शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

विमानतळाच्या विरोधात ग्रामस्थांचा एल्गार

By admin | Updated: November 8, 2016 01:15 IST

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले

सासवड : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले. आबालवृद्ध महिलांसह सात गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेले होते. पुरंदरमधील राजेवाडी, वाघापूर, आंबळे, मेमाणे-पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या बाधित सात गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे मूकमोर्चा काढण्यात आला. मात्र, आचारसंहितेचे कारण सांगत तहसील कचेरीवर मोर्चेकरांना जाऊ न देता नगरपालिकेसमोरच अडवले, त्याठिकाणी नायब तहसीलदार रमेश उळागड्डी यांनी निवेदन स्वीकारले. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर-मुंजवडी, खानवडी या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर या भागातील शेतकरी व नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन आपला विरोध प्रकट केला. तसेच तहसीलदार कार्यालयात प्रत्येक गावाने स्वतंत्रपणे निवेदने दिली. तसेच प्रांताधिकारी कार्यालय, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी कार्यालय, खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन आपला विरोध प्रकट केला आहे. त्यानंतर पुन्हा विमानतळाला तीव्र विरोध करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. आपल्या व्यथा शासनाकडे मांडण्यात आल्या. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्याचेच प्रत्यंतर आज सासवड येथील मूक मोर्चामध्ये दिसून आले. नको पॅकेज नको सर्वेक्षण येथील शेतकरी दुग्ध आणि कुकुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय करतो तसेच बागायती जमिनी गेल्यास शेतकरी उध्वस्त होईल त्यामुळे आम्हाला कोणतेही पॅकेज नको, शासनाने कोणत्याही प्रकारची सर्वेक्षण करू नये तसेच जमिनींवर आरक्षणाचे शिक्के टाकू नये, आमच्यावर शासकीय बाळाचा वापर करू नये, प्रस्तावित विमानतळाला जमिनी द्यायच्या नाहीत यावर आम्ही ठाम आहोत असेही या निवेदनात सांगितले आहे. यावेळी या भागातील शेतकरी व पंचायत समिती सदस्य दत्तात्रय झुरंगे, नीरा मार्केट कमिटीचे संचालक सुनील धिवार, वाघापूरचे माजी सरपंच बाजीरावशेठ कुंजीर, पारगावचे सरपंच सजेर्राव मेमाणे, उपसरपंच संगीता मेमाणे, एखतपूर - मुंजवडी चे सरपंच आशा निंबाळकर, खानवडीच्या सरपंच दिपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, राजेवाडीच्या सरपंच पुष्पांजली बधे, उपसरपंच गौतम जगताप, वाघापूरचे सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच अशोक कुंजीर, आंबळेचे सरपंच मंगेश गायकवाड, उपसरपंच परसराम जगताप त्याच प्रमाणे या गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या मूकमोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत होती. लोकप्रतिनिधींनी जनतेचे ऐकावे एकीकडे बाधित गावातील नागरिकांचा तीव्र विरोध होत असताना सरकारमध्ये असलेले राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, शासनाने काय निकष ठरवून दिले आहेत ते नागरिकांना सांगावे, अशी नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आहे.स्थनिकांनाडावलू नका जनतेचा विरोध डावलून सर्वच कार्यक्रमांमध्ये विषय नसताना विमानतळ होणारच असे सांगून कोणताही संबंध नसताना सडकून टीका करीत आहेत. तसेच विमानतळ मीच मंजूर केले आहे असे सांगून एकप्रकारे श्रेय घेण्याच्या प्रयत्नामध्ये विरोधकांसह स्थानिक शेतकऱ्यांनाही डावलत आहेत. त्यामुळे विरोध मावळण्याऐवजी तो दिवसेंदिवस वाढत आहे, अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.