शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आरोपांची वाट पाहतोय, जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात आहे - एकनाथ खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 03:05 IST

‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही.

पुणे : ‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. त्यामुळे आता मी पुढील आरोपांची वाट पाहत आहे. त्यातही काहीही आढळणार नाही. केवळ जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात आहे. संघर्षमय जीवन जगत राजकारणाचा प्रवास केला, तसा विद्यार्थ्यांनीही जीवनात संघर्ष करायला हवा’’, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी सांगितले.न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचा जीवनगौरव पुरस्कार खडसे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन.सी. जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आणि सुरेश चव्हाणके यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला.खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्ती, असे अनेकांना वाटते. मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून नवी सुरुवात आहे. इतरांनी या माध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले. त्यामुळे कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजपाचे सरकार सत्तेत आले. आज मुंडे असते, तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असती.राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभवले आहेत. सध्या या देशाची धर्मशाळा झाली आहे, अशी उद्विग्नताही खडसे यांनी व्यक्त केली.असल्या मंत्रिपदाला मी लाथ मारतोकाहीही संबंध नसताना माझ्यावर काही महिन्यात सातत्याने आरोप होत गेले. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता. ज्याने उभ्या आयुष्यात परिश्रम घेतले, चारित्र्य जपले त्याच्यावर असे आक्षेप घेणे मरणापेक्षा मरण आहे. काय करायचे असले मंत्रिपद ? असल्या मंत्रिपदाला मी लाथ मारतो, असे माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले.देशाची धर्मशाळाझाली आहेराजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभवले आहेत. सध्या या देशाची धर्मशाळा झाली आहे, अशी उद्विग्नताही खडसे यांनी व्यक्त केली.