शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

पुस्तकाच्या गावी संमेलन अनिश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 04:04 IST

देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या वर्षी तरी भिलारला संमेलन होणार नसल्याचे बोलले जात आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे - देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या वर्षी तरी भिलारला संमेलन होणार नसल्याचे बोलले जात आहे.आगामी साहित्यसंमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, शासन संमेलनाची पूर्ण जबाबदारी उचलेल, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी बडोदा येथे झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केले होते. साहित्यिकांसह साहित्य संस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. संपूर्ण संमेलन सरकारच्या हातात गेले तर त्याचे स्वरूपच बदलेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती; मात्र गेल्या अडीच महिन्यांत अशा स्वरूपाचे कोणतेही निमंत्रण साहित्य महामंडळाकडे आलेले नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. मुळात साहित्य संमेलनाचे निमंत्रण शासन देऊ शकते का, आणि असे निमंत्रण आले तर संमेलन शासनाच्या हाती सुपूर्द करावे का, हे मुद्दे यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. आगामी साहित्य संमेलनासाठी भिलार येथून अद्याप निमंत्रण आलेले नाही.साहित्य महामंडळाची बैठक जूनमध्ये होणार आहे. त्यामध्ये स्थळांबाबत चर्चा होईल, असे श्रीपाद जोशी यांनी सांगितले.आगामी संमेलन विदर्भातसाहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाकडे गेले, त्याला दोन वर्षे झाली आहेत. यापूर्वी डोंबिवली आणि बडोदा येथे संमेलन झाले असल्याने महामंडळाच्या कार्यकाळातील हे अखेरचे संमेलन तरी विदर्भात घेतले जावे, अशी विदर्भातील साहित्यरसिकांची अपेक्षा आहे.आजवरची साहित्य संमेलने पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रभोवती फिरत राहिल्याने विदर्भाचा अनुशेष दूर व्हावा, या मागणीची दाखल घेत आगामी संमेलन निमंत्रण आलेल्या दोन स्थळांपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य