शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

रिंगरोडला केळवडे ग्रामस्थांचा विरोध : विश्वासात न घेतल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:24 IST

ग्रामस्थ उभारणार तीव्र आंदोलन..

ठळक मुद्देभूसंपादन झाल्यास येथील ८० टक्के शेतकरी भूमिहीन होणार अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकरी नुकसानीमुळे झाला हतबल

नसरापूर : वेगवान वाहतुकीसाठी जिल्ह्यातील प्रस्तावित चक्राकार मार्गाला (रिंगरोड) केळवडे येथील शेतकºयांनी विरोध दर्शविला आहे. रिंगरोडचा आराखडा तयार करताना आमच्या जमिनी यात जात असून, आमचा कुठलाही विचार प्रशासनाने केला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या रस्त्यासाठी आम्ही आमची इंचभरही जमीन देणार नाही. त्यामुळे या रस्त्याच्या आखणीचा पुनर्विचार करावा अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.जिल्ह्यात वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रिंगरोड प्रस्तावित आहे. हा रस्ता भोर तालुक्यातील केळवडे येथून जातो. केळवडे हे गाव हे कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. ७० टक्के नागरिकांचा व्यवसाय शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. येथील शेतकऱ्यांना ० =४० व ० =६० आर असे कमी क्षेत्र आहे. त्यांच्या या जमिनीवरून रिंगरोड प्रस्तावीत झाला असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी नसरापूर येथे ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ५) बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी  शासनाने रिंगरोडसाठी सर्व शेतकºयांशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतलेला आहे. रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने हस्तांतरित करु नये. अन्यथा  येथील शेतकरी उग्र आंदोलन करतील, असा इशारा या बैठकीत शेतकऱ्यांनी दिला.  या वेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर जायगुडे, सरपंच शांताराम जायगुडे, माजी सरपंच संदीप खुळे, विलास कोंडे, बाळासाहेब कोंडे, राजेंद्र कोंडे, महेश मरळ, जितेंद्र कोंडे, रवींद्र धुमाळ, जीवन कोंडे, मोहन धुमाळ, सचिन कोंडे, संपत कोंडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.........पुणे जिल्ह्यातील रा. म. लगेच या केळवडे- कांजळे - खोपी- कुसगाव - रांजे (तालुका भोर) रहाटावडे - कल्याण-घेरा सिंहगड - खामगाव मावळ - वरदाडे -मालखेड - मांडवी बुदुक - सांगरुण- बहुल्ली (तालुका हवेली) कातवडी - मुठा - मारणेवाडी - आंबेगाव - उरवडे कासार आंबोली - भरे - आंबडवेट - घोटावडे - रिहे - पडाळघरवाडी - जावळ - केमसेवाडी पिंपळोली (तालुका मुळशी) पाचाणे - चांदखेड बेबड ओहोळ धामणे - परंदवाड़ी व उर्स (मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाजवळ)(तालुका मावळ) येथे संपणाच्या या नवीन रस्त्याच्या आखणीस विशेष राज्य मार्ग म्हणून शासनाच्या वतीने मंजुरी देणार असल्याचे समजते........

अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकरी नुकसानीमुळे हतबल झाला आहे. त्यातच शासनाने केळवडे ते उर्से मार्गावरील रिंगरोडसाठी बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन करण्याचा घाट घातला आहे. .केळवडे ते उर्से रिंगरोड संदर्भात शासनाकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नसून या रिंगरोडविरोधात केळवडे येथील ग्रामस्थ, बळीराजा शेतकरी संघटना यांनी आम्हास निवेदन दिले आहे.- राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी, भोर.....

भूसंपादन झाल्यास येथील ८० टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळेच भूसंपादन करण्याचा प्रयत्न झाल्यास उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उपस्थितांनी दिला...........केळवडे ते उर्से  रिंगरोड संदर्भात शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे ८० टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहे.- श्यामसुंदर जायगुडे, संपर्कप्रमुख, बळीराजा शेतकरी संघटना 

टॅग्स :Puneपुणे