शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’

By admin | Updated: February 2, 2015 00:23 IST

पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’च आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत सहजरीत्या कोणीही पोहोचू शक

सोमेश्वरनगर : पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’च आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत सहजरीत्या कोणीही पोहोचू शकते. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशीच अवस्था येथील आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हे चित्र दिसून आले. पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण व माळशिरस या तालुक्यातील शेकडो गावांना पाणीपुरवठा करणारे नीरा नदीवरील वीर हे ९ टीएमसी पाणी क्षमता असणारे धरण आहे. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली या ठिकाणची भौगोलिक परिस्थितीत पाहून राज्य सरकारने हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाखो एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेती सुजलाम् सुफलाम् झाली आहे. मात्र, आज याच वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’ आहे. धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत जायचे असल्यास कोणीही परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. मात्र, तुम्हाला जर वीर धरणापर्यंत तुम्ही खुशाल जाऊ शकता. लोणंदपासून शिरवळच्या दिशेने निघाले असता, लोणंदपासून १० ते १२ किलोमीटरवर हे वीर धरण लागते. या ठिकाणी धरणाच्या भिंतीवरील मुख्य गेट आहे. या ठिकाणावरून धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत जाता येते. धरणाची ही सुरक्षितता अचंबित करणारी आहे.