शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

राज्यातील द्राक्षबागायतदार केंद्राच्या धोरणाने अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने स्वीकारलेले धोरण राज्यातील द्राक्ष बागायतदारांना त्रासदायक होत असल्याची तक्रार द्राक्षबागायतदार संघाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने स्वीकारलेले धोरण राज्यातील द्राक्ष बागायतदारांना त्रासदायक होत असल्याची तक्रार द्राक्षबागायतदार संघाने केली आहे. यात राज्य सरकारने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी संघाने केली आहे.

कोरोना तसेच अतिवृष्टीसारखी नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच द्राक्षशेती अडचणीत आली आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच त्यांची आर्थिक गणिते निर्यातीवर अवलंबून असतात. अजूनही अनेक देशांमधील विमानवाहतूक कोरोनामुळे बंद आहे. उड्डाणे कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांनी भाडे दीडपट वाढवले आहे. कंटेनरचीही भाडेवाढ केली आहे, अशी माहिती संघाचे खजिनदार कैलास भोसले यांनी दिली.

यात भर म्हणून की केंद्र सरकारने निर्यातीवर यापूर्वी मिळत असलेले अनुदान अचानक बंद केले. कंटेनरसाठीही अनुदान मिळत होते, त्यावरही टाच आणली आहे. या सर्व परिस्थितीमुळे द्राक्षांसाठी एका किलोमागे उत्पादकाचा ३० रुपये खर्च वाढला आहे. परदेशात मिळणाऱ्याºदरातून तो भरून निघणे शक्य नाही. आधी कोरोनामुळे स्थानिक स्तरावर नुकसान झाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे तयार होत असलेल्या द्राक्षांचे घड नुकसानीत गेले. जे घड राहिले त्यातील द्राक्षमण्यांना तडे गेले. या नुकसानीत वाचण्यासाठी निर्यात हा चांगला पर्याय होता, तर तिथे केंद्र सरकारने अडचणी निर्माण केल्या आहेत, असे भोसले म्हणाले.

संघाच्या वतीने लवकरच राज्य सरकारमधील मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात भेट घेणार आहे. केंद्र सरकारमधील निर्यातविषयक अधिकाऱ्यांबरोबरही संपर्क साधण्यात येत आहे. अनुदान पूर्ववत सुरू करावे, कंटेनर, विमानवाहतूक यातील भाडेवाढ कमी करावी, अशा मागण्या त्यांच्याकडे करण्यात येत आहेत, अशी माहिती भोसले यांनी दिली.