शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

गावोगावी 'जल'जागृती

By admin | Updated: March 18, 2016 03:03 IST

सतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा

- महेंद्र कांबळे,  बारामतीसतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल, कृषी आणि जलसंपदा खात्याकडे प्रामुख्याने सोपविली आहे. ाागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्तच घटले. धरणांमध्येदेखील पाणी साठले नाही. शेती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांसाठी पाणी, असे नियोजन करताना जलसंपदा खात्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना पश्चिम महाराष्ट्रातदेखील दिवसेंदिवस पाण्याची भूगर्भातील पातळी खालावत आहे. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी होत आहे. जवळपास ४ जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उजनीसारख्या मोठ्या धरणांचा पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे आता जलजागृती अभियानाच्या माध्यमातून पाणीबचतीची मोहीम राज्य सरकार राबविणार आहे.सध्या उजनीचा उपयुक्त साठा वजा १४.७४ टक्के आहे. तर, एकूण साठा वजा २७.५७ टक्के आहे. आणखी ३ महिने शिल्लक पाण्यासाठी तग धरावा लागणार आहे. उजनीचे पाणी शेतीसाठी सोडणे बंद करण्यात आले आहे. जलसंपदा, कृषी, महसूलसह सर्व शासकीय, निमशासकीय खात्यांना या जलजागृती अभियानासाठी राज्य शासनाने फतवाच काढला आहे. त्यानुसार जलसंपदा खात्यामार्फत दि. १६ ते २२ मार्चदरम्यान अभियान राबविले जाणार आहे. जलजागृती अभियानात पिकांसाठी पाणी देण्याची पद्धत बदलणे, पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर, पाण्याचा पुनर्वापर करणे, यांसह इतर उपाययोजना करण्यासाठी जलजागृती केली जाणार आहे.200 ते 250 फुटांपर्यंत खोदलेल्या विंधन विहिरींचे पाणी आटले असून विहिरी कोरड्या पडल्या अवस्थेत आहेत. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. दुष्काळाची अशी भीषण परिस्थिती डोळ्यासमोर असताना पहिल्यांदाच जलजागृतीसाठी जलसंपदा खात्याला पुढाकार घ्यावा लागला आहे. राज्य सरकारने यापूर्वी मोठी धरणे बांधण्यापेक्षा नाले, नदी, ओढे आदींचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर पाझर तलावातील गाळ उपसण्याची मोहीम राबविली आहे. आता राज्यात गावोगावी जलजागृतीची मोहीम राबणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह लोकांचा सहभाग, शेतकरी मंडळांचा सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव, उपविभागीय अभियंता ए. आर. भोसले यांनी दिली.