शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गावे होणार कचरामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात प्रत्येक गावत घनकचरा प्रकल्प उभारून गावे कचरामुक्त करण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन महिन्यांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात प्रत्येक गावत घनकचरा प्रकल्प उभारून गावे कचरामुक्त करण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन महिन्यांत हे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असून, जून महिन्यात गावे कचरामुक्त होतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी व्यक्त केला. यासोबतच प्रत्येक गावात घरोघरी नळजोडणीद्वारे पाणी पुरवण्याचे नियोजन असल्याचेही त्या म्हणाल्या. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन कार्यक्रमची अंमलबजावणी सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यस्तरावरून सन २०२०-२१ मध्ये पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्वच गावांतील वाड्या - वस्त्यांमध्ये कायमस्वरुपी शुद्ध व पर्याप्त पाणीपुरवठा करावयाचा आहे. या वार्षिक आराखड्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनानुसार जिल्ह्यातील सर्व गावांचे घनकचरा व्यवस्थापनाचे कामकाज, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रकल्प आराखड्यानुसार गावांमध्ये योजना राबवावयाची आहे. याकरिता गावांचे सर्वेक्षण करून गावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्या येणार आहे. प्रकल्प अहवालाचे आधारे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. विविध कामांच्या निवीदा प्रक्रिया करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

सध्या जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपअभियंता, शाखा अभियंता तसेच काही कंत्राटी अभियंत्यांकडून हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पानसरे म्हणाल्या.

या दोन्ही योजनांची सर्वच गावांमध्ये प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक गावाकरिता किमान एका अभियंताची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोेणपे उपस्थित होते.

जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मोहीम स्वरूपात राबवून जुलै महिन्यापर्यंत प्रत्येक गावात सर्व ठिकाणची स्वच्छता करणे, सर्व ठिकाणचा कचरा उचलून त्याचे व्यवस्थापन करणे तसेच सर्व कुटुंब, शाळा, अंगणवाडी येथे नळकनेक्शन जोडणी करणे घर तिथे शोष खड्डा करून १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावे स्वच्छ, कचरामुक्त, व शोषखड्डायुक्त गाव करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संस्था यांनी सक्रिय सहभाग द्यावा.

- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

फोटो :