शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या विरोधात ग्रामस्थांचा एल्गार

By admin | Updated: November 8, 2016 01:15 IST

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले

सासवड : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले. आबालवृद्ध महिलांसह सात गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेले होते. पुरंदरमधील राजेवाडी, वाघापूर, आंबळे, मेमाणे-पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या बाधित सात गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे मूकमोर्चा काढण्यात आला. मात्र, आचारसंहितेचे कारण सांगत तहसील कचेरीवर मोर्चेकरांना जाऊ न देता नगरपालिकेसमोरच अडवले, त्याठिकाणी नायब तहसीलदार रमेश उळागड्डी यांनी निवेदन स्वीकारले. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर-मुंजवडी, खानवडी या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर या भागातील शेतकरी व नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन आपला विरोध प्रकट केला. तसेच तहसीलदार कार्यालयात प्रत्येक गावाने स्वतंत्रपणे निवेदने दिली. तसेच प्रांताधिकारी कार्यालय, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी कार्यालय, खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन आपला विरोध प्रकट केला आहे. त्यानंतर पुन्हा विमानतळाला तीव्र विरोध करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. आपल्या व्यथा शासनाकडे मांडण्यात आल्या. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्याचेच प्रत्यंतर आज सासवड येथील मूक मोर्चामध्ये दिसून आले. नको पॅकेज नको सर्वेक्षण येथील शेतकरी दुग्ध आणि कुकुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय करतो तसेच बागायती जमिनी गेल्यास शेतकरी उध्वस्त होईल त्यामुळे आम्हाला कोणतेही पॅकेज नको, शासनाने कोणत्याही प्रकारची सर्वेक्षण करू नये तसेच जमिनींवर आरक्षणाचे शिक्के टाकू नये, आमच्यावर शासकीय बाळाचा वापर करू नये, प्रस्तावित विमानतळाला जमिनी द्यायच्या नाहीत यावर आम्ही ठाम आहोत असेही या निवेदनात सांगितले आहे. यावेळी या भागातील शेतकरी व पंचायत समिती सदस्य दत्तात्रय झुरंगे, नीरा मार्केट कमिटीचे संचालक सुनील धिवार, वाघापूरचे माजी सरपंच बाजीरावशेठ कुंजीर, पारगावचे सरपंच सजेर्राव मेमाणे, उपसरपंच संगीता मेमाणे, एखतपूर - मुंजवडी चे सरपंच आशा निंबाळकर, खानवडीच्या सरपंच दिपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, राजेवाडीच्या सरपंच पुष्पांजली बधे, उपसरपंच गौतम जगताप, वाघापूरचे सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच अशोक कुंजीर, आंबळेचे सरपंच मंगेश गायकवाड, उपसरपंच परसराम जगताप त्याच प्रमाणे या गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या मूकमोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत होती. लोकप्रतिनिधींनी जनतेचे ऐकावे एकीकडे बाधित गावातील नागरिकांचा तीव्र विरोध होत असताना सरकारमध्ये असलेले राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, शासनाने काय निकष ठरवून दिले आहेत ते नागरिकांना सांगावे, अशी नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आहे.स्थनिकांनाडावलू नका जनतेचा विरोध डावलून सर्वच कार्यक्रमांमध्ये विषय नसताना विमानतळ होणारच असे सांगून कोणताही संबंध नसताना सडकून टीका करीत आहेत. तसेच विमानतळ मीच मंजूर केले आहे असे सांगून एकप्रकारे श्रेय घेण्याच्या प्रयत्नामध्ये विरोधकांसह स्थानिक शेतकऱ्यांनाही डावलत आहेत. त्यामुळे विरोध मावळण्याऐवजी तो दिवसेंदिवस वाढत आहे, अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.