ऐन पावसाळ्यातही कृषीपंपाद्वारे पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

दावडी - आॅगस्ट महिना उजाडला, तरी पूर्व भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील विहिरी कोरड्याच आहेत. शेतातील पिकांना ऐन पावसाळ्यातही कृषीपंपाद्वारे पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. शेतकरी पुरेसा पाऊस कधी पडेल, याची वाट पाहत आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी, निमगाव, खरपुडी, रेटवडी, गोसासी, कनेरसर, वरुडे, वाफगाव, गाडकवाडी, टाकळकरवाडी, चिंचबाईवाडी या परिसरात यंदा आॅगस्ट माहिन्यापर्यंत जेमतेम पाऊस पडला. पावसाच्या सरी येतात. मात्र, हा पाऊस पिकांना पुरेसा ठरत नाही. त्यामुळे पाण्याची सोय असलेले शेतकरी ठिबक सिंचनद्वारे, अथवा पाटा वाटे शेतीची भरणी करत आहे. पुर्व भागात शेतक-यांनी बटाटा, वटाणा, मका यासह आदी तरकारी पिके घेतली आहेत.जमिनीच्या ओलाव्यासाठी कृत्रिमरीत्या पाणी भरणाशेतकरी पिकांना पाणी देऊ लागले आहेत. यंदा पाऊस नसल्याने विहिरी, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. शेतकरी पिकांना पाणी देत असल्याने विहिरीचीही पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी कांदा बी टाकण्यास सुरुवात केली आहे. या कांदा बियाण्याला उगवणीसाठी जामिनीत ओलवा नसल्याने शेतात कृत्रिमरीत्या पाणी भरले जात आहे. पुढील काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास विहिरी, तलाव लवकरच कोरडे पडण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे.निमसाखर परिसरात शेतीसाठी पाणी नाही1निरवांगी : निमसाखर व परिसरात शेतातील विविध प्रकारची पिके यांना पाण्याची अत्यंत गरज भासू लागली आहे. पाण्याअभावी पिके जळून जाऊ लागली आहेत. पाटबंधारे विभागाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी निमसाखर व परिसरातील शेतकरी करीत आहेत.2निमसाखर व परिसरात पाऊस पडला नसल्याने शेतातील विहिरींना पाणी अत्यंत कमी झाले आहे. यामुळे ज्या शेतकºयांच्या विहिरी आहेत, त्यांची ही पिके पाण्यावाचून जळून जाऊ लागली आहेत. जे शेतकरी फक्त कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्याच्या पिकांना तर पाण्याची अत्यंत गरज भासू लागली आहे. त्वरित कॅनॉलचे पाणी मिळणे गरजेचे आहे; अन्यथा शेतकºयांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.3निमसाखर (ता. इंदापूर) येथील विहिरीचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. या परिसरात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना त्वरित पाणी मिळणे गरजेचे आहे. शेतकºयांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या