शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी 'जल'जागृती

By admin | Updated: March 18, 2016 03:03 IST

सतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा

- महेंद्र कांबळे,  बारामतीसतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल, कृषी आणि जलसंपदा खात्याकडे प्रामुख्याने सोपविली आहे. ाागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्तच घटले. धरणांमध्येदेखील पाणी साठले नाही. शेती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांसाठी पाणी, असे नियोजन करताना जलसंपदा खात्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना पश्चिम महाराष्ट्रातदेखील दिवसेंदिवस पाण्याची भूगर्भातील पातळी खालावत आहे. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी होत आहे. जवळपास ४ जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उजनीसारख्या मोठ्या धरणांचा पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे आता जलजागृती अभियानाच्या माध्यमातून पाणीबचतीची मोहीम राज्य सरकार राबविणार आहे.सध्या उजनीचा उपयुक्त साठा वजा १४.७४ टक्के आहे. तर, एकूण साठा वजा २७.५७ टक्के आहे. आणखी ३ महिने शिल्लक पाण्यासाठी तग धरावा लागणार आहे. उजनीचे पाणी शेतीसाठी सोडणे बंद करण्यात आले आहे. जलसंपदा, कृषी, महसूलसह सर्व शासकीय, निमशासकीय खात्यांना या जलजागृती अभियानासाठी राज्य शासनाने फतवाच काढला आहे. त्यानुसार जलसंपदा खात्यामार्फत दि. १६ ते २२ मार्चदरम्यान अभियान राबविले जाणार आहे. जलजागृती अभियानात पिकांसाठी पाणी देण्याची पद्धत बदलणे, पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर, पाण्याचा पुनर्वापर करणे, यांसह इतर उपाययोजना करण्यासाठी जलजागृती केली जाणार आहे.200 ते 250 फुटांपर्यंत खोदलेल्या विंधन विहिरींचे पाणी आटले असून विहिरी कोरड्या पडल्या अवस्थेत आहेत. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. दुष्काळाची अशी भीषण परिस्थिती डोळ्यासमोर असताना पहिल्यांदाच जलजागृतीसाठी जलसंपदा खात्याला पुढाकार घ्यावा लागला आहे. राज्य सरकारने यापूर्वी मोठी धरणे बांधण्यापेक्षा नाले, नदी, ओढे आदींचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर पाझर तलावातील गाळ उपसण्याची मोहीम राबविली आहे. आता राज्यात गावोगावी जलजागृतीची मोहीम राबणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह लोकांचा सहभाग, शेतकरी मंडळांचा सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव, उपविभागीय अभियंता ए. आर. भोसले यांनी दिली.