शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
6
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
7
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
8
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
9
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
10
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
11
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
12
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
13
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
14
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
15
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
16
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
17
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
18
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
19
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
20
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

गावोगावी 'जल'जागृती

By admin | Updated: March 18, 2016 03:03 IST

सतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा

- महेंद्र कांबळे,  बारामतीसतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल, कृषी आणि जलसंपदा खात्याकडे प्रामुख्याने सोपविली आहे. ाागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्तच घटले. धरणांमध्येदेखील पाणी साठले नाही. शेती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांसाठी पाणी, असे नियोजन करताना जलसंपदा खात्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना पश्चिम महाराष्ट्रातदेखील दिवसेंदिवस पाण्याची भूगर्भातील पातळी खालावत आहे. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी होत आहे. जवळपास ४ जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उजनीसारख्या मोठ्या धरणांचा पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे आता जलजागृती अभियानाच्या माध्यमातून पाणीबचतीची मोहीम राज्य सरकार राबविणार आहे.सध्या उजनीचा उपयुक्त साठा वजा १४.७४ टक्के आहे. तर, एकूण साठा वजा २७.५७ टक्के आहे. आणखी ३ महिने शिल्लक पाण्यासाठी तग धरावा लागणार आहे. उजनीचे पाणी शेतीसाठी सोडणे बंद करण्यात आले आहे. जलसंपदा, कृषी, महसूलसह सर्व शासकीय, निमशासकीय खात्यांना या जलजागृती अभियानासाठी राज्य शासनाने फतवाच काढला आहे. त्यानुसार जलसंपदा खात्यामार्फत दि. १६ ते २२ मार्चदरम्यान अभियान राबविले जाणार आहे. जलजागृती अभियानात पिकांसाठी पाणी देण्याची पद्धत बदलणे, पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर, पाण्याचा पुनर्वापर करणे, यांसह इतर उपाययोजना करण्यासाठी जलजागृती केली जाणार आहे.200 ते 250 फुटांपर्यंत खोदलेल्या विंधन विहिरींचे पाणी आटले असून विहिरी कोरड्या पडल्या अवस्थेत आहेत. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. दुष्काळाची अशी भीषण परिस्थिती डोळ्यासमोर असताना पहिल्यांदाच जलजागृतीसाठी जलसंपदा खात्याला पुढाकार घ्यावा लागला आहे. राज्य सरकारने यापूर्वी मोठी धरणे बांधण्यापेक्षा नाले, नदी, ओढे आदींचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर पाझर तलावातील गाळ उपसण्याची मोहीम राबविली आहे. आता राज्यात गावोगावी जलजागृतीची मोहीम राबणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह लोकांचा सहभाग, शेतकरी मंडळांचा सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव, उपविभागीय अभियंता ए. आर. भोसले यांनी दिली.