शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

डॉक्टरांच्या रूपात भेटला विठ्ठल

By admin | Updated: June 25, 2017 04:39 IST

‘विठू माऊली तू माऊली जगाची’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल आईच्या मायेने सर्व भक्तांची काळजी घेतो.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल आईच्या मायेने सर्व भक्तांची काळजी घेतो. भक्तांना मदतीसाठी कोणत्याही रूपाने धावून जातो. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील एका वारकरी महिलेलादेखील डॉक्टरांच्या रूपाने विठ्ठल भेटला.रुक्मिणी भगवंत अभंग असे या ज्येष्ठ वारकरी महिलेचे नाव आहे. रांंजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २४) पालखी सोहळा उंडवडी सुपे येथे विसावला. यादरम्यान अभंग यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघाताला सामोरे जावे लागले. यामध्ये त्यांचा पाय जायबंदी झाला. त्यांच्या दिंडी प्रमुखाने १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेतून रुक्मिणी यांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल केले. जायबंदी झालेल्या पायाची येथील वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांनी अस्थितज्ज्ञ डॉ. गोकुळ काळे यांच्याशी संपर्क साधला. तपासणीनंतर रुक्मिणी यांच्या उजव्या पायाचा पंजा आणि गुडघ्याच्या मधील हाड मोडल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डॉ. काळे यांनी एक्स-रे यंत्रणेसह शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सहित्य त्यांच्या रुग्णालयातून सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात हलविले. त्यांच्या पायात स्टीलचा रॉड बसविण्यात आला आहे. या वेळी भूलतज्ज्ञ डॉ. सुजित अडसूळ, डॉ. चिंचोलीकर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान सहकार्य केले.डॉ. काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की रुक्मिणी अभंग यांच्या उजव्या पायाच्या नडगीचे हाड मोडले आहे. त्यांच्यावर ‘इंटर लॉकिंग टीबिया मेलिंग’ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्या पायात रॉड बसविण्यात आला आहे. एका महिन्यात त्या पूर्ववत चालू शकतील.डॉक्टरांनी वाढविले मनोबलरुक्मिणी अभंग यांना शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत जवळचे कोणीही नव्हते. पाय दुखत असल्याने त्या अक्षरश: रडत होत्या. त्यामुळे घरी जाण्याचा त्या डॉक्टरांकडे हट्ट करीत होत्या. ल्ल पायाचे हाड मोडल्याने त्यांना शस्त्रक्रिया केल्याशिवाय जाऊ देणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉक्टर मीरा चिंचोलीकर, डॉ. रणजित मोहिते यांनी त्यांना धीर दिला. याच ठिकाणी ‘आपण तुमच्यावर चांगले उपचार करू. तुम्ही लवकर बऱ्या व्हाल,’ अशा शब्दांत त्यांना धीर दिला. त्यामुळे रुक्मिणी यांना धीर मिळाला. डॉक्टरांनीच नातेवाइकांची भूमिका बजावली.