शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’

By admin | Updated: February 2, 2015 00:23 IST

पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’च आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत सहजरीत्या कोणीही पोहोचू शक

सोमेश्वरनगर : पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’च आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत सहजरीत्या कोणीही पोहोचू शकते. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशीच अवस्था येथील आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हे चित्र दिसून आले. पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण व माळशिरस या तालुक्यातील शेकडो गावांना पाणीपुरवठा करणारे नीरा नदीवरील वीर हे ९ टीएमसी पाणी क्षमता असणारे धरण आहे. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली या ठिकाणची भौगोलिक परिस्थितीत पाहून राज्य सरकारने हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाखो एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेती सुजलाम् सुफलाम् झाली आहे. मात्र, आज याच वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’ आहे. धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत जायचे असल्यास कोणीही परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. मात्र, तुम्हाला जर वीर धरणापर्यंत तुम्ही खुशाल जाऊ शकता. लोणंदपासून शिरवळच्या दिशेने निघाले असता, लोणंदपासून १० ते १२ किलोमीटरवर हे वीर धरण लागते. या ठिकाणी धरणाच्या भिंतीवरील मुख्य गेट आहे. या ठिकाणावरून धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत जाता येते. धरणाची ही सुरक्षितता अचंबित करणारी आहे.