शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

राज्यातील द्राक्षबागायतदार केंद्राच्या धोरणाने अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने स्वीकारलेले धोरण राज्यातील द्राक्ष बागायतदारांना त्रासदायक होत असल्याची तक्रार द्राक्षबागायतदार संघाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने स्वीकारलेले धोरण राज्यातील द्राक्ष बागायतदारांना त्रासदायक होत असल्याची तक्रार द्राक्षबागायतदार संघाने केली आहे. यात राज्य सरकारने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी संघाने केली आहे.

कोरोना तसेच अतिवृष्टीसारखी नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच द्राक्षशेती अडचणीत आली आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच त्यांची आर्थिक गणिते निर्यातीवर अवलंबून असतात. अजूनही अनेक देशांमधील विमानवाहतूक कोरोनामुळे बंद आहे. उड्डाणे कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांनी भाडे दीडपट वाढवले आहे. कंटेनरचीही भाडेवाढ केली आहे, अशी माहिती संघाचे खजिनदार कैलास भोसले यांनी दिली.

यात भर म्हणून की केंद्र सरकारने निर्यातीवर यापूर्वी मिळत असलेले अनुदान अचानक बंद केले. कंटेनरसाठीही अनुदान मिळत होते, त्यावरही टाच आणली आहे. या सर्व परिस्थितीमुळे द्राक्षांसाठी एका किलोमागे उत्पादकाचा ३० रुपये खर्च वाढला आहे. परदेशात मिळणाऱ्याºदरातून तो भरून निघणे शक्य नाही. आधी कोरोनामुळे स्थानिक स्तरावर नुकसान झाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे तयार होत असलेल्या द्राक्षांचे घड नुकसानीत गेले. जे घड राहिले त्यातील द्राक्षमण्यांना तडे गेले. या नुकसानीत वाचण्यासाठी निर्यात हा चांगला पर्याय होता, तर तिथे केंद्र सरकारने अडचणी निर्माण केल्या आहेत, असे भोसले म्हणाले.

संघाच्या वतीने लवकरच राज्य सरकारमधील मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात भेट घेणार आहे. केंद्र सरकारमधील निर्यातविषयक अधिकाऱ्यांबरोबरही संपर्क साधण्यात येत आहे. अनुदान पूर्ववत सुरू करावे, कंटेनर, विमानवाहतूक यातील भाडेवाढ कमी करावी, अशा मागण्या त्यांच्याकडे करण्यात येत आहेत, अशी माहिती भोसले यांनी दिली.