शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विजय रणस्तंभास लोटला भीमसागर

By admin | Updated: January 2, 2017 02:12 IST

विजय रणस्तंभ परिसरात रविवारी राज्यभरातून आलेल्या दलित बांधवांचा महासागर लोटला होता. पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे भीमसैनिकांना मानवंदना

लोणी कंद : विजय रणस्तंभ परिसरात रविवारी राज्यभरातून आलेल्या दलित बांधवांचा महासागर लोटला होता. पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे नेते, विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते, भीमसैनिक, आंबेडकर बांधव यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. दलित नेत्यांच्या अभिवादन सभा, भीमगीत गायनाचा कार्यक्रम, बुद्धवंदना, सामुदायिक सलामी अशा भरगच्च कार्यक्रमाने परिसर व्यापून गेला होता.एक जानेवारी १८१८ रोजी पेशवाई आणि ब्रिटिश यांचे घनघोर युद्ध भीमा नदीतीरावर झाले. यामध्ये महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावली आणि इंग्रज विजयी झाले. याप्रीत्यर्थ १८२२ मध्ये या विजयाचे प्रतीक म्हणून विजय रणस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर या स्थळाला भेट दिली आणि तमाम दलित बांधवांचे इकडे लक्ष वेधले गेले. तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो नागरिक मानवंदना देण्यासाठी येतात. रविवारी केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले, राज्य समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्षा मीराताई आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार अमर साबळे, भीमराव आंबेडकर, महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, राजाभाऊ सरोदे आदींनी स्वतंत्र भेट देऊन मानवंदना दिली.सकाळी बुद्धवंदना देण्यात आली. त्यानंतर दलित बांधवांच्या वतीने सामुदायिक मानवंदना देण्यात आली. कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच स्वतंत्र साऊंड सिस्टीम, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. समता सैनिक दलाच्या वतीने शेकडो जवानांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. विविध पक्ष, संघटना यांच्या वतीने अभिवादन सभा झाल्या. पहाटेपासूनच पुणे-नगर रस्ता गर्दीने वाहू लागला होता. टेम्पो, ट्रक, शहर बस, एसटी मिळेल त्या वाहनाने दलित बांधव विजय रणस्तंभाकडे धाव घेत होते. सकाळी १० वाजता सर्व परिसर गर्दीने फुलून गेला होता. (वार्ताहर)