शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पोलिसांच्या निषेधार्थ गावे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 02:36 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध : नीरा नदी दूषित करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही

सांगवी : बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात १५० आंदोलकांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ सांगवीसह परिसरातील गावे कडकडीत बंद ठेवून पोलीस प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध करण्यात आला.

नीरा नदीपात्रात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या संबंधितांवर प्रशासनाला कारवाई करण्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आली होती. आठ दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नाही; त्यामुळे सोमवारी (दि. २५) बारामती-फलटण रस्त्यावर नीरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी १५० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २८) सकाळी १० वाजता सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, खांडज, नीरावागज, मेखळी, सोनगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. नीरेचे पाणी हा आमच्या जगण्याचा आधार आहे. बारामतीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आधी सत्य परिस्थिती पाहून मगच पावले उचलावीत. न्याय मागणाºयांवर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी दबावात असल्याचे सिद्ध होत असल्याचे या वेळी आंदोलकांनी सांगितले.

शेती नापीक होत चालल्याने घरदार सोडून जाण्याची वेळ आली आहे. प्रदूषित पाण्यामुळे नदीभोवतीचे पाणीस्रोतदेखील दूषित झाले आहेत. त्यामुळे गंभीर आजारांचादेखील सामना येथील रहिवाशांना भविष्यात करावा लागेल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे, माजी अध्यक्ष किरण तावरे, विजय तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकुले, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष युवराज तावरे, महेंद्र तावरे, अनिल सोरटे, सुहास पोंदकुले, वीरेंद्र तावरे, सचिन पोंदकुले यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीरा नदीच्या प्रदूषणावरून आंदोलन करणाºया शेतकºयांवर खोटे गुन्हे दाखल होतात; मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या परवानगीने बारामती तालुक्यात बेकायदेशीरपणे मटका, दारू, जुगार या राजरोसपणे चालणाºया अवैध धंद्यांच्या माध्यमातून ग्रामीण पोलिसांना बेसुमार हप्ते मिळतात. यामुळे तिथे कारवाई होत नाही.

‘अवैध धंदे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशी अवस्था पोलीस अधिकाºयांची झालेली आहे. यामुळे ते बाहेर काढण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असा कडक इशाराच गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांनी पोलिसांना दिला आहे. तर, पोलीस प्रशासनाच्या निषेध सभेत अवैध धंद्यांचा विषय निघण्याची चाहूल लागताक्षणी बारामती ग्रामीण पोलिसांनी दोन दिवस अगोदर दारूअड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारला. आंदोलकांवर केलेल्या कारवाईमुळे काही संतप्त आंदोलक अवैध धंद्यांचा विषय काढतील, या भीतीपोटी पोलिसांनी दारूअड्ड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा चांगलीच रंगली.प्रदूषित पाणी बंद करण्याचा अधिकार प्रांत यांनादेखील आहे. ब्रिटिशांनी १८६०मध्ये हा कायदा केलेला आहे. ग्रामस्थांनी प्रांत यांना तसे निवेदन दिल्यास २४ तासांत प्रांताधिकारी संबंधिताला तशा प्रकारे नोटीस बजावू शकतात. निवेदन देऊन देखील या ठिकाणी कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे यातून असे दिसून येते, की अधिकाºयांनाच काही कायद्यांची माहिती नाही. यामुळे पोलीस अधिकाºयांनी खटले दाखल केले असल्याचे मत अ‍ॅड. भगवानराव खारतोडे यांनी व्यक्त केले.नीरा नदीत जाणारे दूषित पाणी कायमचे बंद होऊन संबंधितांवर कारवाई होत नाही. त्यामुळे आमच्या भावना पोहोचण्यासाठी प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकाºयांना काळ्या पाण्याने अंघोळ घालून आगामी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणारच, असा पवित्राच ग्रामस्थांनी घेतला आहे.