शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या विरोधात ग्रामस्थांचा एल्गार

By admin | Updated: November 8, 2016 01:15 IST

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले

सासवड : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले. आबालवृद्ध महिलांसह सात गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेले होते. पुरंदरमधील राजेवाडी, वाघापूर, आंबळे, मेमाणे-पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या बाधित सात गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे मूकमोर्चा काढण्यात आला. मात्र, आचारसंहितेचे कारण सांगत तहसील कचेरीवर मोर्चेकरांना जाऊ न देता नगरपालिकेसमोरच अडवले, त्याठिकाणी नायब तहसीलदार रमेश उळागड्डी यांनी निवेदन स्वीकारले. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर-मुंजवडी, खानवडी या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर या भागातील शेतकरी व नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन आपला विरोध प्रकट केला. तसेच तहसीलदार कार्यालयात प्रत्येक गावाने स्वतंत्रपणे निवेदने दिली. तसेच प्रांताधिकारी कार्यालय, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी कार्यालय, खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन आपला विरोध प्रकट केला आहे. त्यानंतर पुन्हा विमानतळाला तीव्र विरोध करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. आपल्या व्यथा शासनाकडे मांडण्यात आल्या. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्याचेच प्रत्यंतर आज सासवड येथील मूक मोर्चामध्ये दिसून आले. नको पॅकेज नको सर्वेक्षण येथील शेतकरी दुग्ध आणि कुकुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय करतो तसेच बागायती जमिनी गेल्यास शेतकरी उध्वस्त होईल त्यामुळे आम्हाला कोणतेही पॅकेज नको, शासनाने कोणत्याही प्रकारची सर्वेक्षण करू नये तसेच जमिनींवर आरक्षणाचे शिक्के टाकू नये, आमच्यावर शासकीय बाळाचा वापर करू नये, प्रस्तावित विमानतळाला जमिनी द्यायच्या नाहीत यावर आम्ही ठाम आहोत असेही या निवेदनात सांगितले आहे. यावेळी या भागातील शेतकरी व पंचायत समिती सदस्य दत्तात्रय झुरंगे, नीरा मार्केट कमिटीचे संचालक सुनील धिवार, वाघापूरचे माजी सरपंच बाजीरावशेठ कुंजीर, पारगावचे सरपंच सजेर्राव मेमाणे, उपसरपंच संगीता मेमाणे, एखतपूर - मुंजवडी चे सरपंच आशा निंबाळकर, खानवडीच्या सरपंच दिपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, राजेवाडीच्या सरपंच पुष्पांजली बधे, उपसरपंच गौतम जगताप, वाघापूरचे सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच अशोक कुंजीर, आंबळेचे सरपंच मंगेश गायकवाड, उपसरपंच परसराम जगताप त्याच प्रमाणे या गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या मूकमोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत होती. लोकप्रतिनिधींनी जनतेचे ऐकावे एकीकडे बाधित गावातील नागरिकांचा तीव्र विरोध होत असताना सरकारमध्ये असलेले राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, शासनाने काय निकष ठरवून दिले आहेत ते नागरिकांना सांगावे, अशी नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आहे.स्थनिकांनाडावलू नका जनतेचा विरोध डावलून सर्वच कार्यक्रमांमध्ये विषय नसताना विमानतळ होणारच असे सांगून कोणताही संबंध नसताना सडकून टीका करीत आहेत. तसेच विमानतळ मीच मंजूर केले आहे असे सांगून एकप्रकारे श्रेय घेण्याच्या प्रयत्नामध्ये विरोधकांसह स्थानिक शेतकऱ्यांनाही डावलत आहेत. त्यामुळे विरोध मावळण्याऐवजी तो दिवसेंदिवस वाढत आहे, अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.