शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुस्तकाच्या गावी संमेलन अनिश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 04:04 IST

देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या वर्षी तरी भिलारला संमेलन होणार नसल्याचे बोलले जात आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे - देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या वर्षी तरी भिलारला संमेलन होणार नसल्याचे बोलले जात आहे.आगामी साहित्यसंमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, शासन संमेलनाची पूर्ण जबाबदारी उचलेल, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी बडोदा येथे झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केले होते. साहित्यिकांसह साहित्य संस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. संपूर्ण संमेलन सरकारच्या हातात गेले तर त्याचे स्वरूपच बदलेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती; मात्र गेल्या अडीच महिन्यांत अशा स्वरूपाचे कोणतेही निमंत्रण साहित्य महामंडळाकडे आलेले नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. मुळात साहित्य संमेलनाचे निमंत्रण शासन देऊ शकते का, आणि असे निमंत्रण आले तर संमेलन शासनाच्या हाती सुपूर्द करावे का, हे मुद्दे यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. आगामी साहित्य संमेलनासाठी भिलार येथून अद्याप निमंत्रण आलेले नाही.साहित्य महामंडळाची बैठक जूनमध्ये होणार आहे. त्यामध्ये स्थळांबाबत चर्चा होईल, असे श्रीपाद जोशी यांनी सांगितले.आगामी संमेलन विदर्भातसाहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाकडे गेले, त्याला दोन वर्षे झाली आहेत. यापूर्वी डोंबिवली आणि बडोदा येथे संमेलन झाले असल्याने महामंडळाच्या कार्यकाळातील हे अखेरचे संमेलन तरी विदर्भात घेतले जावे, अशी विदर्भातील साहित्यरसिकांची अपेक्षा आहे.आजवरची साहित्य संमेलने पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रभोवती फिरत राहिल्याने विदर्भाचा अनुशेष दूर व्हावा, या मागणीची दाखल घेत आगामी संमेलन निमंत्रण आलेल्या दोन स्थळांपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य