शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

अपंगांच्या ३ टक्क्यांसाठी शून्य ‘आस्था’

By admin | Updated: February 28, 2015 02:23 IST

अपंग व्यक्ती अधिनियमानुसार अपंग व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे

विशाल शिर्के, पुणेअपंग व्यक्ती अधिनियमानुसार अपंग व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अपंग संघटनांनी रान उठवले आहे. मात्र, राखीव निधी कोणत्या योजनांवर खर्च करायचा यासाठी गेल्या वीस वर्षांत मार्गदर्शक सूचीच तयार झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात शासनाला मार्गदर्शक योजनांची यादी देऊनही त्यावर काहीच निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ च्या तरतुदीनुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या निधीपैकी ३ टक्के निधी हा अपंग कल्याणकारी योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकली नाही. काही स्थानिक स्वराज्य संस्था पिठाची गिरणी, कांडप यंत्र, शिलाई यंत्र, अपंग सहाय्यकारी साधनांचे वाटप अशा योजनांसाठी तुरळक निधी देत होती. मात्र, हे प्रमाण अगदी अत्यल्प आहे असे संस्थांचे म्हणणे आहे.