शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

पुढील आरोपांची वाट पाहतोय, जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात आहे - एकनाथ खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 03:05 IST

‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही.

पुणे : ‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. त्यामुळे आता मी पुढील आरोपांची वाट पाहत आहे. त्यातही काहीही आढळणार नाही. केवळ जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात आहे. संघर्षमय जीवन जगत राजकारणाचा प्रवास केला, तसा विद्यार्थ्यांनीही जीवनात संघर्ष करायला हवा’’, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी सांगितले.न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचा जीवनगौरव पुरस्कार खडसे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन.सी. जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आणि सुरेश चव्हाणके यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला.खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्ती, असे अनेकांना वाटते. मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून नवी सुरुवात आहे. इतरांनी या माध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले. त्यामुळे कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजपाचे सरकार सत्तेत आले. आज मुंडे असते, तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असती.राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभवले आहेत. सध्या या देशाची धर्मशाळा झाली आहे, अशी उद्विग्नताही खडसे यांनी व्यक्त केली.असल्या मंत्रिपदाला मी लाथ मारतोकाहीही संबंध नसताना माझ्यावर काही महिन्यात सातत्याने आरोप होत गेले. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता. ज्याने उभ्या आयुष्यात परिश्रम घेतले, चारित्र्य जपले त्याच्यावर असे आक्षेप घेणे मरणापेक्षा मरण आहे. काय करायचे असले मंत्रिपद ? असल्या मंत्रिपदाला मी लाथ मारतो, असे माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले.देशाची धर्मशाळाझाली आहेराजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभवले आहेत. सध्या या देशाची धर्मशाळा झाली आहे, अशी उद्विग्नताही खडसे यांनी व्यक्त केली.