शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

विमानतळाच्या विरोधात ग्रामस्थांचा एल्गार

By admin | Updated: November 8, 2016 01:15 IST

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले

सासवड : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले. आबालवृद्ध महिलांसह सात गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेले होते. पुरंदरमधील राजेवाडी, वाघापूर, आंबळे, मेमाणे-पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या बाधित सात गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे मूकमोर्चा काढण्यात आला. मात्र, आचारसंहितेचे कारण सांगत तहसील कचेरीवर मोर्चेकरांना जाऊ न देता नगरपालिकेसमोरच अडवले, त्याठिकाणी नायब तहसीलदार रमेश उळागड्डी यांनी निवेदन स्वीकारले. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर-मुंजवडी, खानवडी या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर या भागातील शेतकरी व नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन आपला विरोध प्रकट केला. तसेच तहसीलदार कार्यालयात प्रत्येक गावाने स्वतंत्रपणे निवेदने दिली. तसेच प्रांताधिकारी कार्यालय, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी कार्यालय, खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन आपला विरोध प्रकट केला आहे. त्यानंतर पुन्हा विमानतळाला तीव्र विरोध करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. आपल्या व्यथा शासनाकडे मांडण्यात आल्या. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्याचेच प्रत्यंतर आज सासवड येथील मूक मोर्चामध्ये दिसून आले. नको पॅकेज नको सर्वेक्षण येथील शेतकरी दुग्ध आणि कुकुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय करतो तसेच बागायती जमिनी गेल्यास शेतकरी उध्वस्त होईल त्यामुळे आम्हाला कोणतेही पॅकेज नको, शासनाने कोणत्याही प्रकारची सर्वेक्षण करू नये तसेच जमिनींवर आरक्षणाचे शिक्के टाकू नये, आमच्यावर शासकीय बाळाचा वापर करू नये, प्रस्तावित विमानतळाला जमिनी द्यायच्या नाहीत यावर आम्ही ठाम आहोत असेही या निवेदनात सांगितले आहे. यावेळी या भागातील शेतकरी व पंचायत समिती सदस्य दत्तात्रय झुरंगे, नीरा मार्केट कमिटीचे संचालक सुनील धिवार, वाघापूरचे माजी सरपंच बाजीरावशेठ कुंजीर, पारगावचे सरपंच सजेर्राव मेमाणे, उपसरपंच संगीता मेमाणे, एखतपूर - मुंजवडी चे सरपंच आशा निंबाळकर, खानवडीच्या सरपंच दिपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, राजेवाडीच्या सरपंच पुष्पांजली बधे, उपसरपंच गौतम जगताप, वाघापूरचे सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच अशोक कुंजीर, आंबळेचे सरपंच मंगेश गायकवाड, उपसरपंच परसराम जगताप त्याच प्रमाणे या गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या मूकमोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत होती. लोकप्रतिनिधींनी जनतेचे ऐकावे एकीकडे बाधित गावातील नागरिकांचा तीव्र विरोध होत असताना सरकारमध्ये असलेले राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, शासनाने काय निकष ठरवून दिले आहेत ते नागरिकांना सांगावे, अशी नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आहे.स्थनिकांनाडावलू नका जनतेचा विरोध डावलून सर्वच कार्यक्रमांमध्ये विषय नसताना विमानतळ होणारच असे सांगून कोणताही संबंध नसताना सडकून टीका करीत आहेत. तसेच विमानतळ मीच मंजूर केले आहे असे सांगून एकप्रकारे श्रेय घेण्याच्या प्रयत्नामध्ये विरोधकांसह स्थानिक शेतकऱ्यांनाही डावलत आहेत. त्यामुळे विरोध मावळण्याऐवजी तो दिवसेंदिवस वाढत आहे, अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.