शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

पुढील आरोपांची वाट पाहतोय, जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात आहे - एकनाथ खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 03:05 IST

‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही.

पुणे : ‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. त्यामुळे आता मी पुढील आरोपांची वाट पाहत आहे. त्यातही काहीही आढळणार नाही. केवळ जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात आहे. संघर्षमय जीवन जगत राजकारणाचा प्रवास केला, तसा विद्यार्थ्यांनीही जीवनात संघर्ष करायला हवा’’, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी सांगितले.न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचा जीवनगौरव पुरस्कार खडसे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन.सी. जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आणि सुरेश चव्हाणके यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला.खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्ती, असे अनेकांना वाटते. मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून नवी सुरुवात आहे. इतरांनी या माध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले. त्यामुळे कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजपाचे सरकार सत्तेत आले. आज मुंडे असते, तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असती.राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभवले आहेत. सध्या या देशाची धर्मशाळा झाली आहे, अशी उद्विग्नताही खडसे यांनी व्यक्त केली.असल्या मंत्रिपदाला मी लाथ मारतोकाहीही संबंध नसताना माझ्यावर काही महिन्यात सातत्याने आरोप होत गेले. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता. ज्याने उभ्या आयुष्यात परिश्रम घेतले, चारित्र्य जपले त्याच्यावर असे आक्षेप घेणे मरणापेक्षा मरण आहे. काय करायचे असले मंत्रिपद ? असल्या मंत्रिपदाला मी लाथ मारतो, असे माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले.देशाची धर्मशाळाझाली आहेराजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभवले आहेत. सध्या या देशाची धर्मशाळा झाली आहे, अशी उद्विग्नताही खडसे यांनी व्यक्त केली.